शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

प्यायलाच पाणी नाही, तेथे फिल्टर करणार काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:23 IST

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर १० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असताना त्यावर साधा ब्र काढायला पांढरपेशांना वेळ नाही.

ठळक मुद्देतहानलेले नंदनवन : जलशुद्धीकरणाला ३.५० कोटी

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर १० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असताना त्यावर साधा ब्र काढायला पांढरपेशांना वेळ नाही. दुसरीकडे जलशुद्धीकरणासाठी शासनाने तीन कोटी ६० लक्ष रुपये मंजूर केले. मात्र पाणीच नाही तेथे कुणाला फिल्टर करायचे म्हणायची वेळ आली आहे.चिखलदरा शहराला अनेक वर्षांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सतत लावून धरले. त्यावर ३ महिन्यांपूर्वी ३ कोटी ५९ लक्ष रुपये खर्चून जलशुद्धीकरण, साडेपाच किलोमीटर लांबीची गावातील जुनी पाईपलाईन काढून ९० ते ११० मि.मी. व्यासाची पाईपलाईन आदी कामे केली जाणार आहेत. कालापाणी तलावावर जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जाणार आहे. मात्र शहराला पाणीपुरवठा करणारे सक्कर तलाव आणि काला पाणी या दोन्ही साठवण तलावांची अवस्था पालथ्या घागरीवर पाणी टाकण्यासारखी आहे. पावसाच्या पाण्यामुळे तलाव एकीकडे भरत असताना दुसरीकडे दोन्ही तलावांना असलेले लिकेजमुळे ते रिकामे होतात. परिणामी जलशुद्धीकरण केंद्र तयार होत असल्याची आनंददायी बाब असताना पाणीच नाही. तेथे कुणाला फिल्टर करणार, असा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी चिखलदरा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.विस्तारीकरणाची गरजराज्यभर कोट्यवधी रुपयांच्या नितून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहे. चिखलदºयातील सक्कर तलाव आणि कालापाणी तलावाच्या पाणी गळतीसोबत विस्तारीकरणाची तत्काळ गरज आहे. पावसाळ्यातच या दोन्ही तलावाचे विस्तारीकरण जलयुक्त शिवारातून झाल्यास पाणी साठ्यात वाढत होणार आहे. मात्र हे करायला स्थानिय प्रशासन, नगरपरिषद, लोकप्रतिनिधी आदींचे वेळकाढू धोरण, विदर्भाच्या नंदनवनाची पाणी समस्या दूर करणार का, हे आज तरी अनुत्तरित आहे.जलशुद्धीकरणासाठी ३ कोटी ५९ लक्ष रुपयांचा निधी आला. त्यात पाईपलाईन आदी कामे असून निविदा अंतिम टप्प्यात आहे. कालापाणी तलावावर केंद्र होणार आहे.- शरद सिनकर,उपअभियंता, मजीप्रा, अंजनगाव