शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायबल’ घोटाळाप्रकरणी पोलिसांनी मागविली कागदपत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 15:56 IST

आदिवासी विकास विभागात सन २००४ ते २००९ या कालावधीत योजनांमध्ये सहा हजार कोटींचा घोटाळाप्रकरणी दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

अमरावती -आदिवासी विकास विभागात सन २००४ ते २००९ या कालावधीत योजनांमध्ये सहा हजार कोटींचा घोटाळाप्रकरणी दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. आता पोलिसांनी दोषींविरूद्ध आरोपांची कागदपत्रे मागविली असून, नाशिक येथून ती जुळवाजुळव केली जात आहे.माजी न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेतील चौकशी समितीने सलग चार वर्षे ‘ट्रायबल’ घोटाळाप्रकरणी चौकशी करून ४७६ दोषींवर फौजदारी कारवाई प्रस्तावित केली आहे. यात नाशिक, नागपूर, ठाणे व अमरावती चार अपर आयुक्त क्षेत्रांतर्गत प्रकल्प काार्यलय स्तरावरील अधिकारी, कर्मचाºयांचा समावेश आहे. गायकवाड समितीने ज्यांचेवर दोषी असल्याचा ठपका ठेवला, त्यांचेशी निगडित मूळ अभिलेखे, कागदपत्रे स्कॅनिंग करून नाशिक येथील आयुक्त कार्यालयात पोलीस बंदोबस्तात ठेवली आहे. त्याकरिता २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात असल्याची माहिती आहे. अमरावती अपर आयुक्त क्षेत्रांतर्गत एसआयटीने ३५ दोषींविरूद्ध फौजदारी कारवाईसाठी नावे निश्चित केली आहे. यात धारणी, अकोला पोलिसात प्रत्येकी दोन गुन्हे यापूर्वीच नोंदविले आहे. तसेच नागपूर क्षेत्रांतर्गत ६७ दोषींवर गुन्हे दाखल होणार आहे. आतापर्यंत नागपूर क्षेत्रात पाच दोषींवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. परंतु, नाशिक व ठाणे अपर आयुक्त क्षेत्रांतर्गत दोषींवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया मंदावल्याने गत आठवड्यात आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून कानउघाडणी केली. मात्र, पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या दोषींविरूद्ध पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली आहे. त्यामुळे अपर आयुक्त स्तरावरून पोलिसांना दोेषींविरूद्धची आवश्यक कागदपत्रे, मूळ अभिलेखे पाठविण्यास प्रारंभ झाला आहे. यापूर्वी वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या दोषी अधिकाºयांना विभागीय चौकशीसाठी नोटीस बजावल्या होत्या. त्यापैकी नागपूर अपर आयुक्त क्षेत्रात पाच जणांनी खुलासा पाठविल्याची माहिती आहे.    मुंबई उच्च न्यायालयाकडून महिनाभर दिलासाआदिवासी विकास विभागात घोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने १० जुलै २०१८ रोजी सिव्हिल अप्लिेकशन क्रमांक ७५१५/२०१८ अन्वये सुनावणीदरम्यान दोषींवर गुन्हे, विभागीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाला दिले होते. मात्र, याप्रकरणी उच्च न्यायालयाने सुनावणी लांबणीवर टाकल्याने दोषींविरूद्ध कार्यवाहीसाठी महिनाभर दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांनी दोषींविरूद्धच्या कारवाईने वेग घेतला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती