शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी जिल्हा काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST

धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक अमरावती : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा़ त्यांना तात्काळ ...

धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अमरावती : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा़ त्यांना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी येथील इर्विन चौकात धरणे आंदोलनात जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसने केली आहे. याबाबतचे निवदेन पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थी दासगुप्ता यांच्यातील व्हाॅटसॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामींना घटनेेच्या ३ दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? देशाची संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून अर्णब गोस्वामींंवर कडक कारवाई करून तत्काळ अटक करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसने केली आहे. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे आदींनी उपस्थित कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, महेंद्र गैलवार, प्रमोद दाळू, संजय काळमेघ, श्रीकांत काळमेघ, नीलेश घोडेराव, प्रदीप देशमुख, छाया दंडाळे, वासंती मंगरोळे, सुधाकर भारसाकळे, प्रवीण काशिकर, संजय वानखडे, भागवत खांडे, हरिभाऊ मोहोड, विनोद गुळदे, दिलीप काळबांडे, प्रकाश काळबांडे, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, संजय लायदे, राहुल येवले, मिश्रिला झारखंडे, परीक्षित जगताप, पंकज मोरे, मुकुंद देशमुख, बिटू मंगरोळे, बच्चू बोबडे, श्रीकांत झोडपे, सुनील गावंडे, मुकदर खाँ पठाण, जयंत देशमुख, श्रीधर काळे, भैयासाहेब मेटकर, अमोल बोरेकर, वनिता पाल, अरविंद लिंगोट, प्रशांत गोरले, विठ्ठल सरडे, बाबाराव बहुरूपी, अनंत साबळे, अभिजित देवके, किशोर देशमुख, बाबुराव जवंजाळ, संजय देशमुख, संजय बेलोकार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बॉक्स

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : पालकमंत्री

देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, या सर्व प्रकाराची चौकशी करावी व अर्णब गोस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

बॉक्स

कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींचे कृत्य हे ऑफिशियल सीक्रेट ॲक्ट १९२३ सेक्शन ५ नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. हा देशद्रोहाचा सुध्दा प्रकार आहे. त्यामुळे अर्णब यांना तात्काळ अटक करावी अन्यथा जिल्हा कॉंग्रेस या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला आहे.