शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

जिल्हाधिकाऱ्यांकडे आज रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालक जमा करणार चाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:01 IST

अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नवे आदेश काढताना बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तर निवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णत: बंद राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांसाठी शिथिलतेसह नवे निर्बंध लागू केले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी रेस्टॉरेंट, हॉटेलच्या वेळेबाबत कमालीचा अन्याय केला आहे. व्यवसायाच्या वेळेतच रेस्टॉरेंट, हॉटेलचे शटर बंद करण्याचे आदेश निर्गमित केल्यामुळे शुक्रवारी शहरातील रेस्टॉरेंट, हॉटेलच्या चाव्या संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नवे आदेश काढताना बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तर निवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णत: बंद राहणार आहे. यात हॉटेल व्यवसायावर वेळेची मर्यादा पूर्वक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदार खूष आणि हॉटेल संचालक नाराज अशी स्थिती आहे. कोरोनाकाळात गत दीड वर्षांत हॉटेल, रेस्टॉरेंट व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा आणि  सकाळी १० ते रात्री ११ या वेळेदरम्यान रेस्टॉरेंट, हॉटेलला परवानगी मिळेस्तोवर चाव्या जिल्हा प्रशासनकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवेदन सादर करताना नितीन मोहाेड, नितीन देशमुख, रवींद्रसिंग सलुजा, गजानन राजगुरे, सारंग राऊत, समीर देशमुख, नितीन कदम, गुड्डू धर्माळे, संजय छाबडा, मदन जयस्वाल, नंदू जयस्वाल, सत्यपालसिंग अरोरा, अब्दुल हबीब हुसैन, नमन सलुजा उपस्थित होते.दरम्यान, अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनने ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाला राणा दाम्पत्याचा पाठिंबा आहे. 

रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसाय असलेल्या वेळेतच बंद करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे व्यवसाय कसा करावा, हे समजणे  कठीण झाले आहे. कामगार, वेटर, मजुरांचा दैनंदिन खर्च लागू आहे. परिणामी व्यवसाय न करता प्रतिष्ठानांच्या चाव्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आज जमा करण्यात येतील.- नितीन मोहोड रेस्टॉरेंट व्यावसायिक

 

टॅग्स :hotelहॉटेलcollectorजिल्हाधिकारी