शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासाठी जिल्हास्तरीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात अनेक गावांतील वाड्या, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही बाब भूषणावह ...

अमरावती : पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात अनेक गावांतील वाड्या, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक आहेत. त्यामुळे राज्यासाठी ही बाब भूषणावह नाही. गावागावात सलोख्याचे संबंध, तसेच सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यासाठी अशा गाव, वाड्या, वस्त्यांची नावे बदलून त्या ठिकाणी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामविकास व सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या शासननिर्णयानुसार जिल्हास्तरावर समिती गठित केली आहे.

या समितीमध्ये राज्यस्तरीय, विभागीय, तसेच जिल्हास्तरावर समितीचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये सदस्य म्हणून महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात येणार आहे. ही समिती गाव स्तरावरील जातीवाचक वाड्या, वस्त्या, रस्त्यांची नावे बदलण्यासाठी प्रयत्न करणार असून, त्यासंदभार्तील अहवाल शासनाला पाठविणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अशा वाड्या, वस्त्यांची नावे लवकरच बदलणार असून, गावागावात एकात्मतेची, तसेच सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गावात सलोखा निर्माण होणार आहे.

बॉक्स

महापुरुषांची देणार नावे

जिल्ह्यातील काही वॉर्ड, तसेच वस्त्यांना जातीवाचक नावे असतील त्यावर त्यांचे नाव बदलून आता त्यावर त्यांना महापुरुषाचे नाव देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर नागरिकांनी सुचविलेल्या नावांचाही विचार केला जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने आता पुढाकार घेतला असून, राज्यातील जिल्हा पातळीवर समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील जातीवाचक वाड्या, वस्त्यांची नावे बदलवून नवीन नावे दिली जाणार आहेत.