शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामात शासनाकडून दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:30 IST

तालुक्यातील रस्त्याच्या निधीवर शासनाकडून दुजाभाव होत असून, रस्त्याचे सर्वाधिक प्रमाण असतानाही निधी सर्वांत कमी मिळत असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : रस्ते ३० टक्के; निधी मिळाला तीन कोटी

आॅनलाईन लोकमतचांदूररेल्वे : तालुक्यातील रस्त्याच्या निधीवर शासनाकडून दुजाभाव होत असून, रस्त्याचे सर्वाधिक प्रमाण असतानाही निधी सर्वांत कमी मिळत असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.शासनाकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहाराने चांदूररेल्वे तालुक्यातील असणाºया रस्त्यांच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत अवगत केले होते. शासनाकडून याबाबत दखल न घेता जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व तालुक्यांच्या प्रमाणात चांदूररेल्वे तालुक्यात मुख्य रस्ते २९.८८ टक्के असताना तीन कोटींचा अत्यल्प निधी दिला, तर कमी रस्ते असणाºयाच्या तालुक्याला १२ कोटी निधी; असे पक्षपाती धोरण २०१७ ते २०१८ च्या अंदाजपत्रकात नमूद आहे. मतदारसंघातील रस्त्याच्या बांधकामाबाबत मी वेळोवेळी पालकमंत्र्यांना निवेदने देळन चर्चा केली. विरोधी पक्षाचा आमदार असल्याने माझ्या मतदारसंघाला निधी देण्याबाबत अन्याय होतो. याबाबत जिल्ह्यातील आकडेवारीसह माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आल्याचे आ. जगताप यावेळी म्हणाले. जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी पत्रकार परिषदेला हजर होते.पालकमंत्र्यांनी निधी आणून कार्यक्षमता दाखवावीसरकारच्या जीएसटीच्या गोंधळामुळे ठेकेदारांचा रस्त्याच्या कंत्राटाला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या चांदूर-तळेगाव (द.), चांदूर-कुºहा, चांदूर-पळसखेड या रस्त्यांचे खड्डे भरण्याची कामे सुरू झाली. शासनाने मागील चार ते सहा महिन्यांच्या कालावधीत बांधकामासंबंधी वेळोवेळी अंदाजे ३० शासननिर्णय काढलेत. निर्णयात वेळोवेळी बदल करण्यात आल्याने नवीन निविदा प्रसिद्ध करण्यात वेळ गेला. आताचे पालकमंत्री समान निधीचे सूत्र ठरवून सर्व मतदारसंघाला सारखा निधी वाटत आहेत. त्यामुळे धामणगाव मतदारसंघात सर्वाधिक रस्त्याची टक्केवारी असताना निधीअभावी कामे होऊ शकली नाही. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आहे व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शासनाकडून अतिरिक्त निधी खेचून आणण्याची क्षमता त्यांनी दाखवायला हवी, असेही मत आ. जगताप यांनी व्यक्त केले.