शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

भाजप शासनाविरोधात जिल्हा काँग्रेसचा जनाक्रोश मोर्चा

By admin | Updated: January 6, 2017 00:30 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजुरांची फसवणूक केली आहे.

७ ला धडक : जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची माहिती अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजुरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे जनहितविरोधी शासनाविरोधात शनिवार ७ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाकचेरीवर जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली. भाजप शासनाच्या जनहितविरोधी धोरणामुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. विजय माल्या सारख्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज सरकारने माफ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अशातच आता नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकरी, सर्वसामान्यांचा अक्षरश: छळ चालविला आहे. नोटाबंदीचा निर्णय काळयापैशाच्या विरोधातील लढाई असल्याचा गाजावाजा करीत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. भाजपचे खरे रूप जनतेसमोर आणण्याकरिता व शासनाचा निषेध करण्याकरिता काँग्रेस पक्षाच्यावतीने हा जनाक्रोश मोर्चा इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल. पत्रपरिषदेला आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा प्रभारी शेखर शेंडे, संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, संजय अकर्ते, यशवंत शेरेकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, किशोर बोरकर, सतीश उईके, प्रकाश काळबांडे, संजय मापले, संजय वानखडे, अभिजित देवके, मोहन सिंघवी, प्रल्हाद ठाकरे, विद्या देडू, छाया दंडाळे, अर्चना सवाई, उषा उताणे, विद्या देडू, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, अनिल बोके, हसिना शहा, सिद्धार्थ वानखडे, गणेश आरेकर, मोहन पाटील, भागवत खांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)