शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पथ्रोट परिसरात कपाशीवर मर रोगाचे संकट

By admin | Updated: August 10, 2015 00:05 IST

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट परिसरात कपाशीच्या पिकावर मर रोगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

बळीराजा चिंताग्रस्त : रोगाचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी सुरूपथ्रोट : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट परिसरात कपाशीच्या पिकावर मर रोगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.पथ्रोट परिसरातील मौजे जहानपूर, मलकापूर, वागडोह, रामापूर, कासमपूर, जवळापूर भागातील कपाशी पिकावर मर रोगाचे आक्रमण झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी या परिसरात ७० टक्के कपाशी पिकाची पेरणी केली. त्यामध्ये ४० टक्के शेतकऱ्यांनी प्री- मानसून कपासीची पेरणी केली. त्यामुळे प्री-मान्सून कपाशी पिके फुल-पात्यांनी बहरले होते. ३० टक्के शेतकऱ्यांनी ओलिताची सोय नसल्यामुळे मृग नक्षत्रामध्ये आलेल्या पावसामुळे कपाशी पिकाची पेरणी केली होती. या सर्व पिकांवर दोन दिवसपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी पिकावर मर रोग आल्याने मोठ्याप्रमाणात कपाशीची पिके सुकू लागली आहे. त्यामुळे पीक घरात येण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे. बी.टी. कपाशी पिकावर कोणत्या प्रकारचा रोग येत नाही, अशी शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमामात बी.टी. कपाशीचे वाण व वेगवेगळ्या जाती व कंपन्यांच्या वाणाची पेरणी करतात. मात्र बी.टी. कपाशीवर दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने मर रोगाचे आक्रमण होतात. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. कृषितज्ज्ञांकडून यावर संशोधन करणे काळाची गरज झाली आहे. शेतकऱ्यांनी या पिकावर आतापर्यंत केलेला खर्च व मेहनत वाया गेली असून शेतकरी डबघाईस आल्याचे चित्र आहे.मागील वर्षीसुध्दा गारपीट, वादळ, पावसाचा लहरीपणा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातून कसाबसा थोडाफार सावरला तर मर रोगाच्या संकटात सापडला. दरवर्षी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी कर्ज बाजारी होत चालण्याचे चित्र असून जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे प्रमाण आहे. सर्वेक्षणाची मागणी आहे. (वार्ताहर)