शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मृगाचा गाढव, पुष्यचा घोडा बरसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

पावसाचा अंदाज, बेडूक, म्हैस शेतकऱ्यांना तारणार मोहन राऊत धामणगाव रेल्वे : गतवर्षी पावसाच्या अनेक नक्षत्रांनी कलाटणी दिली असली तरी ...

पावसाचा अंदाज, बेडूक, म्हैस शेतकऱ्यांना तारणार

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : गतवर्षी पावसाच्या अनेक नक्षत्रांनी कलाटणी दिली असली तरी यंदा मृगाचा गाढव, तर पुष्यचा घोडा बरसणार आहे. दरम्यान बेडूक, म्हैस शेतकऱ्यांना तारणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

पावसाचा अंदाज ठरविण्याची परंपरा अनेक वर्षांपासून कायम आहे. पंचांगकर्ते नेहमीच हा अंदाज ठरवितात. खरीप हंगामात या नक्षत्रात असलेले वाहन शेतकऱ्यांच्या जीवनात सुखदुःखाचे चक्रव्यूह सुरू ठेवते. मात्र, गत सात ते आठ वर्षांत अनेकदा पावसाने या खरीप हंगामात दगा दिला. कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार याविषयी पंचांगकर्त्यांनी अंदाज मांडतात. शेतकरी त्याप्रमाणे शेतीची पेरणी करतो. परंतु, यापूर्वीच्या हंगामात अनेक वेळा कधी अधिक, तर अल्प पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मागील वर्षी सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, मध्यंतरी अनेक नक्षत्र कोरडे पडले. त्यामुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली. मशागतीपासून तर उत्पन्नापर्यंत बेरीज-वजाबाकी केल्यास बळीराजाच्या हातात काहीच शिल्लक राहिले नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. यंदा सुरुवातीपासून खरीप हंगामाच्या मृग नक्षत्रात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मृग, पुष्य, पूर्वा नक्षत्रावर शेतकऱ्यांची भिस्त

मृग नक्षत्रात पाऊस पडला तर पुढील तीन नक्षत्रात पाऊस पडतो. पुष्य व पूर्वा या नक्षत्रात संततधार असल्यास शेतकऱ्यांसाठी मध्यंतरी असलेले नक्षत्र वरदान ठरतात, असे मत पंचांगकर्त्यांचे आहे.

दिनांक- नक्षत्र- वाहन

८ जून- मृग- गाढव

२१ जून- आद्रा- कोल्हा

५ जुलै- पुनर्वसू-उंदीर

१९ जुलै- पुष्य- घोडा

२ ऑगस्ट- आश्लेषा- मोर

१६ ऑगस्ट- मघा-गाढव

३० ऑगस्ट-पूर्वा-बेडूक

१३ सप्टेंबर-उतरा- म्हैस

२७-सप्टेंबर- हस्त- घोडा

१० ऑक्टोबर- चित्रा- मोर

यंदा पाच ते सहा नक्षत्रे पावसाची आहेत. आगामी मृग नक्षत्रात पाऊस पडत असला तरी सर्वाधिक पाऊस जुलै व ऑगस्ट महिन्यात राहणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरण्या कराव्यात.

- प्रभाकर जोशी,

पंचांगकर्ते, विरूळ रोंघे