शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली झेडपीला नोटीस

By admin | Updated: January 11, 2017 00:10 IST

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, संभ्रमामुळे काही ठिकाणी आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे चित्र आहे.

निवडणूक : आचार संहितेच्या काटेकोर अंमलबजावणीचे निर्देशअमरावती : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, संभ्रमामुळे काही ठिकाणी आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत अद्यापही विषय समितीच्या मासिक बैठकी सुरू आहेत. तसेच शासकीय वाहने देखील जमा करण्यात आली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिलीे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ४ जानेवारी रोजी जाहीर केला. त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता अमरावतीसह संपूर्ण विभागात अंमलात आली आहे. मात्र, आचारसंहितेबाबत अनेक शासकीय कार्यालयांत संभ्रम असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद, महापालिका व अन्य सर्व विभागांना लेखी स्वरूपात ५ जानेवारी रोजी कळविण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही जि.प.मध्ये सोमवारी शिक्षण समितीची मासिक सभा पार पडली. यासभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नसला तरी विविध मुद्यांवर चर्चा झाली.दुसरीकडे मिनीमंत्रालयातील शिलेदारांची वाहने सुद्धा आचारसंहितेमध्ये धावत असल्याचे दिसून आल्याने याप्रकरणी सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाईचा अहवाल मागविला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)घरपोच मिळणार ‘व्होेटर स्लिप’जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्व मतदारांना घरपोच ‘वोटर स्लिप’ पोहोचविली जाणार आहे. निवडणुकीदरम्यान कुठलेही साहित्य वाटप होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सूचना तहसीलदार, पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.एसडीओ, तहसीलदारांवर धुराजिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आणि १० पंचायत समितीच्या गणांसाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. सर्व तहसीलदारांकडे ‘एआरओ’ म्हणून जबाबदारी सोपविली आहे.एकाच वेळी निवडणुकीची शक्यतासध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच मनपा निवडणूक एकाचवेळी होण्याचे स्पष्ट केले नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.