शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सार्वजनिक नळांच्या तोट्या गायब

By admin | Updated: October 20, 2015 00:18 IST

जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन, त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी जुळ्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आलेल्या नळांना...

अवैध कनेक्शन : अचलपूर शहरात पाण्याचा अपव्यय, नागरिकांकडूनही गैरवापर लोकमत विशेषअचलपूर : जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन, त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी जुळ्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आलेल्या नळांना तोट्या बसवून पाण्याच्या बचतीविषयी पालिकेने जनजागृती मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तालुक्यात काही गावांत पाणी टंचाई आहे. जेथे सुविधा आहे तेथे काही सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत. काही ठिकाणी तोट्या आहेत पण पाणी भरून झाल्यावर नळाची तोटी बंद करण्याची तसदी नागरिक घेत नाहीत. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. शहरातील काही भागांतील जलवाहिन्या लिकेज झालेल्या आहेत. कुठे व्हॉलमधून पाणी वाया जात आहे, तर कुठे पाणीच नाही. (प्रतिनिधी)बालकांनी घेतला होता पुढाकारजुळ्या शहरात बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नासल्याने पाणी वाया जाते. असाच प्रकार दोन वर्षांपूर्वीपर्यंत अचलपूर-परतवाडा मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ होता. तेथे दोन सार्वजनिक नळ आहेत. सकाळी संध्याकाळी नळाला पाणी आल्यानंतर एका तासात आजूबाजूचे रहिवासी पाणी भरत असत. नळांना तोटी नसल्याने नागरिकांचे पाणी भरून झाल्यावरही पाच ते सहा तास नळांमधून पाणी वाया जात होते. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने यश रावत, अभिषेक सरकटे, अंकुर टेकाडे, जीवन शर्मा, अनिकेत पाटील, अजिंक्य चौधरी, निखिल दौलतानी, सौरभ धांडे आदी शाळकरी विद्यार्थ्यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर नगरपालिकेने तेथील नळांना तोट्या लावल्या होत्या.डोळे उघडले नाहीया एका ठिकाणच्या सार्वजनिक नळांना तोट्या लावावेत म्हणून विद्यार्थ्यांनी नगरपालिकेला दोन वर्षांपूर्वी निवेदन दिले होते. पण शहरातील बहुतांश सार्वजनिक नळ विनातोटीचेच होते. शाळकरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या लेखी निवेदनावरून नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे डोळे उघडायला हवे होते, पण तसे झाले नाही.गोरगरिबांसाठी सार्वजनिक नळाची सोय आहे. बहुतांश भागातील नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. या नळांवर नेहमी कपडे धुणे, गाड्या धुणे, गुरे-ढोरे धुणे, असा उपयोग केला जातो. म्हणजे उपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त होत आहे. आतापासून पाण्याचे नियोजन केल्यासच उन्हाळ्याला पाणीटंचाई भासणार नाही. काही ठिकाणी नळांना टिल्लू पंप लावून पाणी घेतले जाते.- गजानन कोल्हे, माजी नगरसेवक.बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी वाया जाते. नगरपालिकेने शहरातील प्रत्येक घरात नळकनेक्शन मोहीम नाममात्र दखल घेऊन सार्वजनिक नळ बंद केल्यास पाणी वाया जाण्याचा प्रश्नच राहणार नाही. अवैध नळ अजूनही शहरात सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ते सुरू आहेत. बांधकाम करणारे पाणी कोठून घेतात, हे सांगण्याची गरज नाही.- विलास थोरात, सामाजिक कार्यकर्ते.पाणीपुरवठा विभागाकडून अवैध नळ कनेक्शन मिळवून देणारे काही दलाल असल्याची माहिती आहे. पॅराडाइज कॉलनीत एका अवैध भूखंडावर बांधकाम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अवैध नळ कनेक्शन एका रात्रीतून देण्यात आले होते. मी त्याची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केल्यावर ते कनेक्शन तोडण्यात आले. पण त्या अवैध नळधारकावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली नव्हती. -मो. अजहर मो. जफर, जिल्हा उपाध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडी.