शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मृत वन्यप्राण्यांची परस्परच विल्हेवाट!

By admin | Updated: September 1, 2015 00:12 IST

अपघातात मृत पावलेले अथवा मृतावस्थेत आढळून आलेल्या काही वन्यप्राण्याची संबंधित नागरिकच परस्पर विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

वनविभागाचा हलगर्जीपणा : वाघ, बिबटखेरीज अन्य प्राणी उपेक्षितअमरावती : अपघातात मृत पावलेले अथवा मृतावस्थेत आढळून आलेल्या काही वन्यप्राण्याची संबंधित नागरिकच परस्पर विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनविभाग केवळ वाघ व बिबट या वन्यप्राण्यांवर लक्ष केंद्रित करीत असल्यामुळे अन्य प्राण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. हा एकाप्रकारे वनविभागाचा हलगर्जीपणाच असल्याच्या प्रतिक्रिया वन्यप्रेमीमध्ये आहे. वनपरिक्षेत्राला अनेक गावाचा वेढा असल्यामुळे जंगलातील मार्गावर वाहनाची सतत वर्दळ सुरु असते. अशावेळी जंगलातील वन्यप्राणी मार्गावर येऊन ते वाहनाच्या धडकेत मृत पावतात. याबाबत एखादा सुजाण नागरिक वन्यप्राणी मृत पावल्याची माहीती वनविभागाला देते. मात्र, वाघ व बिबटसंबधित माहिती असल्यास वनकर्मचारी घटनास्थळी जाऊन वनगुन्हाची नोंद करतात. मात्र, सर्वसाधारण वन्यप्राणी मृत पावल्यास त्यांची नोंद वनाधिकारी करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच शहरानजीकच्या भागातही काही सर्वसाधारण वन्यप्राणी मृतावस्थेत आढळल्यास दखल घेतली जात नाही. मृत वन्यप्राण्याची माहिती देणाऱ्या नागरिकांनाच विल्हेवाट लावण्यासाठी वनविभागाकडून सांगण्यात येते. या प्रकारामुळे शिकारीसुध्दा डाव साधून वन्यप्राण्याची शिकार करू शकतो, याची पुसटशी कल्पना वनविभागााला नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी )अपघातात वाघ व बिबट मृत पावल्यास वनगुन्हाची नोंद केली जाते, मात्र, वन्यप्राण्यातीलच अन्य साधारण प्राण्याबाबत वनगुन्हा नोंद केला जात नाही. संबंधित व्यक्तीलाच मृत प्राण्याला जमिनीत पुरविण्याच्या सूचना देण्यात येते. -पी.के. लाकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी वनपरिक्षेत्र.