शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन ठरले फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:30 IST

दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले. दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा उदोउदो केला होता.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस आक्रमक : बबलू देशमुखांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले. दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा उदोउदो केला होता. प्रत्यक्षात शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले यातून कसाबसा मार्ग काढला. त्यातही शेतमाल बेभावे विकवा लागत आहे, अशी बिकट परिस्थिती पहिल्यांदाच शेतकºयांवर आली आहे. या तीन वर्षांत या शासनाने शेतकºयांचे वाटोळे केले आहे. या तीन वर्षांत झाला तेवढा दु:खी शेतकरी कधीच झालेला नाही. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूंग आदी पिकांचे भाव कमालीचे घसरले आहे. १००० ते १५०० रूपये प्रतिक्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतीला लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतमालाला उत्पादन खर्चाच्यावर ५० टक्के भाव देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर दिलेले एकही आश्वासने पाळले नाही. त्याचमुळे शेतकºयांवर ही परिस्थिती ओढवली आहे. शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत असताना काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी शेतकºयांचे कर्जखाते नील केल्याचा उहापोह मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे शेतकºयांना ही दिवाळी चांगली जाणार, अशी अपेक्षा होती. परंतु जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा झालाच नाही. परिणामी शेतकºयांची दिवाळी अंधाराच गेली. ही शेतकºयांची फसवणूक नाही तर काय, असा प्रतिप्रश्न जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी उपस्थित केला.शेतकºयांना प्रतिक्विंटल १००० रुपये बोनस द्यासोयाबीनचे भाव ३००० रुपये असताना त्यांना १००० ते १५०० दराने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. संत्रा, तूर, उडीद, मूग पिकांची हीच स्थिती आहे. कापूसदेखील बेभाव विकला जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहे. शासनाला खरचं शेतकºयांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असल्यास व शेतकरी आत्महत्या थांबवावयाच्या असतील तर त्यांच्या पिकाला प्रति क्विंटल १००० रुपये बोनस द्या तसेच कापसाला ५०० रुपये बोनस द्यावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.