शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जिल्हा बँकेचे ७१ कोटी मिळणार बदलून

By admin | Updated: June 24, 2017 00:12 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ७० कोटी ८१ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या.

शेतकऱ्यांना दिलासा : ६० हजार ग्राहकांचे सहा महिन्यांपासून अडकलेले पैसे होणार मोकळेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ७० कोटी ८१ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. परंतु या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिल्याने बँक आर्थिक अडचणीत सापडली होती. मागील सहा महिन्यांपासून जमा केलेल्या रकमेवर लाखो रुपयांचे व्याजही भरावे लागत होते. त्यात आता जुन्या नोटा स्वीकारण्यास हिरवा कंदील मिळाल्यामुळे साडेचार हजार ग्राहकांचे पैसे मोकळे होणार असून बँकेचीही अडचण दूर झाली आहे.८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जुन्या नोटा स्वीकारण्याचे सर्व बँकांना आदेश देण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी उन्हातान्हात रांगेत लागून जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्यात. त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार जुन्या नोटा स्वीकारल्या. या बँकेत तीन दिवसांच्या काळात जवळपास ७० कोटी ८१ लाख रुपये बचत व मुदत ठेवीचे जमा झाले होते. परंतु जिल्हा बँकेकडे जमा झालेल्या या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नंतर नकार दिला. त्यामुळे सहा महिन्यांपासून जवळपास ७१ कोटी रूपये जिल्हा मध्यवर्ती बँकेत पडून होते. ज्या खातेदारांनी बचत व ठेवी म्हणून पैसे जमा केले, त्या खातेदारांचे पैसे जमा केले त्या खातेदारांना नियमित व्याज द्यावे लागत आहे. त्यामुळे अगोदरच तोट्यात चाललेल्या बँकेचे आर्थिक कंबरडे मोडत होते.याबाबत बँकांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. नाबार्डनेही बँकेची तपासणी केली होती. त्यानंतर बहुतांश बँकांची केवायसी पूर्तता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र शासनाने या नोटा स्वीकारण्यास मंजुरी दिली.त्याबाबत २० जून रोजी नोटीफिकेशन काढण्यात आले. या निर्णयामुळे जिल्हा बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत बँकेने केवळ व्याजापोटी ४ कोटीहून अधिकची रक्कम खातेदारांना दिली आहे. त्याचबरोबर बँकेत ही रक्कम जमा करणाऱ्या साडेचार हजार ग्राहकांचे पैसेही त्यामुळे मोकळे होणार आहेत. त्यामुळे अगोदरच डबघाईस आलेल्या बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. खातेधारकांना चार कोटीहून व्याजयाबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम म्हणाले, जिल्हा बँकेतील पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्याबाबत २० जून रोजी नोटीफिकेशन काढण्यात आल्यानंतर ३० दिवसांत ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे पाठवायची आहे. बँकेत केवळ बचत खात्यात जमा असलेल्या रकमेवर आतापर्यंत ४ कोटीहून अधिक व्याज देण्यात आले आहे. या निर्णयामुळे साडेचार हजार खातेदारांचे पैसे मोकळे होतील.याबाबत बँकेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. नाबार्डनेही बँकेची तपासणी केली. त्यानंतर बहुतांश बँकांची केवायसी पूर्तता झाल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र शासनाने या नोटा स्वीकारण्यास मंजुरी दिली. मात्र बँका काँग्रेस, राकाँच्या ताब्यात असल्याने भाजप सरकार या बँकांवर अन्याय करीत आहे.- बबलू देशमुख, अध्यक्ष सहकारी बँक