शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

जिल्हा बँकेचे ७१ कोटी मिळणार बदलून

By admin | Updated: June 24, 2017 00:12 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ७० कोटी ८१ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या.

शेतकऱ्यांना दिलासा : ६० हजार ग्राहकांचे सहा महिन्यांपासून अडकलेले पैसे होणार मोकळेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ७० कोटी ८१ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. परंतु या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिल्याने बँक आर्थिक अडचणीत सापडली होती. मागील सहा महिन्यांपासून जमा केलेल्या रकमेवर लाखो रुपयांचे व्याजही भरावे लागत होते. त्यात आता जुन्या नोटा स्वीकारण्यास हिरवा कंदील मिळाल्यामुळे साडेचार हजार ग्राहकांचे पैसे मोकळे होणार असून बँकेचीही अडचण दूर झाली आहे.८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जुन्या नोटा स्वीकारण्याचे सर्व बँकांना आदेश देण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी उन्हातान्हात रांगेत लागून जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्यात. त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार जुन्या नोटा स्वीकारल्या. या बँकेत तीन दिवसांच्या काळात जवळपास ७० कोटी ८१ लाख रुपये बचत व मुदत ठेवीचे जमा झाले होते. परंतु जिल्हा बँकेकडे जमा झालेल्या या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नंतर नकार दिला. त्यामुळे सहा महिन्यांपासून जवळपास ७१ कोटी रूपये जिल्हा मध्यवर्ती बँकेत पडून होते. ज्या खातेदारांनी बचत व ठेवी म्हणून पैसे जमा केले, त्या खातेदारांचे पैसे जमा केले त्या खातेदारांना नियमित व्याज द्यावे लागत आहे. त्यामुळे अगोदरच तोट्यात चाललेल्या बँकेचे आर्थिक कंबरडे मोडत होते.याबाबत बँकांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. नाबार्डनेही बँकेची तपासणी केली होती. त्यानंतर बहुतांश बँकांची केवायसी पूर्तता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र शासनाने या नोटा स्वीकारण्यास मंजुरी दिली.त्याबाबत २० जून रोजी नोटीफिकेशन काढण्यात आले. या निर्णयामुळे जिल्हा बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत बँकेने केवळ व्याजापोटी ४ कोटीहून अधिकची रक्कम खातेदारांना दिली आहे. त्याचबरोबर बँकेत ही रक्कम जमा करणाऱ्या साडेचार हजार ग्राहकांचे पैसेही त्यामुळे मोकळे होणार आहेत. त्यामुळे अगोदरच डबघाईस आलेल्या बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. खातेधारकांना चार कोटीहून व्याजयाबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम म्हणाले, जिल्हा बँकेतील पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्याबाबत २० जून रोजी नोटीफिकेशन काढण्यात आल्यानंतर ३० दिवसांत ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे पाठवायची आहे. बँकेत केवळ बचत खात्यात जमा असलेल्या रकमेवर आतापर्यंत ४ कोटीहून अधिक व्याज देण्यात आले आहे. या निर्णयामुळे साडेचार हजार खातेदारांचे पैसे मोकळे होतील.याबाबत बँकेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. नाबार्डनेही बँकेची तपासणी केली. त्यानंतर बहुतांश बँकांची केवायसी पूर्तता झाल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र शासनाने या नोटा स्वीकारण्यास मंजुरी दिली. मात्र बँका काँग्रेस, राकाँच्या ताब्यात असल्याने भाजप सरकार या बँकांवर अन्याय करीत आहे.- बबलू देशमुख, अध्यक्ष सहकारी बँक