शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान नंतर दोन महिने थांबावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमसी, बालाजी व संत गाडगेबाबा अशा चार रक्तपेढी आहेत. या ठिकाणी डोनरची परिस्थिती सारखीच आहे. 

ठळक मुद्देकॉलेज बंद, रक्तदान शिबिरेही नाहीत, रक्ताचा तुटवडा होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षीच उन्हाळा लागला की, रक्ताचा तुटवडा होतो. यंदा तर कोरोना संसर्ग आहे. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले कॉलेज व ग्रामीणमध्येही कोरोनाचे रुग्ण निघत असल्याने  रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कोरोना लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदात्यांना  रक्तदान करण्याचे आवाहन होत आहे.कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमसी, बालाजी व संत गाडगेबाबा अशा चार रक्तपेढी आहेत. या ठिकाणी डोनरची परिस्थिती सारखीच आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये दिवसाला ४० ते ५० रक्त पिशव्यांची मागणी आहे. याशिवाय सिकलसेल, अॅनेमिया, थॅलेसिमिया, प्रसुती व विविध ऑपरेशनमध्ये रक्तपिशव्या, रक्तघटक लागतात. त्यामुळे रक्ताच्या तुटवड्याची कमी ही शिबिरे भरुन काढतात, परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे रक्तदात्यांनी कोरोनाचे लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाच्या धाकाने रक्तदाते अलीकडे पुढे यायला तयार नाही. प्रशासन, सामाजिक संस्थांच्या आवाहनानंतर रक्तदान शिबिराला मिळणारा प्रतिसाद आता कमी झालेला आहे व त्यामुळेच आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकाने रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा जीव वाचतो. सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये लस घेतल्यानंतर व दुसरा डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येणार असल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.

कोरोना संसर्गामुळे यंदा कॉलेजेस बंद राहिली आहे. ग्रामीण भागातही आता संसर्ग वाढलेला आहे त्यामुळे रक्तदाते समोर येत नाही. रक्तपिशव्यांचा साठा पुरेसा नाही. अशा परिस्थितीत लसीकरणापूर्वी रक्तदान न केल्यास पुढे २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन आहे.

जीवनात रक्तदान हेे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपन केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचतो. त्यामुळे आतापर्यंत चार वेळा रक्तदान केलेले आहे. लसीकरणानंतर रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे मी लसीकरणापूर्वी रुग्णाला डोनर म्हणून रक्तदान केलेले आहे.- प्रसाद काळे, अमरावती

दरवर्षीच उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा असतो. यंदा तर कोरोनाचा संर्सगच आहे. त्यामुळे  शिबिरे झालेली नाही. डोनरही कमी मिळत आहे. याशिवाय पाझ्मा दात्यांनाही सातत्यानी फोन करावा लागतो. आता लसीकरण सुरू झालेले आहे व सूचनेनुसार लसीकरण करणाऱ्यांना २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने त्यापूर्वीच रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.- उमेश आगरकर, संपर्क अधिकारी, इर्विन रक्तपेढी

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBlood Bankरक्तपेढी