शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सार्वजनिक नळांच्या तोट्या गायब

By admin | Updated: October 20, 2015 00:18 IST

जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन, त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी जुळ्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आलेल्या नळांना...

अवैध कनेक्शन : अचलपूर शहरात पाण्याचा अपव्यय, नागरिकांकडूनही गैरवापर लोकमत विशेषअचलपूर : जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी म्हणजे जीवन, त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी जुळ्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आलेल्या नळांना तोट्या बसवून पाण्याच्या बचतीविषयी पालिकेने जनजागृती मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तालुक्यात काही गावांत पाणी टंचाई आहे. जेथे सुविधा आहे तेथे काही सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत. काही ठिकाणी तोट्या आहेत पण पाणी भरून झाल्यावर नळाची तोटी बंद करण्याची तसदी नागरिक घेत नाहीत. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. शहरातील काही भागांतील जलवाहिन्या लिकेज झालेल्या आहेत. कुठे व्हॉलमधून पाणी वाया जात आहे, तर कुठे पाणीच नाही. (प्रतिनिधी)बालकांनी घेतला होता पुढाकारजुळ्या शहरात बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नासल्याने पाणी वाया जाते. असाच प्रकार दोन वर्षांपूर्वीपर्यंत अचलपूर-परतवाडा मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ होता. तेथे दोन सार्वजनिक नळ आहेत. सकाळी संध्याकाळी नळाला पाणी आल्यानंतर एका तासात आजूबाजूचे रहिवासी पाणी भरत असत. नळांना तोटी नसल्याने नागरिकांचे पाणी भरून झाल्यावरही पाच ते सहा तास नळांमधून पाणी वाया जात होते. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने यश रावत, अभिषेक सरकटे, अंकुर टेकाडे, जीवन शर्मा, अनिकेत पाटील, अजिंक्य चौधरी, निखिल दौलतानी, सौरभ धांडे आदी शाळकरी विद्यार्थ्यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर नगरपालिकेने तेथील नळांना तोट्या लावल्या होत्या.डोळे उघडले नाहीया एका ठिकाणच्या सार्वजनिक नळांना तोट्या लावावेत म्हणून विद्यार्थ्यांनी नगरपालिकेला दोन वर्षांपूर्वी निवेदन दिले होते. पण शहरातील बहुतांश सार्वजनिक नळ विनातोटीचेच होते. शाळकरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या लेखी निवेदनावरून नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे डोळे उघडायला हवे होते, पण तसे झाले नाही.गोरगरिबांसाठी सार्वजनिक नळाची सोय आहे. बहुतांश भागातील नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. या नळांवर नेहमी कपडे धुणे, गाड्या धुणे, गुरे-ढोरे धुणे, असा उपयोग केला जातो. म्हणजे उपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त होत आहे. आतापासून पाण्याचे नियोजन केल्यासच उन्हाळ्याला पाणीटंचाई भासणार नाही. काही ठिकाणी नळांना टिल्लू पंप लावून पाणी घेतले जाते.- गजानन कोल्हे, माजी नगरसेवक.बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी वाया जाते. नगरपालिकेने शहरातील प्रत्येक घरात नळकनेक्शन मोहीम नाममात्र दखल घेऊन सार्वजनिक नळ बंद केल्यास पाणी वाया जाण्याचा प्रश्नच राहणार नाही. अवैध नळ अजूनही शहरात सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ते सुरू आहेत. बांधकाम करणारे पाणी कोठून घेतात, हे सांगण्याची गरज नाही.- विलास थोरात, सामाजिक कार्यकर्ते.पाणीपुरवठा विभागाकडून अवैध नळ कनेक्शन मिळवून देणारे काही दलाल असल्याची माहिती आहे. पॅराडाइज कॉलनीत एका अवैध भूखंडावर बांधकाम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अवैध नळ कनेक्शन एका रात्रीतून देण्यात आले होते. मी त्याची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केल्यावर ते कनेक्शन तोडण्यात आले. पण त्या अवैध नळधारकावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली नव्हती. -मो. अजहर मो. जफर, जिल्हा उपाध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडी.