शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

जिल्हा अखेर १३३ दिवसानंतर अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल,रेस्टॉरंट, बार, मॉल्स १५ ऑगस्टपासून दररोज रात्री १४ वाजेपर्यत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने ...

अमरावती : जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल,रेस्टॉरंट, बार, मॉल्स १५ ऑगस्टपासून दररोज रात्री १४ वाजेपर्यत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मंगल कार्यालये, इनडोअर खेळ यांनाही परवानगी आहे. मात्र धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स बंदच राहणार आहेत. ४ एप्रिलपासून लागू झालेल्या निर्बंधामुळे त्या व्यावसायिकांना १३३ दिवसानंतर आता पूर्णवेळ व्यवसायाची परवानगी मिळाल्याने स्वातंत्र्यदिनापासून अनेक निर्बंधातून मुक्ती मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

१५ ऑगस्टपासून संपूर्ण सप्ताहभर रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा पवनीत कौर यांनी १३ ऑगस्ट रोजी निर्णय जारी केला आहे.

बाॅक्स

हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी ५० टक्के क्षमता

सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स सप्ताहातील सातही दिवस रात्री १० पर्यंत सुरू ठेवता येईल. सोबतच हॉटेल रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. खासगी कार्यालये, आस्थापना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी असून लसीकरण सक्तीचे केले आहे. कमी उपस्थितीत आणि वेगवेगळया शिफ्टमध्ये खासगी कार्यालये सुरू राहू शकतील.

बॉक्स

हे राहणार सुरू

सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट, सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत सुरू.

हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी,

शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश

मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेत जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत परवानगी

खुल्या लाॅनमधील क्षमतेच्या ५० टक्के म्हणजे लग्न सोहळ्यासाठी २०० लोकांना मुभा

खासगी कार्यालये आस्थापना, कंपन्या २४ तास सुरू ठेवता येणार

बॅडमिटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी

जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

बॉक्स

विवाह सोहळ्यासाठी मर्यादा वाढविली

मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेने व जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्याला २०० जणांच्याच उपस्थितीस पवानगी दिली आहे.

बॉक्स

यांना परवानगी नाही

धार्मिकस्थळे, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स सुरू करण्यास अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ते बंदच राहणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी निर्देश देण्यात आले आहेत. सामाजिक अंतर न पाळल्यास दुकान, प्रतिष्ठाने, आस्थापनास ३५ हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई, मंगल कार्यालयत, लग्न समारंभात नियम डावलल्यास ५६० हजार रूपये दंड व फौजदारी कारवाई, विनामास्क फिरणे, गर्दी करणे,उघडयावर थु्ंकताना आढळल्यास ७५० रुपयांचा दंड व फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.