लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीनिर्मल ग्राम योजनेंतर्गत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. ३१ मार्चपर्यंत उदिष्ट्य पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेद्वारे केला जात आहे. फेब्रुवारी अखेर १ लाख ६९ हजार ३५८ कुटुंबाकडे शौचालय नसल्याने हगणदारीमुक्त जिल्हा यंदा तरी होणे अशक्यच आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या ग्रामस्थ आदींनी मार्च २०१५ पर्यंत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला होता. जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार ३९५ कुटुंबाकडे शौचालय बांधून जिल्हा हगणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाची पूर्ती झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात २ लाख २८ हजार ०३७ कुटुंबांकडेच शौचालये आहेत. जिल्ह्यात अद्यापही १ लाख ६९ हजार ३५८ कुटुंब शौचालयाविनाच आहेत. ही टक्केवारी केवळ ५७.३८ टक्के आहे. एकूण परिस्थिती पाहता मार्चअखेर ही पूर्ती होणे शक्य नाही.
जिल्हा हगणदारीमुक्ती यंदा तरी अशक्य
By admin | Updated: March 11, 2015 00:25 IST