शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या दिवाळीत शासनाचाच खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यंदाची दिवाळी पाच दिवसांवर आली असतानाही शासनाद्वारे सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही. दिवाळीनंतर हमीभावाने ...

ठळक मुद्देसोयाबीन खरेदी दिवाळीपश्चात : बोंडअळी नुकसानाचे ६१ कोटी, नाफेडचे २५ कोटी केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाची दिवाळी पाच दिवसांवर आली असतानाही शासनाद्वारे सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही. दिवाळीनंतर हमीभावाने खरेदी करण्याचे सुतोवाच भाजपक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी परवा अमरावती येथे केले. यादरम्यान व्यापाऱ्यांनी सोयाबीनची खेडा खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनखर्चही पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाच्या घोषणा अन् आश्वासन ही शुद्ध लोणकढी थाप असल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदाच्या हंगामात शासनाद्वारे मुगाची ६ हजार ९७५, उडिदाची ५ हजार ६०० व सोयाबीनची ३ हजार ३९९ या हमीभावाने खरेदी करण्यात येणार असल्याचे पणन विभागाने स्पष्ट केले. यासाठी २५ सप्टेंबरपासून आॅनलाइन नोंदणी करण्याचे निर्देश डीएमओंना देण्यात आले. जिल्ह्यात तब्बल महिनाभर केंद्रे सुरू झालीच नाहीत. त्यामुळे नोंदणीसाठी दोन वेळा मुदतवाढ द्यावी लागली. आताही जिल्ह्यातील १२ पैकी चार केंद्रांवर तोकडी खरेदी करण्यात येत आहे. त्यातही गोदाम उपलब्ध नसल्याचे कारण सांगून शेतमाल रोखला जात आहे. मूग व उडिदाची ही परिस्थिती असताना, सोयाबीनची नोंदणी केवळ १५ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. अद्याप सोयाबीन खरेदीसंदर्भात यंत्रणेला आदेश नाहीत. दरम्यान, खा. दानवे यांनी दिवाळीनंतर सोयाबीनची खरेदी सुरू करणार असल्याचे स्पष्ट केल्याने शासनाची शेतकऱ्यांप्रति असलेली भूमिकाच स्पष्ट झालेली आहे.यंदा खरिपात कमी पावसामुळे पिकांची सरासरी उत्पादकता २० ते ८० टक्क्यांपर्यंत घटण्याचा अहवाल खुद्द कृषी विभागानेच शासनाला दिलेला आहे. उत्पादकतेचा अंदाज शासनाला असतानाही अद्याप हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालेली नाही. त्यामुळे सहा दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी पुन्हा व्यापाऱ्यांच्या दारावर चकरा मारायची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.प्रधान सचिवांचे आश्वासनही खोटेगतवर्षी नाफेडने खरेदी केलेल्या तूर व हरभºयाचा ३० कोटींचा चुकारा शासनाने अद्यापही केलेला नाही. मागील आठवड्यात पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी आठ दिवसांत शेतकऱ्यांना पेमेंट दिले जाईल, असे आश्वासन आ. वीरेंद्र जगताप यांना विभागीय आयुक्त कार्यालयात दिले होते. मात्र, त्यांच्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही.तूर, सोयाबीनचे अनुदान केव्हा?मागील हंगामात शासकीय खरेदीसाठी टोकन दिलेल्या, परंतु खरेदी न केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान शासनाने जाहीर केले. जिल्ह्यात किमान ५० हजार शेतकऱ्यांची तूर व हरभरा टोकन दिेल्यावरही खरेदी करण्यात आलेला नव्हता. मात्र, सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या याद्याच तयार झालेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनच गंभीर नसल्याने यंदाच्या दिवाळीतही अनुदान मिळणार नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.बोंडअळी नुकसानाचे ६१ कोटी कधी?गतवर्षी बोंडअळीच्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरमधील कपाशी उद्ध्वस्त झाली. शासनाने ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात १८० कोटींचा मदतनिधी आवश्यक असताना, शासनाने तीन टप्प्यांमध्ये अनुदान दिले. जिल्ह्यास अद्याप ६१ कोटींचे अनुदान प्राप्त झालेले नाही. दुसऱ्या हप्त्याचा निधी दोन महिन्यांपूर्वी वाटप झालेला असताना आणि तिसऱ्या हप्त्याचा निधी लगतच्या जिल्ह्यास उपलब्ध केलेला असताना अमरावती जिल्ह्याला डावलण्यात आले आहे.