शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

संभाव्य तापमानवाढीत जिल्हा आठव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:17 IST

वातावरण बदलासाठी जिल्हा अतिसंवेदशील असल्याची माहिती पर्यावरण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. राज्य शासनाने टेरी (द एनर्जी अ‍ॅन्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट) व युके मेट आॅफिस या संस्थेच्या माध्यमातून आगामी ५० वर्षांत राज्यातील वातावरणीय बदल अनुकरण धोरण जाहीर केले.

ठळक मुद्दे‘टेरी’चा अलर्ट : वातावरणीय बदल, अतिसंवेदनशीलमध्ये राज्यात १६ वा

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरण बदलासाठी जिल्हा अतिसंवेदशील असल्याची माहिती पर्यावरण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. राज्य शासनाने टेरी (द एनर्जी अ‍ॅन्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट) व युके मेट आॅफिस या संस्थेच्या माध्यमातून आगामी ५० वर्षांत राज्यातील वातावरणीय बदल अनुकरण धोरण जाहीर केले. यात जिल्ह्याची स्थिती जाहीर करण्यात आली. ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.वातावरणीय बदलामुळे अनियमित पाऊस, तीव्र दुष्काळ, मोठे पूर, जमिनीतील पोषक द्रवाचा असमतोल, वॉटर लॉगींग, अन्न सुरक्षा, रोगराईत होणारी वाढ, जंगलाची वैविधता व ºहास, उत्पादकता, पाण्याची उपलब्धता, उपयुक्तता व मासेमारीवर विपरीत परिणाम होत आहे. आकस्मिक अतिवृष्टी होऊन पूर येणे किंवा काही ठिकाणी दुष्काळ पडणे, अशा घटनांच्या पुनरावृत्तीत वाढ झाली, ही चिंतेची बाब आहे. प्रामुख्याने शेती, अन्न सुरक्षा, आरोग्य, जंगल जलस्त्रोत, नैसर्गिक अधिवास, जैवविविधता, उपजिविकेची साधने, पायाभूत सुविधा आदींवर होणाऱ्या परिणामांची शहानिशा करून ते कमी कसे करता येतील यासाठी क्षेत्रनिहाय अनुकूल धोरणे ठरविण्यास पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे.राज्याची भौगोलिक स्थिती आणि स्थान लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीत होणाºया वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्यासाठी राज्यात रिजन क्लायमेट मॉडेलिंग सिस्टम आणि एचएडीआरएमपी या दोन मॉडेलची निवड करून १९७० ते २००० या कालखंडातील सरासरी तापमानतापमानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर २१ व्या शतकातील सन २०३०, सन २०५० व सन २०७० या कालखंडामध्ये होणाºया वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्याचे काम हाती घेतले होते.आगामी काळासाठी धोरणात्मक शिफारसीत्रिस्तरीय वनांमुळे पावसाचे पाणी मुरण्यासाठी डोंगराची क्षमतावाढ होऊन पुराची तीव्रता कमी होईल, नदी वर्षभर प्रवाही राहून भूजल पातळी वाढेल, यामध्ये लोकसहभागाने पेमेंट सिस्टीमचा अवलंब करता येईल.बदलत्या वातावरणात वाढू शकेल व तग धरू शकतील, अशी पिके व फळ जातीच्या संशोधनास, लागवडीस प्रोत्साहन देणे, पारंपरिक पिकांचे संवर्धन करणे, उपजिविकेची साधणे निर्माण करणेसौर वॉटरपंप, पवनऊर्जा, आदींच्या वापरासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करणे लोकसहभागातून योजना राबविणे, रोगराईत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना आरोग्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा विकसित करणेसेंद्रीय शेतीसाठी शेतकºयांना प्रोत्साहित करणे, बाजारपेठ उपलब्ध करणे, सामूहिक शीतगृहे निर्माण करणे, प्रशिक्षण व बाजारपेठ निर्माण करणे, पाण्याच्या योग्य वापरासाठी कृती आराखडा तयार करणे, वाहनांच्या प्रदूषणासाठी कठोर मानके तयार करणे.वातावरणीय बदलानुसार संभाव्य तापमानवाढपर्यावरण विभागाने वातावरणीय बदलासाठी अतिसंवेदनशील जिल्ह्याची यादी तयार केली. यामध्ये अमरावती जिल्हाचा निर्देशांक १६ वा आहे. असुरक्षिततेमध्ये १३ व्या स्थानी, संवेदनशीलतेच्या ८ व्या स्थानी, तर अनुकूलतेच्या २० व्या स्थानी आहे. आयएमडीच्या अहवालानुसार जिल्ह्याचे वार्षिक किमान तापमान २७.२१ अंश सेल्सिअस आहे. यामध्ये सन २०३० पर्यंत १.४४ ते १.६४ डी.से. तसेच सन २०५० पर्यंत २.२ ते २.३५ डि.से. तर सन २०७० पर्यंत ३.०६ ते ३.४६ डि.से. प्रक्षेपित वाढ होऊ शकते.

टॅग्स :Temperatureतापमान