शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तूर खरेदीसाठी ठराविक मुदत ठेऊ नका

By admin | Updated: April 27, 2017 00:16 IST

शासनाने तूर खरेदी केंद्र बंद करून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. शेतकऱ्यांची तूर मोठ्या संख्येने बाजारपेठेत मोजणी अभावी पडून आहे.

शेतकऱ्यांची मागणी : कृषिमंत्र्यांचे विधान चुकीचेच चांदूरबाजार : शासनाने तूर खरेदी केंद्र बंद करून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. शेतकऱ्यांची तूर मोठ्या संख्येने बाजारपेठेत मोजणी अभावी पडून आहे. तर त्याहून अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरात साठवून ठेवली आहे. ही सर्व तूर शासनाने हमी भावाने खरेदी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चांदूर बाजार बाजार समितीमध्ये १२९० शेतकऱ्यांची २९ हजार ४८९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली तर बाजार समितीमध्ये मोजणी अभावी २५ हजार पोते तूर तशीच पडून आहे. आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यावर मोजणी सुरू करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत शेकऱ्यांच्या घरात असलेली तूर पूर्णत: खरेदी केली जात तो पर्यंत तूर खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी बाजार समितीमध्ये असलेले शेतकरी करीत आहेत. वारंवार तूर खरेदी केंद्र बंद राहिल्याने शेतकऱ्यांना तूरविक्रीसाठी महिनाभर रांगेत ताटकळावे लागले. परिणामी अनेक खरेदी केंद्रांच्या बाहेर तुरीने भरलेल्या वाहनांच्या रांगा आजही मोजमापाच्या प्रतीक्षेत दिसून येतात. त्यामुळे हजार मेट्रिक टन तूर सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या घरात व खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी पडून आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी खरेदी केंद्रावर पडून असलेली तूर ही व्यापाऱ्यांची असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यांचा आरोप शेतकऱ्यांना मान्य नाही. बाजार समितीमधील वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. शासकीय तूर खरेदी बंद झाल्याची बातमी कळताच तूर उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. आ. कडू यांनी तर तूर खरेदीसाठी शासन व प्रशासनलाच कोंडीत पकडले आहे. यामुळे धास्ती घेऊन चांदूर बाजार समितीमध्ये तूर खरेदी सुरू झाली.मात्र कृषीमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे शेतकरी आंदोलनाचा पावित्रा घेऊ शकतात. तूर खरेदीसाठी मुदत नको अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकरी आपल्या मालाची मोजणी कधी होणार असा प्रश्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तूर खरेदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आमची तूर अजुनही तशीच पडून आहे. तूर खरेदी झाली नाही तर आंदोलनाचा पावित्रा घेऊ.-बबलू देशमुख, शेतकरी बेलोराआ. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश मिळाले आहेत. बाजार समितीमध्ये पडून असलेला सर्व २३ हजार क्विंटल माल खरेदी करणार आहोत. -विनोद जवजाळ. संचालक, बाजार समिती