शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान नंतर दोन महिने थांबावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमसी, बालाजी व संत गाडगेबाबा अशा चार रक्तपेढी आहेत. या ठिकाणी डोनरची परिस्थिती सारखीच आहे. 

ठळक मुद्देकॉलेज बंद, रक्तदान शिबिरेही नाहीत, रक्ताचा तुटवडा होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षीच उन्हाळा लागला की, रक्ताचा तुटवडा होतो. यंदा तर कोरोना संसर्ग आहे. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले कॉलेज व ग्रामीणमध्येही कोरोनाचे रुग्ण निघत असल्याने  रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कोरोना लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदात्यांना  रक्तदान करण्याचे आवाहन होत आहे.कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमसी, बालाजी व संत गाडगेबाबा अशा चार रक्तपेढी आहेत. या ठिकाणी डोनरची परिस्थिती सारखीच आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये दिवसाला ४० ते ५० रक्त पिशव्यांची मागणी आहे. याशिवाय सिकलसेल, अॅनेमिया, थॅलेसिमिया, प्रसुती व विविध ऑपरेशनमध्ये रक्तपिशव्या, रक्तघटक लागतात. त्यामुळे रक्ताच्या तुटवड्याची कमी ही शिबिरे भरुन काढतात, परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे रक्तदात्यांनी कोरोनाचे लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाच्या धाकाने रक्तदाते अलीकडे पुढे यायला तयार नाही. प्रशासन, सामाजिक संस्थांच्या आवाहनानंतर रक्तदान शिबिराला मिळणारा प्रतिसाद आता कमी झालेला आहे व त्यामुळेच आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकाने रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा जीव वाचतो. सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये लस घेतल्यानंतर व दुसरा डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येणार असल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.

कोरोना संसर्गामुळे यंदा कॉलेजेस बंद राहिली आहे. ग्रामीण भागातही आता संसर्ग वाढलेला आहे त्यामुळे रक्तदाते समोर येत नाही. रक्तपिशव्यांचा साठा पुरेसा नाही. अशा परिस्थितीत लसीकरणापूर्वी रक्तदान न केल्यास पुढे २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन आहे.

जीवनात रक्तदान हेे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपन केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचतो. त्यामुळे आतापर्यंत चार वेळा रक्तदान केलेले आहे. लसीकरणानंतर रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे मी लसीकरणापूर्वी रुग्णाला डोनर म्हणून रक्तदान केलेले आहे.- प्रसाद काळे, अमरावती

दरवर्षीच उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा असतो. यंदा तर कोरोनाचा संर्सगच आहे. त्यामुळे  शिबिरे झालेली नाही. डोनरही कमी मिळत आहे. याशिवाय पाझ्मा दात्यांनाही सातत्यानी फोन करावा लागतो. आता लसीकरण सुरू झालेले आहे व सूचनेनुसार लसीकरण करणाऱ्यांना २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने त्यापूर्वीच रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.- उमेश आगरकर, संपर्क अधिकारी, इर्विन रक्तपेढी

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBlood Bankरक्तपेढी