शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पीडीएमसीतील बालरोग विभाग निवासी डॉक्टरविनाच

By admin | Updated: July 10, 2017 00:07 IST

नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणानंतर येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातील बालरोग विभागावर मरगळ आल्याचे दिसून येत आहे.

एनआयसीयूला कुलूप : नवजात शिशू मृत्यूप्रकरणाचा धसकालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणानंतर येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातील बालरोग विभागावर मरगळ आल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बालरोग विभागात आठ ते दहा रुग्ण दाखल आहेत. मात्र, निवासी डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे ईमर्जन्सीसाठी वरिष्ठ डॉक्टरांनाच कॉल करून बोलाविले जात असल्याचे निरीक्षण ‘लोकमत’ने बालरोग विभागाचा आढावा घेतल्यानंतर नोंदविले आहे. हीच स्थिती राहिल्यास आणखी बालमृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २९ मे रोजी मध्यरात्री चार शिशुंचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला होता. निवासी चिकित्सकांनी बालरोग विभागात २४ तास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांचे पद निर्माण करण्यात आले आहे. आकस्मिक सेवेसाठी निवासी डॉक्टर उपलब्ध असल्यास रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा पुरविली जाऊ शकते. मात्र, उपरोक्त चार शिशुंच्या मृत्युच्यावेळी एनआयसीयूत निवासी डॉक्टर उपलब्ध नव्हते. चुकीचे इंजेक्शन दिल्यापासून तर शिशुंच्या मृत्युपर्यंत कोणत्याही डॉक्टरांनी एनआयसीयूकडे लक्ष न दिल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. आता महिना ओलांडला असून अद्यापही बालरोग विभागाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. ‘लोकमत’ने पीडीएमसीच्या बालरोग विभागाचा रविवारी आढावा घेतला असता त्या ठिकाणी आठ ते दहा बाळ दाखल असल्याचे दिसून आले. परिचारिकांना डॉक्टरांविषयी विचारणा केली असता निवासी डॉक्टर उपलब्ध नसून वरिष्ठ डॉक्टरांना कॉल करून बोलाविण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे एखाद्या बाळाची प्रकृती बिघडल्यास त्याला तत्काळ आरोग्यसेवा मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे. बालरोग विभागात तीन सत्रात तीन कनिष्ठ निवासी चिकित्सक व एक वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ आवश्यक आहे. मात्र, पीडीएमसीत तुर्तास तशी स्थिती नसल्याचे आढळून आले. निवासी डॉक्टरांनी राजीनामे दिल्यामुळे त्यांच्या जागी अन्य निवासी डॉक्टर येण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. दोन बालरोगतज्ज्ञांचा राजीनामापीडीएमसीतील बालरोग विभागात कार्यरत दोन बालरोगतज्ज्ञांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. ३ जुलै रोजी बालरोगतज्ज्ञ ऋषिकेश घाटोळ व कौस्तुभ देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून बालरोगतज्ज्ञांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.