शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

१९ कोटींच्या अनुदानाचे तालुक्यांना वितरण

By admin | Updated: September 22, 2015 00:30 IST

जिल्ह्यात मागील अतिवृष्टी व पुरामुळे काही भागांत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

गतवर्षीचे नुकसान : शेती पिकांच्या नुकसानीचे ४४ लाख मिळणारलोकमत विशेषअमरावती : जिल्ह्यात मागील अतिवृष्टी व पुरामुळे काही भागांत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच काही भागात गारपीट होवून पिके बाधित झाली होती. तांत्रिक कारणामुळे आपादग्रस्तांना हा निधी वाटप होऊ शकला नव्हता. याबाबत १९ कोटी ३ लाख १९ हजारांचे अनुदान जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना २१ सप्टेंबरला वाटप करण्यात आले. जिल्ह्यात २२, २३ व २७ जुलै २०१५ मध्ये झालेली अतिवृष्टी, धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे झालेले नुकसानीची मदत जिल्ह्यात यापूर्वीचे वाटप करण्यात आली. मात्र खरडून गेलेल्या जमिनीकरीता राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४ चे आपत्कालीन मदतीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांना ४ कोटी ४२ लाख ८ हजारांचे अनुदान सोमवारी वितरित करण्यात आला.जून ते सप्टेंबर २०१३ दरम्यान अतिवृष्टीत खरडून गेलेल्या शेत जमिनीच्या नुकसानीचा निधी यापूर्वी वाटप केला होता. यामधील वाटप राहिलेला १५ लाख ११ हजार ५०० रुपयांचा निधी सोमवारी वाटण्यात आला. यंदा १ व २ जानेवारीला अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले. यासाठी १३ एप्रिलचे शासन निर्णयानुसार अचलपूर तालुक्यात १ लाख ३१ हजार २५० रुपये व दर्यापूर तालुक्यात ३ लाख ५१ हजार २५० रुपयांच्या निधी सोमवारी वितरीत केला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एप्रिल २०१५ मध्ये अवकाळी पावसाचे नुकसान झाले होते. याविषयी ३ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा निधीदेखील सोमवारी वितरित करण्यात आला. २०१३ मधील उर्वरित निधीचे वितरणजिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या निधी यापूर्वीच वाटप करण्यात आला.यामध्ये बाकी राहिलेला १ कोटी ५१ लाख ५०० हजारांचा निधी वितरित करण्यात आला. यामध्ये नांदगाव तालुक्याला ११ लाख २ हजार ५०० रुपये चांदूरबाजारला २ लाख ५ हजार, अंजनगाव सुर्जीला २० लाख ४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.