शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

अमरावती लोकसभेच्या जागेवर जिल्हा काँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:20 IST

लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसचा ठराव : अंतिम निर्णयाचा चेंडू प्रदेश काँग्रेसच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका व शहर अध्यक्षांची मते यावेळी जाणून घेण्यात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला सोडल्यास पक्षाचा खासदार निवडून आणण्याचा दावा करीत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत एकमताने ठराव पारित करण्यात आला.जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे सरसकट जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. मूग, उडीद खरेदीसाठी शासकीय खरेदी केंदे्र त्वरित सुरू करावी, शेतकऱ्यांचे थकलेले तुरीचे चुकारे विनाविलंब द्यावे आदी मागण्यांचे ठराव घेण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या ‘शक्ती’ अ‍ॅपबाबत आढावा तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट नियुक्त करण्याबाबत तालुका व शहराध्यक्षांना जिल्हाध्यक्षांनी सूचना दिल्या. तालुका पातळीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने राबविण्यात आलेल्या आंदोलने व पूर्वतयारीचा आढावा जिल्हाध्यक्षांनी घेतला. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणीचे गठण त्वरित करण्याचे निर्देश दिले. बैठकीला तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, महेंद्रसिंह गैलवार, श्रीकांत झोडपे, श्रीधर काळे, प्रदीप वाघ, दीपक सवई, मिश्रीलाल झारखंडे, प्रमोद दाळू, बाबाराव बहुरूपी, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, राजेश मांगलेकर, ईश्वर बुंदेले, रवि हिरूळकर, हसन खान पठाण, राजा पाटील यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.प्रदेश काँग्रेसकडे मागणीअमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राखली नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार ही जागा आता काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा प्रस्ताव महेंद्र गैलवार यांनी मांडला. त्याला सुधाकर भारसाकळे यांनी अनुमोदन दिले. ठराव बहुमताने मंजूर करून अंतिम निर्णयासाठी प्रदेश काँग्रेसकडे पाठविला जाणार असल्याचे बबलू देशमुख म्हणाले.