शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

अमरावती लोकसभेच्या जागेवर जिल्हा काँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:20 IST

लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसचा ठराव : अंतिम निर्णयाचा चेंडू प्रदेश काँग्रेसच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका व शहर अध्यक्षांची मते यावेळी जाणून घेण्यात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला सोडल्यास पक्षाचा खासदार निवडून आणण्याचा दावा करीत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत एकमताने ठराव पारित करण्यात आला.जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे सरसकट जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. मूग, उडीद खरेदीसाठी शासकीय खरेदी केंदे्र त्वरित सुरू करावी, शेतकऱ्यांचे थकलेले तुरीचे चुकारे विनाविलंब द्यावे आदी मागण्यांचे ठराव घेण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या ‘शक्ती’ अ‍ॅपबाबत आढावा तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट नियुक्त करण्याबाबत तालुका व शहराध्यक्षांना जिल्हाध्यक्षांनी सूचना दिल्या. तालुका पातळीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने राबविण्यात आलेल्या आंदोलने व पूर्वतयारीचा आढावा जिल्हाध्यक्षांनी घेतला. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणीचे गठण त्वरित करण्याचे निर्देश दिले. बैठकीला तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, महेंद्रसिंह गैलवार, श्रीकांत झोडपे, श्रीधर काळे, प्रदीप वाघ, दीपक सवई, मिश्रीलाल झारखंडे, प्रमोद दाळू, बाबाराव बहुरूपी, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, राजेश मांगलेकर, ईश्वर बुंदेले, रवि हिरूळकर, हसन खान पठाण, राजा पाटील यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.प्रदेश काँग्रेसकडे मागणीअमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राखली नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार ही जागा आता काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा प्रस्ताव महेंद्र गैलवार यांनी मांडला. त्याला सुधाकर भारसाकळे यांनी अनुमोदन दिले. ठराव बहुमताने मंजूर करून अंतिम निर्णयासाठी प्रदेश काँग्रेसकडे पाठविला जाणार असल्याचे बबलू देशमुख म्हणाले.