शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीसाठी ठराविक मुदत ठेऊ नका

By admin | Updated: April 27, 2017 00:16 IST

शासनाने तूर खरेदी केंद्र बंद करून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. शेतकऱ्यांची तूर मोठ्या संख्येने बाजारपेठेत मोजणी अभावी पडून आहे.

शेतकऱ्यांची मागणी : कृषिमंत्र्यांचे विधान चुकीचेच चांदूरबाजार : शासनाने तूर खरेदी केंद्र बंद करून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. शेतकऱ्यांची तूर मोठ्या संख्येने बाजारपेठेत मोजणी अभावी पडून आहे. तर त्याहून अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरात साठवून ठेवली आहे. ही सर्व तूर शासनाने हमी भावाने खरेदी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चांदूर बाजार बाजार समितीमध्ये १२९० शेतकऱ्यांची २९ हजार ४८९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली तर बाजार समितीमध्ये मोजणी अभावी २५ हजार पोते तूर तशीच पडून आहे. आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यावर मोजणी सुरू करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत शेकऱ्यांच्या घरात असलेली तूर पूर्णत: खरेदी केली जात तो पर्यंत तूर खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी बाजार समितीमध्ये असलेले शेतकरी करीत आहेत. वारंवार तूर खरेदी केंद्र बंद राहिल्याने शेतकऱ्यांना तूरविक्रीसाठी महिनाभर रांगेत ताटकळावे लागले. परिणामी अनेक खरेदी केंद्रांच्या बाहेर तुरीने भरलेल्या वाहनांच्या रांगा आजही मोजमापाच्या प्रतीक्षेत दिसून येतात. त्यामुळे हजार मेट्रिक टन तूर सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या घरात व खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी पडून आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी खरेदी केंद्रावर पडून असलेली तूर ही व्यापाऱ्यांची असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यांचा आरोप शेतकऱ्यांना मान्य नाही. बाजार समितीमधील वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. शासकीय तूर खरेदी बंद झाल्याची बातमी कळताच तूर उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. आ. कडू यांनी तर तूर खरेदीसाठी शासन व प्रशासनलाच कोंडीत पकडले आहे. यामुळे धास्ती घेऊन चांदूर बाजार समितीमध्ये तूर खरेदी सुरू झाली.मात्र कृषीमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे शेतकरी आंदोलनाचा पावित्रा घेऊ शकतात. तूर खरेदीसाठी मुदत नको अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकरी आपल्या मालाची मोजणी कधी होणार असा प्रश्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तूर खरेदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आमची तूर अजुनही तशीच पडून आहे. तूर खरेदी झाली नाही तर आंदोलनाचा पावित्रा घेऊ.-बबलू देशमुख, शेतकरी बेलोराआ. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश मिळाले आहेत. बाजार समितीमध्ये पडून असलेला सर्व २३ हजार क्विंटल माल खरेदी करणार आहोत. -विनोद जवजाळ. संचालक, बाजार समिती