शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक नळांच्या तोट्या गायब

By admin | Updated: October 20, 2015 00:18 IST

जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन, त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी जुळ्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आलेल्या नळांना...

अवैध कनेक्शन : अचलपूर शहरात पाण्याचा अपव्यय, नागरिकांकडूनही गैरवापर लोकमत विशेषअचलपूर : जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन, त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी जुळ्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आलेल्या नळांना तोट्या बसवून पाण्याच्या बचतीविषयी पालिकेने जनजागृती मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तालुक्यात काही गावांत पाणी टंचाई आहे. जेथे सुविधा आहे तेथे काही सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत. काही ठिकाणी तोट्या आहेत पण पाणी भरून झाल्यावर नळाची तोटी बंद करण्याची तसदी नागरिक घेत नाहीत. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. शहरातील काही भागांतील जलवाहिन्या लिकेज झालेल्या आहेत. कुठे व्हॉलमधून पाणी वाया जात आहे, तर कुठे पाणीच नाही. (प्रतिनिधी)बालकांनी घेतला होता पुढाकारजुळ्या शहरात बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नासल्याने पाणी वाया जाते. असाच प्रकार दोन वर्षांपूर्वीपर्यंत अचलपूर-परतवाडा मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ होता. तेथे दोन सार्वजनिक नळ आहेत. सकाळी संध्याकाळी नळाला पाणी आल्यानंतर एका तासात आजूबाजूचे रहिवासी पाणी भरत असत. नळांना तोटी नसल्याने नागरिकांचे पाणी भरून झाल्यावरही पाच ते सहा तास नळांमधून पाणी वाया जात होते. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने यश रावत, अभिषेक सरकटे, अंकुर टेकाडे, जीवन शर्मा, अनिकेत पाटील, अजिंक्य चौधरी, निखिल दौलतानी, सौरभ धांडे आदी शाळकरी विद्यार्थ्यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर नगरपालिकेने तेथील नळांना तोट्या लावल्या होत्या.डोळे उघडले नाहीया एका ठिकाणच्या सार्वजनिक नळांना तोट्या लावावेत म्हणून विद्यार्थ्यांनी नगरपालिकेला दोन वर्षांपूर्वी निवेदन दिले होते. पण शहरातील बहुतांश सार्वजनिक नळ विनातोटीचेच होते. शाळकरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या लेखी निवेदनावरून नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे डोळे उघडायला हवे होते, पण तसे झाले नाही.गोरगरिबांसाठी सार्वजनिक नळाची सोय आहे. बहुतांश भागातील नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. या नळांवर नेहमी कपडे धुणे, गाड्या धुणे, गुरे-ढोरे धुणे, असा उपयोग केला जातो. म्हणजे उपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त होत आहे. आतापासून पाण्याचे नियोजन केल्यासच उन्हाळ्याला पाणीटंचाई भासणार नाही. काही ठिकाणी नळांना टिल्लू पंप लावून पाणी घेतले जाते.- गजानन कोल्हे, माजी नगरसेवक.बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी वाया जाते. नगरपालिकेने शहरातील प्रत्येक घरात नळकनेक्शन मोहीम नाममात्र दखल घेऊन सार्वजनिक नळ बंद केल्यास पाणी वाया जाण्याचा प्रश्नच राहणार नाही. अवैध नळ अजूनही शहरात सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ते सुरू आहेत. बांधकाम करणारे पाणी कोठून घेतात, हे सांगण्याची गरज नाही.- विलास थोरात, सामाजिक कार्यकर्ते.पाणीपुरवठा विभागाकडून अवैध नळ कनेक्शन मिळवून देणारे काही दलाल असल्याची माहिती आहे. पॅराडाइज कॉलनीत एका अवैध भूखंडावर बांधकाम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अवैध नळ कनेक्शन एका रात्रीतून देण्यात आले होते. मी त्याची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केल्यावर ते कनेक्शन तोडण्यात आले. पण त्या अवैध नळधारकावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली नव्हती. -मो. अजहर मो. जफर, जिल्हा उपाध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडी.