शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोरोना काळात मजुरांना रोजगार देण्यात राज्यात जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST

गजानन मोहोड अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात मजुरांना काम मिळणे जिकरीचेे असताना जिल्ह्यात मात्र, सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. यात ...

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात मजुरांना काम मिळणे जिकरीचेे असताना जिल्ह्यात मात्र, सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. यात माहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) ९५.५१ लक्ष मनुष्यदिन म्हणजेच ९५,५१० कुटुंबांना किमान १०० दिवसांचा रोजगार मिळालेला आहे. यात अमरावती जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पालघर जिल्ह्यात ४६,६९० कुटुंबाला रोजगार मिळाला आहे. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकात मनुष्यदिन निर्मितीत मोठी तफावत आहे.

सन २०२०-२१ मध्ये या कामांवर यंत्रणेद्वारा २४० कोटी ६१ लाख ५१ हजारांचा खर्च झालेला आहे तर गोंदिया जिल्हा १३३.०१ कोटीसह दुसरा व पालघर १२६.६६ कोटी खर्चासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. निधी खर्चातही राज्यात अमरावती जिल्ह्याने प्रथम स्थान सातत्याने राखले आहे. कोरोना काळात मजुरांना रोजगार मिळण्याचे उद्देशाने मजुरांना कोरोना उपाययोजनांचे पालन करून त्यांच्या गावातच मग्रारोहयोची कामे उपलब्ध करण्यात आली.

रोहयोचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्या माहितीनुसार सन २०१९-२० मध्ये जिल्ह्याला मनुष्यदिनाचे उद्दिष्ट ९९.५७ लक्ष होते. यात मनुष्यदिन निर्मिती ७०.६२ लक्ष झाली. सन२०२०-२१ मध्ये उद्दिष्ट होते. २४ मार्च २०२१ मनुष्यबळाची निर्मिती ९६.५१ लक्ष झालेली आहे. ही सरासरी उद्दिष्टांच्या ११४ टक्के आहे.

पाईंटर

मनरेगावर दैनिक मजूर्

एप्रिल २०२० : १९,३४६

मे २०२० : ९६,९३०

बॉक्स

मग्रारोहयोत झाली ही कामे

उपस्थित मजुरांना त्यांच्याच गावात काम उपलब्ध व्हावे, याकरिता सीसीटी, डीसीटी रस्ते, शेततळे, ढाळीचे बांध, वनतळे, वृक्षलागवड, रोपवाटिका, घरकुल, सिंचन विहीर, तुती लागवड, सार्वजनिक विहीर तसेच जलसंधारणाची कामे उपलब्ध करण्यात आली. यात कोरोना काळात एप्रिल २०२० मध्ये १९,३४६, तर मे महिन्यात ९६,९३० एवढी दैनंदिन मजुरांची उपस्थित होती.

बॉक्स

अन्य योजनेच्या सांगड घालून नरेगाची २८ कामे

मग्रारोहयोतंर्गत इतर योजनेची सांगड घालून २८ प्रकारची कामे करण्यात येत आहेत. यात शाळेसाठी खेळाचे मैदान, संरक्षक भिंत बांधणे, छतासह बाजार ओटा, शालेय स्वयंपाकगृह, नाला, मोरी बांधकाम, गोदाम, सिमेंट काँक्रीट रस्ता, आरसीसी मुख्य निचरा प्रणाली, पेव्हींग ब्लॉक रस्ते, डांबर रस्ता, मैदानाला सखळी कुंपण, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, मत्स्यतळे, शेततळे, नाला बांधकाम, भूमिगत बंधारा, सिमेंट नाला बांध, गॅब्रियम बंधारा, सामूहिक गोठे, स्माशनभूमी शेड, असे एकूण १४८ कामे १५ वा वित्त आयोग व आमदार निधीतून करण्यात येत आहे.

बॉक्स

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ संकल्पना

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ संकल्पनेतून मग्रारोहयोच्या माध्यमातून फळबाग लागवडीचे नियोजन आहे. वृक्ष लागवड करताना त्यापासून उत्पन्न मिळेल अशा प्रजातीचा वापर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने सन २०२१-२२ चे जिल्हा लेबर बजेट व कृती आरखडा ४,३९३ कोटींचा तयार करण्यात आला. जो गत वर्षीच्या तुलनेत २.५ पट अधिक असल्याचे सांगण्यात आले.

कोट

जिल्ह्यात हातांना रोजगाराची हमी, रोजगारातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन साधून भौतिक सुविधा निर्मिती बरोबरच लखपती शेतकरी व लखपती कष्टकरी तयार होतील. यासाठी सांघिक भावनेतून यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे यशाची नवनवीन शिखरे गाठणे शक्य होईल, असा विश्वास आहे.

राम लंके

उपजिल्हाधिकारी (रोहयो)