शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोना काळात मजुरांना रोजगार देण्यात राज्यात जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST

गजानन मोहोड अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात मजुरांना काम मिळणे जिकरीचेे असताना जिल्ह्यात मात्र, सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. यात ...

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात मजुरांना काम मिळणे जिकरीचेे असताना जिल्ह्यात मात्र, सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. यात माहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) ९५.५१ लक्ष मनुष्यदिन म्हणजेच ९५,५१० कुटुंबांना किमान १०० दिवसांचा रोजगार मिळालेला आहे. यात अमरावती जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पालघर जिल्ह्यात ४६,६९० कुटुंबाला रोजगार मिळाला आहे. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकात मनुष्यदिन निर्मितीत मोठी तफावत आहे.

सन २०२०-२१ मध्ये या कामांवर यंत्रणेद्वारा २४० कोटी ६१ लाख ५१ हजारांचा खर्च झालेला आहे तर गोंदिया जिल्हा १३३.०१ कोटीसह दुसरा व पालघर १२६.६६ कोटी खर्चासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. निधी खर्चातही राज्यात अमरावती जिल्ह्याने प्रथम स्थान सातत्याने राखले आहे. कोरोना काळात मजुरांना रोजगार मिळण्याचे उद्देशाने मजुरांना कोरोना उपाययोजनांचे पालन करून त्यांच्या गावातच मग्रारोहयोची कामे उपलब्ध करण्यात आली.

रोहयोचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्या माहितीनुसार सन २०१९-२० मध्ये जिल्ह्याला मनुष्यदिनाचे उद्दिष्ट ९९.५७ लक्ष होते. यात मनुष्यदिन निर्मिती ७०.६२ लक्ष झाली. सन२०२०-२१ मध्ये उद्दिष्ट होते. २४ मार्च २०२१ मनुष्यबळाची निर्मिती ९६.५१ लक्ष झालेली आहे. ही सरासरी उद्दिष्टांच्या ११४ टक्के आहे.

पाईंटर

मनरेगावर दैनिक मजूर्

एप्रिल २०२० : १९,३४६

मे २०२० : ९६,९३०

बॉक्स

मग्रारोहयोत झाली ही कामे

उपस्थित मजुरांना त्यांच्याच गावात काम उपलब्ध व्हावे, याकरिता सीसीटी, डीसीटी रस्ते, शेततळे, ढाळीचे बांध, वनतळे, वृक्षलागवड, रोपवाटिका, घरकुल, सिंचन विहीर, तुती लागवड, सार्वजनिक विहीर तसेच जलसंधारणाची कामे उपलब्ध करण्यात आली. यात कोरोना काळात एप्रिल २०२० मध्ये १९,३४६, तर मे महिन्यात ९६,९३० एवढी दैनंदिन मजुरांची उपस्थित होती.

बॉक्स

अन्य योजनेच्या सांगड घालून नरेगाची २८ कामे

मग्रारोहयोतंर्गत इतर योजनेची सांगड घालून २८ प्रकारची कामे करण्यात येत आहेत. यात शाळेसाठी खेळाचे मैदान, संरक्षक भिंत बांधणे, छतासह बाजार ओटा, शालेय स्वयंपाकगृह, नाला, मोरी बांधकाम, गोदाम, सिमेंट काँक्रीट रस्ता, आरसीसी मुख्य निचरा प्रणाली, पेव्हींग ब्लॉक रस्ते, डांबर रस्ता, मैदानाला सखळी कुंपण, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, मत्स्यतळे, शेततळे, नाला बांधकाम, भूमिगत बंधारा, सिमेंट नाला बांध, गॅब्रियम बंधारा, सामूहिक गोठे, स्माशनभूमी शेड, असे एकूण १४८ कामे १५ वा वित्त आयोग व आमदार निधीतून करण्यात येत आहे.

बॉक्स

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ संकल्पना

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ संकल्पनेतून मग्रारोहयोच्या माध्यमातून फळबाग लागवडीचे नियोजन आहे. वृक्ष लागवड करताना त्यापासून उत्पन्न मिळेल अशा प्रजातीचा वापर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने सन २०२१-२२ चे जिल्हा लेबर बजेट व कृती आरखडा ४,३९३ कोटींचा तयार करण्यात आला. जो गत वर्षीच्या तुलनेत २.५ पट अधिक असल्याचे सांगण्यात आले.

कोट

जिल्ह्यात हातांना रोजगाराची हमी, रोजगारातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन साधून भौतिक सुविधा निर्मिती बरोबरच लखपती शेतकरी व लखपती कष्टकरी तयार होतील. यासाठी सांघिक भावनेतून यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे यशाची नवनवीन शिखरे गाठणे शक्य होईल, असा विश्वास आहे.

राम लंके

उपजिल्हाधिकारी (रोहयो)