शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

अमरावती लोकसभेच्या जागेवर जिल्हा काँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:20 IST

लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसचा ठराव : अंतिम निर्णयाचा चेंडू प्रदेश काँग्रेसच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका व शहर अध्यक्षांची मते यावेळी जाणून घेण्यात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला सोडल्यास पक्षाचा खासदार निवडून आणण्याचा दावा करीत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत एकमताने ठराव पारित करण्यात आला.जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे सरसकट जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. मूग, उडीद खरेदीसाठी शासकीय खरेदी केंदे्र त्वरित सुरू करावी, शेतकऱ्यांचे थकलेले तुरीचे चुकारे विनाविलंब द्यावे आदी मागण्यांचे ठराव घेण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या ‘शक्ती’ अ‍ॅपबाबत आढावा तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट नियुक्त करण्याबाबत तालुका व शहराध्यक्षांना जिल्हाध्यक्षांनी सूचना दिल्या. तालुका पातळीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने राबविण्यात आलेल्या आंदोलने व पूर्वतयारीचा आढावा जिल्हाध्यक्षांनी घेतला. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणीचे गठण त्वरित करण्याचे निर्देश दिले. बैठकीला तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, महेंद्रसिंह गैलवार, श्रीकांत झोडपे, श्रीधर काळे, प्रदीप वाघ, दीपक सवई, मिश्रीलाल झारखंडे, प्रमोद दाळू, बाबाराव बहुरूपी, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, राजेश मांगलेकर, ईश्वर बुंदेले, रवि हिरूळकर, हसन खान पठाण, राजा पाटील यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.प्रदेश काँग्रेसकडे मागणीअमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राखली नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार ही जागा आता काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा प्रस्ताव महेंद्र गैलवार यांनी मांडला. त्याला सुधाकर भारसाकळे यांनी अनुमोदन दिले. ठराव बहुमताने मंजूर करून अंतिम निर्णयासाठी प्रदेश काँग्रेसकडे पाठविला जाणार असल्याचे बबलू देशमुख म्हणाले.