शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 20:23 IST

शासनाने राज्यात राबविण्यात येणाºया सर्व योजना व जिल्हा विकास निधीत ३० टक्के कपात केली आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात करू नये अशी मागणी होत आहे. 

अमरावती : शासनाने राज्यात राबविण्यात येणाºया सर्व योजना व जिल्हा विकास निधीत ३० टक्के कपात केली आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात करू नये अशी मागणी होत आहे. शेतकºयांना शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटीसह अन्य कर रद्द  झाले. त्यामुळे  स्थानिक स्वराज्य संस्थांचे नुकसान झाले. परिणामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह  स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासन यासाठी नुकसानभरपाई देत आहे. शासनाच्या तिजोरीवर हा भार पडणार असल्याने जिल्हा नियोजन समितीसह राज्यातील सर्वयोजनांच्या निधीत कपात केली आहे. यामध्ये महसुली योजनेत ३० टक्के, तर भांडवली योजनेत २० टक्के कपात करण्यात आली आहे. जिल्ह्यात राबविणाºया योजनामध्ये १० टक्के निधी हा जिल्हा नियोजन समितीमधील असतो, तर ९० टक्के निधी हा राज्य शासनाचा असतो. शासनाने या योजना राबविताना मात्र ३० व २० टक्के निधी कपातीचा निर्णय घेतला आहे.  या निधीत कपात करू नये, अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्यांकडून होत आहे. यामुळे अनेक योजनामध्ये खीळ बसणार आहे. काही आमदारांनीही शासनाने विकासात्मक कामात कुठलाही निधी कपात न करता सर्व योजनासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी केली आहे.

भाजप शासनाने २७ डिसेंबर २०१५ रोजी अमरावती जिल्ह्यात ९ हजार ७०० कोटींचे रस्ते विकासाचे भूमिपूजन केले. त्यापैकी अवघे ५० कोटी देण्यात आले. शेतकरी कर्जमाफी केली; मात्र शेतकºयांना फायदा झाला नाही. त्यात आता विकासनिधीतही कपात करून आडकाठी आणली आहे. त्यामुळे कुठल्याही निधी कपात करू नये- वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव रेल्वे