शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन ठरले फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:30 IST

दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले. दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा उदोउदो केला होता.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस आक्रमक : बबलू देशमुखांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले. दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा उदोउदो केला होता. प्रत्यक्षात शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले यातून कसाबसा मार्ग काढला. त्यातही शेतमाल बेभावे विकवा लागत आहे, अशी बिकट परिस्थिती पहिल्यांदाच शेतकºयांवर आली आहे. या तीन वर्षांत या शासनाने शेतकºयांचे वाटोळे केले आहे. या तीन वर्षांत झाला तेवढा दु:खी शेतकरी कधीच झालेला नाही. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूंग आदी पिकांचे भाव कमालीचे घसरले आहे. १००० ते १५०० रूपये प्रतिक्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतीला लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतमालाला उत्पादन खर्चाच्यावर ५० टक्के भाव देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर दिलेले एकही आश्वासने पाळले नाही. त्याचमुळे शेतकºयांवर ही परिस्थिती ओढवली आहे. शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत असताना काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी शेतकºयांचे कर्जखाते नील केल्याचा उहापोह मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे शेतकºयांना ही दिवाळी चांगली जाणार, अशी अपेक्षा होती. परंतु जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा झालाच नाही. परिणामी शेतकºयांची दिवाळी अंधाराच गेली. ही शेतकºयांची फसवणूक नाही तर काय, असा प्रतिप्रश्न जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी उपस्थित केला.शेतकºयांना प्रतिक्विंटल १००० रुपये बोनस द्यासोयाबीनचे भाव ३००० रुपये असताना त्यांना १००० ते १५०० दराने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. संत्रा, तूर, उडीद, मूग पिकांची हीच स्थिती आहे. कापूसदेखील बेभाव विकला जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहे. शासनाला खरचं शेतकºयांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असल्यास व शेतकरी आत्महत्या थांबवावयाच्या असतील तर त्यांच्या पिकाला प्रति क्विंटल १००० रुपये बोनस द्या तसेच कापसाला ५०० रुपये बोनस द्यावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.