शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दुरवस्थेने ग्रासले

By admin | Updated: July 7, 2015 00:17 IST

येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असले तरी नागरिकांना पुरेशा सोयी मिळत नाही.

चांदूरचे ग्रामीण रुग्णालयसुरेश सवळे ल्ल चांदूरबाजारयेथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असले तरी नागरिकांना पुरेशा सोयी मिळत नाही. इतकेच काय तर पाण्याच्या टाकीखाली घाण पाण्याचे डबके साचल्याने येथे काम करणाऱ्यांना तसेच रुग्णांना दूषित पाणी प्यावे लागते. आधीच रिक्त पदाने ग्रासलेल्या ग्रामीण रुग्णालयातील निवाशी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती, नाली बांधकाम व रंगरंगोटीसाठी आ. बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याने ५५ लक्ष रुपयांचा निधी बांधकाम विभागाला प्राप्त झाला होता. मात्र, कंत्राटदाराने थातूरमातूर दुरुस्ती करुन कशीबशी रंगरंगोटी करुन दिली तर नालीचे बांधकाम करताना त्यातील पाणी जाण्यासाठी आवश्यक उतार काढला नसल्यामुळे नालीमध्ये घाण पाणी तुडूंब साचले आहे. याचा परिणाम तेथील रहिवासी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. येथे काही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर काही कर्मचारी वेतन येथून घेतात व काम मात्र अमरावती मुख्यालयात करतात. रुग्णालयाला नियमित रुग्णवाहिका नसल्यामुळे अचलपूर रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरावी लागत आहे. येथील नियमित रुग्णवाहिकेच्या चालकाबद्दलही अनेक तक्रारी आहेत. येथे सहायक अधीक्षकांचे पद रिक्त आहे. औषधी निर्मात्याला सहाय्यक नसल्यामुळे औषध वितरण कधी काळी रखडले जाते. येथे कनिष्ठ लिपिकाचेही पद रिक्त आहे. डॉ. झामरकर यांच्या वैद्यकीय सेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. येथील आर.बी.एस.के.च्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती उपासे या गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर असल्याची बाब आढावा बैठकीत उघडकीस आली. येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी नसलेले वाटर कुलर आहेत. रुग्णांना पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नाही. ग्रामीण रुग्णालयातील परिसरात २३ निवासस्थाने बांधण्यात आली. त्यांच्या डागडुजीसाठी निधी प्राप्त झाला. मात्र रंगरंगोटी करुन थातूर मातूर दुरुस्ती करण्यात आली. निवासस्थानाच्या खिडक्यासुद्धा अद्यापही तुटलेल्या स्थितीत आहेत. तर काही निवास स्थानात भंगार साह्यि भरलेले आहे. त्याचीही दुरुस्ती दाखविण्यात आली. या निवासस्थानात राहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना परिसरातील पाण्याच्या टाकीमधून पाणी पुरविले जाते. मात्र या टाकीखाली सांडपाण्याचे डबके साचले आहे. या दूषित पाणी पुरवठ्याची तक्रार वैद्यकीय अधीक्षकांनी वरिष्ठांकडे केली. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. परिसरातील पथदिवे सुद्धा बंद असल्याची तक्रार डॉ. अनिल वानखडे यांनी केली. सदर रुग्णालयाचे रुपांतर ६० खाटांवर करण्यासाठी शासनाची मंजुरात मिळाली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रस्ताव रखडला. ही अडचण दूर करुन नवीन प्रस्ताव तयार करण्याचे सांगितले असून त्याला मंजुरात मिळविण्यात येईल. रूग्णालयातील सोयी सुविधा पूर्ववत करुन बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णसेवेतील हयगय सहन केली जाणार नाही. बच्चू कडूआमदारग्रामीण रुग्णालयातील गैरसोयी दूर करुन रिक्त पदे तत्काळ भरण्यात येणार आहेत. सहाय्यक अधीक्षकांचे पद व औषधी निर्मात्याला सहायक देण्यात येणार आहे. - अरुण राऊत,जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.रुग्णालय परिसरातील बांधकामाची पाहणी करण्यात आली आहे. यातील निकृष्ट बांधकाम व रंगरंगोटीच्या कामाची चौकशी करण्यात येणार आहे. पाण्याच्या टाकीखाली असलेल्या डबक्याची समस्या निकाली काढली जाईल. - सुनील थोटांगे,बांधकाम अभियंता.