शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

पीडीएमसीतील बालरोग विभाग निवासी डॉक्टरविनाच

By admin | Updated: July 10, 2017 00:07 IST

नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणानंतर येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातील बालरोग विभागावर मरगळ आल्याचे दिसून येत आहे.

एनआयसीयूला कुलूप : नवजात शिशू मृत्यूप्रकरणाचा धसकालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणानंतर येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातील बालरोग विभागावर मरगळ आल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बालरोग विभागात आठ ते दहा रुग्ण दाखल आहेत. मात्र, निवासी डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे ईमर्जन्सीसाठी वरिष्ठ डॉक्टरांनाच कॉल करून बोलाविले जात असल्याचे निरीक्षण ‘लोकमत’ने बालरोग विभागाचा आढावा घेतल्यानंतर नोंदविले आहे. हीच स्थिती राहिल्यास आणखी बालमृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २९ मे रोजी मध्यरात्री चार शिशुंचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला होता. निवासी चिकित्सकांनी बालरोग विभागात २४ तास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांचे पद निर्माण करण्यात आले आहे. आकस्मिक सेवेसाठी निवासी डॉक्टर उपलब्ध असल्यास रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा पुरविली जाऊ शकते. मात्र, उपरोक्त चार शिशुंच्या मृत्युच्यावेळी एनआयसीयूत निवासी डॉक्टर उपलब्ध नव्हते. चुकीचे इंजेक्शन दिल्यापासून तर शिशुंच्या मृत्युपर्यंत कोणत्याही डॉक्टरांनी एनआयसीयूकडे लक्ष न दिल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. आता महिना ओलांडला असून अद्यापही बालरोग विभागाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. ‘लोकमत’ने पीडीएमसीच्या बालरोग विभागाचा रविवारी आढावा घेतला असता त्या ठिकाणी आठ ते दहा बाळ दाखल असल्याचे दिसून आले. परिचारिकांना डॉक्टरांविषयी विचारणा केली असता निवासी डॉक्टर उपलब्ध नसून वरिष्ठ डॉक्टरांना कॉल करून बोलाविण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे एखाद्या बाळाची प्रकृती बिघडल्यास त्याला तत्काळ आरोग्यसेवा मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे. बालरोग विभागात तीन सत्रात तीन कनिष्ठ निवासी चिकित्सक व एक वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ आवश्यक आहे. मात्र, पीडीएमसीत तुर्तास तशी स्थिती नसल्याचे आढळून आले. निवासी डॉक्टरांनी राजीनामे दिल्यामुळे त्यांच्या जागी अन्य निवासी डॉक्टर येण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. दोन बालरोगतज्ज्ञांचा राजीनामापीडीएमसीतील बालरोग विभागात कार्यरत दोन बालरोगतज्ज्ञांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. ३ जुलै रोजी बालरोगतज्ज्ञ ऋषिकेश घाटोळ व कौस्तुभ देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून बालरोगतज्ज्ञांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.