शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मंडळात कपाशी नाही काय; आमदारद्वय संतापले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:22 IST

अहवालात वगळण्यात आलेल्या पाच तालुक्यांतील ४५ महसूल मंडळात कपाशीचे क्षेत्र नाही काय, असा सवाल करीत आ. यशोमती ठाकूर व आ. वीरेेंंद्र जगताप यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला जाब विचारला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब : अहवालात पाच तालुक्यांना वगळले

आॅनलाईन लोकमतअमरावती :  अहवालात वगळण्यात आलेल्या पाच तालुक्यांतील ४५ महसूल मंडळात कपाशीचे क्षेत्र नाही काय, असा सवाल करीत आ. यशोमती ठाकूर व आ. वीरेेंंद्र जगताप यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला जाब विचारला. या क्षेत्राचे पुन्हा सर्वेक्षण करून ते अहवालात समाविष्ट करण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना केली.शासनाने शब्दच्छल केल्यामुळे जिल्ह्यात ‘एनडीआरएफ’चा ७९ कोटींचा मदतनिधी कमी मिळणार असल्याचे वृत्त रविवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. एका महिन्यातील दोन अहवालांतील फरक जनदरबारात मांडताच आ. यशोमती ठाकूर व आ. वीरेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन बोंड अळी नुकसानभरपाईत अमरावती, भातकुली, चांदुर रेलवे हे तालुके वगळल्याबाबत विचारणा केली. याविषयीची चौकशी करण्यात येऊन या पाचही तालुक्यांतील एकही बाधित शेतकरी वंचित राहू नये, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.पीक कापणी प्रयोगात पाच वर्षांच्या उत्पन्नाच्या सरासरीवर आधारित निकष असताना एका महिन्यात दोन वेळा अहवाल मागवून मदतीच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप आमदारांनी केला. याचबरोबर ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपीट, वादळी पावसामुळे बाधित शेतकºयांंना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड, तिवसा नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे, अमरावती तालुकाध्यक्ष वीरेंद्रसिंह जाधव, भातकुली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मुकद्दरखाँ पठाण, युवक काँग्रेस अध्यक्ष हरीश मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप काळबांडे, माजी जि.प. सदस्य प्रकाश माहुरे, भातकुली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश महिंगे, यावली सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष पंकज देशमुख, पूर्णानगर येथील माजी सरपंच सुनील अग्रवाल, उपसरपंच संजय चौधरी, उपसरपंच पवन काळमेघ, सुधीर बोबडे, प्रद्युम पाटील, अंकुश बनसोड, सतीश विरुळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अत्यंत असंवेदनशील व बेजबाबदार असणारे हे शासन आहे. बियाणे कंपन्या सरकारला मदत करीत असल्याने त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला जात आहे. निव्वळ घोषणाबाजी सुरू आहे.- यशोमती ठाकूरआमदार, तिवसा.विरोधी पक्षाचे आमदार असलेल्या तालुक्यांना डावलले. या ४५ मंडळात कपाशीचे क्षेत्र नाही काय? सरकार हेकेखोरपणे वागत आहे. त्यांच्या शेतकरीविरोधी चेहरा समोर आला आहे. अधिवेशनात जाब विचारू.- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगावरेल्वेशासन शेतकऱ्यांमध्ये पक्षपात करीत आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत अन् पीक विम्याच्या भरपाईविषयी केवळ घोषणा करण्यात आली प्रत्यक्षात कृती नाही. पाच तालुक्यांना डावलण्याचे राजकीय षड्यंत्र आहे.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जि.प.