शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

जिल्ह्याचा पाणीटंचाई आढावा १५ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST

अमरावती : उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई जाणवू नये, याची पुरेपूर दक्षता घ्यावी व आराखड्यातील प्रस्तावित कामांना ...

अमरावती : उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई जाणवू नये, याची पुरेपूर दक्षता घ्यावी व आराखड्यातील प्रस्तावित कामांना वेग द्यावा. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे व प्रलंबित बाबी गतीने पूर्ण कराव्यात. कुठल्याही बाबतीत प्रशासकीय कुचराई खपवून घेणार नसल्याचा इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिला.

संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजना व विविध जलयोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते. मागील पावसाळ्यात ९६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. मात्र, आवश्यक तिथे टंचाई निवारणासाठी १५.२ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला. त्यात आवश्यकता लक्षात घेऊन ९२२ पैकी ६३५ गावे समाविष्ट आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून विहीर अधिग्रहण सुरू करण्यात येत आहे.

आराखड्यानुसार, ९२ विंधनविहिरी, २२१ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, ५६ तात्पुरती नळयोजना, ३६ प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे, ४३ टँकर पाणीपुरवठा व ४७४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. आराखड्यातील प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण व्हावीत. या कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. कुठेही टंचाई उद्भवता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बॉक्स

उदासीनता झटका,यंत्रणेला निर्देश

जलजीवन मिशनमध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. प्राधिकरणाने कामाने वेग द्यावा. कामात कुचराई खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. ज्या गावांचा पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे, तिथे चार- सहा दिवसांआड पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा. आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले.

बॉक्स

जलजीवन मिशनमध्ये या गावांचा समावेश

जलजीवन मिशनमध्ये चांदूर बाजार तालुक्यातील १९ गावे, अचलपूरमधील २४ गावे, चांदूर बाजार-अमरावती-भातकुली-अचलपूर तालुक्यातील १०५ गावे, अमरावतीत नांदगावपेठ व ३३ गावे, अंजनगाव दर्यापूरमधील १४४ योजनांची दुरुस्ती, चिखलदरा तालुक्यातील गौरखेडा व ३५ गावे, शहापूर व तीन गावे व मोर्शीमधील ७० गावे योजनेचा समावेश आहे.