शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आमचं कुंकू पुसू नका!

By admin | Updated: January 22, 2015 00:19 IST

राज्य शासनाने मंगळवारी चंद्रपूर जिल्हा दारुबंदी करण्याची ऐतिहासिक घोषणा करुन महिलांच्या मागणीला न्याय दिला.

अमरावती : राज्य शासनाने मंगळवारी चंद्रपूर जिल्हा दारुबंदी करण्याची ऐतिहासिक घोषणा करुन महिलांच्या मागणीला न्याय दिला. या निर्णयाचे सर्वच स्तरावर स्वागत होत असताना स्थानिक नवसारी परिसरात असलेले देशी दारु विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्यासाठी बुधवारी महिलांनी जिल्हाकचेरीवर धाव घेतली. ‘साहेब, दारुचे दुकान बंद करा, आमचे कुंकू वाचवा’ अशी हार्त हाक त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली.काही दिवसांपूर्वी येथील वडाळीत सुरु असलेले देशी दारु विक्रीचे दुकान महिलांच्या संघटित आंदोलनाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बंद करायलो लावले. वडाळी येथील दारुबंदी आंदोलनाची दखल न्यायालय, राज्य शासनाला घ्यावी लागली. वडाळी येथील महिलांनी दारुबंदीसाठी केलेल्या आंदोलनाची प्रेरणा घेत स्थानिक नवसारी येथील बचत गटातील महिलांनीदेखील आंदोलनाला सुरूवात केली आहे. देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी त्या एकवटल्या आहेत. या दारु विक्रीच्या दुकानापासून सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याची गाऱ्हाणी मांडताना काही महिलांनी ‘आमचे नवरे काम धंदा काही करीत नाहीत, केवळ दिवसभर दारु ढोसण्यातच मग्न असतात. मुला-बाळांचे शिक्षण, संगोपन कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सतत दारु पीत असल्याने काही जण मृत्यूच्या दाढेत आहेत. त्यामुळे साहेब, आमचे कुंकू पुसू नका’ असा सवाल उपस्थित करुन देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. या दारु विक्रीच्या दुकानामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. मुलींना रस्त्यावरुन ये- जा करणे कठीण झाले आहे. परिसरात डी.एड., नर्सिंग प्रशिक्षण केंद्र तसेच महापालिकेची शाळा आहे. या परिसर कामगार, मजूर वस्तीचा भाग आहे. दारु पिण्याच्या वादातून अनेक घरांमध्ये पती, पत्नीत वाद होत आहेत. मुलांचे शिक्षण, आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहेत. पती, पत्नीच्या वादातील तक्रारी या पोलिसात पोहोचत आहेत. विशेषत: या दारु विक्रीच्या दुकानापासून महिला त्रस्त झाल्या असून सामाजिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी हे दुकान कायम हद्दपार करण्यात यावे, अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा महिलांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना अमोल इंगळे, दीपक सरदार, मनोज थोरात यांच्या नेतृत्वात दिले आहे. यावेळी मीरा तायडे, प्रतिभा ढोके, अनुसया वाघमारे, शीला नाईक, संध्या इंगळे, संगीता नितनवरे, वृषाली गायकवाड, पार्वता गायकवाड, चंद्रकला गायकवाड, कमला जामनिक, कंचना इंगळे, कविता तानोडे, राज्यकन्या तानोडे, सविता तायडे, आशा गायकवाड, ताईबाई गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)