शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

रस्ते तुम्ही खराब करता अन दुरूस्ती आम्ही करावी का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

जिल्हा परिषद आमसभा;अधिकाऱ्यावर अध्यक्ष संतापले अमरावती: जिल्हा परिषदेच्या मालकीचे तसचे गत दोन वर्षापासून ग्रामीण भागातील रस्ते कुठलीही एनओसी न ...

जिल्हा परिषद आमसभा;अधिकाऱ्यावर अध्यक्ष संतापले

अमरावती: जिल्हा परिषदेच्या मालकीचे तसचे गत दोन वर्षापासून ग्रामीण भागातील रस्ते कुठलीही एनओसी न घेता वापरण्यात आले.यावर एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनीदिलेली उडवाउडवीचे उत्तरे तसेच गत दोन वर्षापासून वैयक्तीक लाभाच्या योजनेचा लाभाचे अनुदान न दिल्याने या विषयांवर शुक्रवारी जिल्हा परिषद आमसभेत सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते.अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला प्रारंभ होत आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचे उखडलेल्या रस्त्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.जि.प.चे २६ रस्ते खराब झाले असून एमएसआरडीसी कडून बोटावर मोजण्या इतकेच रस्ते थातुर मातूर दुरूस्त केले.यावर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी या विभागाने सभागृहात दिलेली माहिती यादी चुकीचे असल्याचे सांगत आमचे रस्ते विनापरवानगी खराब तुम्ही करायचे अन दुरूस्ती आम्ही करायची का असे खडेबोल सुनावत अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले.

अंजनगाव बारी परिसरात हायब्रीड इन्युटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्ताची कामे अतिशय निकृष्ठ पध्दतीने करण्यात आल्याचा आरोप सदस्य दिनेश टेकाम यांनी केला.अतिभार वाहतुकीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांचे पोच रस्ते खराब केला असतांना संबंधित यंत्रणेकडून गावात येण्या जाण्याचे रस्तेही दुरूस्त केले नाहीत.यात ६७ लाख रूपयाचे रस्ते खराब झाले आहेत.विशेष म्हणजे जि.प. एनओसी घेतली नसतांना रस्ते वापरणाऱ्या यंत्रणेकडून तात्काळ दुरूस्त करून घ्यावे असे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत. याशिवाय सभेत रोजगार हमी,शिक्षण,पाणी पुरवठा,कृषी आदी विभागाचेही प्रश्न गाजले. यावेळी सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती बाळासाहेब हिंगणीकर,दयाराम काळे,पुजा आमले,सदस्य प्रताप अभ्यंकर,रविंद्र मुंदे,नितीन गोंडाणे, वासंती मंगरोळे,महेंद्र गैलवार,शरद मोहाेड,दत्ता ढोमणे,गौरी देशमुख,सुहासिनी ढेपे,जयंत देशमुख आदीसह सीईओ तुकाराम टेकाळे,कॅफो चंद्रशेखर खंडारे,डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी आदी उपस्थित होेत.

बॉक्स

कोरोना योध्दाना वेतन वाढ द्या

कोरोनाच्या संकटकाळात आराेग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला जिव धोक्यात टाकून रूग्ण सेवा दिली आहे.त्याचे कितीही सत्कार केल्याने समाधान होणार नाही.त्यामुळे त्याच्या कार्याची दखल घेत आरोग्य विभागातील कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ द्यावी असा प्रस्ताव सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी सभागृहात मांडला.यावर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी यावर ठराव पारीत करून शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

बॉक्स

बदलीप्रक्रियेत गोलमाल

महिला व बालकल्याण विभागातंर्गत अंगणवाडी पर्यवेक्षकांच्या बदली प्रक्रियेत अनियमिता झाल्याचा आरोप सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे.आदिवासी क्षेत्रात झालेल््या बदली प्रक्रियेत मोठया प्रणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.