शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

भक्तीधागा उसवू नये !

By admin | Updated: May 6, 2017 00:04 IST

अंबादेवीच्या अंगाऱ्यात पाल आढळली. श्रद्धेने, विश्वासाने जेथे मान झुकते-

प्रासंगिक

गणेश देशमुखअमरावती : अंबादेवीच्या अंगाऱ्यात पाल आढळली. श्रद्धेने, विश्वासाने जेथे मान झुकते- त्या आई अंबेच्या आशीर्वादाचे स्वरूप असलेल्या अंगाऱ्यात विषारी प्राणी, कीटक संचार करीत असतील तर तो भाविकांच्या विश्वासाशी होणारा घातच नव्हे काय?आई अंबेच्या दर्शनासाठी जाणारे भाविक घरून निघतानाच श्रद्धेच्या सागरात आकंठ डुंबलेले असतात. अंबामाईच्या चरणांशी भाविक माथा टेकतात, त्यावेळी जणू हृदय ओंजळीत ठेवून तेही अर्पण केले जाते! भावनांनी ओथंबलेल्या त्या क्षणी अंगाऱ्याचे महत्त्व अर्थातच अनन्यसाधारण. ज्या वास्तूत आई अंबेचे वास्तव्य आहे, त्या वास्तुबाबत आणि आई अंबेच्या भक्तीप्रक्रियेशी जुळलेल्या हरेक वस्तुबाबत पवित्रतेचा तोच ओसंडून वाहणारा भाव भाविकांच्या रोमारामातून उत्सर्जित होत असतो. मंदिरात जे-जे काही आहे ते-ते पवित्रच, हा भाव त्या क्षणांना प्रबळ असतो. अंगारा, प्रसाद, तीर्थ या प्रसादांच्या विविध रुपांच्या माध्यमातून शरीरात पवित्र शक्तीचा प्रवेश आणि संचार होतो, असा दुर्दम्य विश्वास बाळगून प्रसाद, अंगारा, तीर्थ ग्रहण केले जाते. परंतु त्या अंगाऱ्यातच विष असेल तर? विचारही करवत नाही ना! पण हे प्रत्यक्षात घडले आहे. अंबादेवीच्या अंगारापात्रात विषारी मानल्या जाणाऱ्या पालीचे पिलू आढळून आले आहे. काळजात धस्स व्हावे, असा हा प्रकार वाढदिवसाची शुभ सुरुवात करण्यासाठी म्हणून सहकुटुंब अंबामंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भक्ताच्याच लक्षात आला. पोटच्या चिमुकल्यांनी तो अंगारा जिव्हेवर ठेवला होता. त्यांना काही झाले तर नसेल ना, अशी चिंता बाप म्हणून त्या भक्ताच्या काळजात चर्रर्र करून गेली. त्या सजग भक्ताने अंगाऱ्यातील पाल कॅमेऱ्यात कैद केली. देणगी काऊंटरवर सूचनाही दिली. अंबादेवी संस्थानचा कारभार नियमसंगतपणे चालविण्याची जबाबदारी काही मंडळींनी स्वीकारली आहे. ही कायदेशीर जबाबदारी स्वीकारणारी मंडळी भक्तांंना विषमुक्त, किटकमुक्त, प्रदूषणमुक्त, संक्रमणमुक्त अंगारा, प्रसाद आणि तीर्थ पुरविण्यास बांधिल आहेत. अंबेच्या मंदिराचा कारभार सांभाळण्याची संधी हा मिरविण्याचा मुद्दा नसून तो असंख्य भक्तांच्या सोई-सुविधा उभारण्यासाठीची स्वीकारलेली जबाबदारी होय. उभे राहणेही न शिकलेल्या बाळाला अंबादेवीच्या पात्रातील अंगारा विश्वासाने चाटविला जातो. निरागसांपासून तर मरणशय्येवर खिळलेल्यांच्या पोटात शिरणाऱ्या अंगाऱ्यात कुठलाही घातक घटक नसावाच, याची जबाबदारी ही मंदिराच्या कारभारावर देखरेख ठेवणाऱ्या तमाम लोकांची आहे. कायद्याच्या चाकोरीत आणि आई अंबेच्या साक्षीने स्वीकारलेल्या या जबाबदारीची जाणीव किमान या घटनेनंतर तरी व्हावी. अंगाऱ्याच्या पात्राची सुरक्षा कशी करता येईल, यासाठी तातडीने उपाय योजणे आणि भाविकांचा मंदिराशी जुळलेला भक्तीधागा कुठेही उसवला जाऊ नये, यासाठीची जबाबदारी लिलया पार पाडणे, याक्षणीचे आद्यकर्तव्य ठरावे.