शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी जिल्हा काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST

धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक अमरावती : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा़ त्यांना तात्काळ ...

धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अमरावती : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा़ त्यांना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी येथील इर्विन चौकात धरणे आंदोलनात जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसने केली आहे. याबाबतचे निवदेन पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थी दासगुप्ता यांच्यातील व्हाॅटसॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामींना घटनेेच्या ३ दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? देशाची संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून अर्णब गोस्वामींंवर कडक कारवाई करून तत्काळ अटक करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसने केली आहे. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे आदींनी उपस्थित कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, महेंद्र गैलवार, प्रमोद दाळू, संजय काळमेघ, श्रीकांत काळमेघ, नीलेश घोडेराव, प्रदीप देशमुख, छाया दंडाळे, वासंती मंगरोळे, सुधाकर भारसाकळे, प्रवीण काशिकर, संजय वानखडे, भागवत खांडे, हरिभाऊ मोहोड, विनोद गुळदे, दिलीप काळबांडे, प्रकाश काळबांडे, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, संजय लायदे, राहुल येवले, मिश्रिला झारखंडे, परीक्षित जगताप, पंकज मोरे, मुकुंद देशमुख, बिटू मंगरोळे, बच्चू बोबडे, श्रीकांत झोडपे, सुनील गावंडे, मुकदर खाँ पठाण, जयंत देशमुख, श्रीधर काळे, भैयासाहेब मेटकर, अमोल बोरेकर, वनिता पाल, अरविंद लिंगोट, प्रशांत गोरले, विठ्ठल सरडे, बाबाराव बहुरूपी, अनंत साबळे, अभिजित देवके, किशोर देशमुख, बाबुराव जवंजाळ, संजय देशमुख, संजय बेलोकार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बॉक्स

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : पालकमंत्री

देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, या सर्व प्रकाराची चौकशी करावी व अर्णब गोस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

बॉक्स

कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींचे कृत्य हे ऑफिशियल सीक्रेट ॲक्ट १९२३ सेक्शन ५ नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. हा देशद्रोहाचा सुध्दा प्रकार आहे. त्यामुळे अर्णब यांना तात्काळ अटक करावी अन्यथा जिल्हा कॉंग्रेस या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला आहे.