शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

दिरंगाई नकोच, यंत्रणांचे सहकार्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:27 IST

‘मागेल त्याला शेततळे’ ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. हा उपक्रम खारपाणपट्यासाठी मोठी उपलब्धी ठरत असल्याने या कामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, ....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : ३१ मार्चपूर्वी हवी शेततळ्यांची लक्ष्यांकपूर्ती

आॅनलाईन लोकमतअमरावती : .‘मागेल त्याला शेततळे’ ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. हा उपक्रम खारपाणपट्यासाठी मोठी उपलब्धी ठरत असल्याने या कामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत ३१ मार्चपावेतो लक्ष्यांकपूर्तीचा जिल्ह्याचा दृढनिश्चय असल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केली.या योजनेची कामे करण्यासाठी केवळ चार महिन्यांचा अवधी मिळतो. या अवधीत अधिकाधिक कामे करण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी ३० जून ही डेडलाइन असली तरी त्यापूर्वी ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण व्हावीत, यासाठी आपले प्रयत्न आहे. महसूल व कृषी विभागाच्या समन्वयातून कामे त्वरित करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यातील काही तालुक्यात योजनेचे काम माघारल्याची बाब जिल्हा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी गंभिरतेने घेत दर्यापूर, अंजनगाव सुर्जी भातकुली, अचलपूर व भातकुली या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वेतनवाढ तात्पुरत्या रोखण्याचे पत्र तर अन्य नऊ तालुक्यांतील कृषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने कृषी विभागात हडकंप माजला. जिल्हा प्रशासनाद्वारा खारपाणपट्यातील प्रत्येक कृषी सहायकाला ५०, तर उर्वरित भागातील प्रत्येक कृषी सहायकाला २५ शेततळ्यांचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात ४५०० शेततळ्यांचे लक्ष्यांक आहे. यातुलनेत ६,२२० अर्ज प्राप्त झाले. यापैकी ६,२१४ अर्जाचे सेवा शुल्क भरण्यात आले व ४,१८४ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. ४,१३६ शेततळ्यांच्या कामांसाठी आखणी करून देण्यात आलेली आहे.हा आहे कृषी अधिकाऱ्यांवर ठपकाशासनाच्या १० आॅक्टोबर २०१६ चे निर्देशानुसार उपक्रमाचे निर्धारित लक्ष्यांक दिलेले आहे व या कामांना प्रशासकीय मंजुरीदेखील प्रदान केली आहे. त्यातुलनेत शेततळ्यांची कामे सुरू नाहीत. याअनुषंगाने तालुकास्तरीय समितीचे सचिव म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची व वेळोवेळी आयोजित बैठकीत दिलेल्या आदेशांची अवहेलना आहे. ही गंभीर बाब आहे. शासनाचे १९ मार्च २०१६ च्या निर्र्णयान्वये जिल्हाधिकारी विभागप्रमुख घोषित केले आहे. याच अधिकाराच्या वापराने त्यांनी तात्पुरती कारवाई प्रस्तावित केली आहे.‘मागेल त्याला शेततळे’ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी व लोकोपयोगी उपक्रम आहे. यामध्ये दिरंगाई नकोच. यंत्रणांच्या समन्वयातून कामे व्हावीत, यावर आपला भर आहे.- अभिजित बांगर,जिल्हाधिकारी