शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

दिवाळीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन ठरले फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:30 IST

दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले. दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा उदोउदो केला होता.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस आक्रमक : बबलू देशमुखांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले. दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा उदोउदो केला होता. प्रत्यक्षात शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले यातून कसाबसा मार्ग काढला. त्यातही शेतमाल बेभावे विकवा लागत आहे, अशी बिकट परिस्थिती पहिल्यांदाच शेतकºयांवर आली आहे. या तीन वर्षांत या शासनाने शेतकºयांचे वाटोळे केले आहे. या तीन वर्षांत झाला तेवढा दु:खी शेतकरी कधीच झालेला नाही. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूंग आदी पिकांचे भाव कमालीचे घसरले आहे. १००० ते १५०० रूपये प्रतिक्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतीला लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतमालाला उत्पादन खर्चाच्यावर ५० टक्के भाव देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर दिलेले एकही आश्वासने पाळले नाही. त्याचमुळे शेतकºयांवर ही परिस्थिती ओढवली आहे. शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत असताना काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी शेतकºयांचे कर्जखाते नील केल्याचा उहापोह मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे शेतकºयांना ही दिवाळी चांगली जाणार, अशी अपेक्षा होती. परंतु जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा झालाच नाही. परिणामी शेतकºयांची दिवाळी अंधाराच गेली. ही शेतकºयांची फसवणूक नाही तर काय, असा प्रतिप्रश्न जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी उपस्थित केला.शेतकºयांना प्रतिक्विंटल १००० रुपये बोनस द्यासोयाबीनचे भाव ३००० रुपये असताना त्यांना १००० ते १५०० दराने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. संत्रा, तूर, उडीद, मूग पिकांची हीच स्थिती आहे. कापूसदेखील बेभाव विकला जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहे. शासनाला खरचं शेतकºयांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असल्यास व शेतकरी आत्महत्या थांबवावयाच्या असतील तर त्यांच्या पिकाला प्रति क्विंटल १००० रुपये बोनस द्या तसेच कापसाला ५०० रुपये बोनस द्यावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.