शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आभाळमाया पाझरेना

By admin | Updated: July 11, 2017 00:06 IST

तुरळक पावसाचा अपवाद वगळता जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडलाच नसल्याने पेरणी करून चुकलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पावसाची प्रदीर्घ दडी : दोन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे सावटलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तुरळक पावसाचा अपवाद वगळता जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडलाच नसल्याने पेरणी करून चुकलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऐन पावसाळ्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू असल्याने पेरणी झालेल्या साडेतीन लाख हेक्टरपैकी किमान दोन लाख हेक्टरमधील पेरणीला मोड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.आज ना उद्या पाऊस येईल या आशेपोटी शेतकऱ्यांनी पेरणी केली.मात्र, हवामान खात्याचा अंदाज, पंचागकर्त्यांचे भाकित खोटे ठरले. आभाळमायेला पाझर फुटलाच नाही. त्यामुळे बळीराजावर आरिष्ट ओढवले आहे. बियाणे, खतांची दुकाने देखील ओस पडली. मृगाचा मेंढा अन् आर्द्राच्या भरवशाच्या म्हशीने सुद्धा दगा दिल्याने पुनर्वसुच्या कोल्ह्यावर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, लबाड कोल्ह्याने देखील शेतकऱ्यांशी दगा केल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. आठ ते दहा जून दरम्यान तुरळक पावसाची सुरूवात झाल्यानंतर आता मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करीत हवामान खात्याने स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र नंतर पावसाने दिलेल्या धक्क्यातून हवामान विभागासह तज्ञही सावरले नाहीत. हवामानाच्या या अंदाजावर विसंबून पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांंना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सात लाख २८ हजार ११२ हेक्टर सरासरी क्षेत्र कृषी विभागाद्वारे प्रस्तावित असून त्यातुलनेत सध्या साडेतीन लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यामध्ये संरक्षित सिंचनाची सुविधा असणारे किमान एक लाख हेक्टर क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रावर दुबार पेरणीचे सावट आहे. बिजांकुरण झालेली ईवलीशी रोपे माना टाकत आहेत. त्या रोपट्यांना ओंजळीने पाणी देऊन जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पावसाचा प्रदीर्घ खंड असल्याने तूर वगळता ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडिदाचे क्षेत्र आता बाद झाले आहे. सोयाबीन पेरणीसाठी देखील याच आठवड्याचा कालावधी असल्याने पावसाचा ताण अधिक असल्यास हे क्षेत्र अल्पकालावधीत उत्पन्न देणाऱ्या कपाशीक्षेत्रात परीवर्तीत होण्याची शक्यता आहे.आर्द्रता नसल्याने पिके कोमेजलीपावसाची दडी असल्याने दिवसाचे तापमानही वाढले आहे. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. ज्याठिकाणी पेरणी आटोपल्या व थोडक्या आर्द्रतेवर बिजांकुरण झाले, तेथील ईवली रोपे माना टाकत आहेत. बिंजाकुराचे प्रमाण देखील कमी असल्याने उभ्या पिकात शेतकरी नांगर फिरवित असल्याचे विदारक चित्र आहे.१४ जूनपर्यंत अशीच राहणार स्थिती अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र किंवा द्रोणीय स्थिती नसल्याने विदर्भात तुरळक वगळता जोरदार पावसाची शक्यता नाही. ही स्थिती १४जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. पूर्व-मध्य उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून चार किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. विदर्भात पाऊस बरसण्यासाठी शक्तीशाली हवामानाची स्थिती नसल्याने १३ व १४ जुलै रोजी तुरळक पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.अपेक्षित सरासरीच्या ४९ टक्केच पाऊसजिल्ह्यात जून ते सप्टेंबर याकालावधीत ८१४ मि.मी. तर एक ते १० जून या कालावधीत २३५.२ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ११७.२ मि.मी. पाऊस पडला. ही टक्केवारी ४९.५ इतकी असून हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १४.४ टक्के इतका आहे. भातकुली, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार व दर्यापूर तालुक्यात अद्याप १०० मि.मी.च्या आत पाऊस असल्याने पेरण्या धोक्यात आल्या आहेत.तूर वगळता कडधान्य होणार बादपावसाचा प्रदिर्घ खंड असल्याने तूर वगळता ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडिदाचे क्षेत्र बाद आता कालावधी झाल्याने बाद झाले आहे. सोयाबीन पेरणीचा कालावधी देखील हाच आठवडा असल्याने पावसाची तान अधिक असल्यास हे क्षेत्र अल्प कालावधीत उत्पन्न देणाऱ्या कपाशी क्षेत्रात परिवर्तीत होण्याची शक्यता आहे.