शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांकडे आज रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालक जमा करणार चाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:01 IST

अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नवे आदेश काढताना बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तर निवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णत: बंद राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांसाठी शिथिलतेसह नवे निर्बंध लागू केले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी रेस्टॉरेंट, हॉटेलच्या वेळेबाबत कमालीचा अन्याय केला आहे. व्यवसायाच्या वेळेतच रेस्टॉरेंट, हॉटेलचे शटर बंद करण्याचे आदेश निर्गमित केल्यामुळे शुक्रवारी शहरातील रेस्टॉरेंट, हॉटेलच्या चाव्या संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नवे आदेश काढताना बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, तर निवारी दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णत: बंद राहणार आहे. यात हॉटेल व्यवसायावर वेळेची मर्यादा पूर्वक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदार खूष आणि हॉटेल संचालक नाराज अशी स्थिती आहे. कोरोनाकाळात गत दीड वर्षांत हॉटेल, रेस्टॉरेंट व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा आणि  सकाळी १० ते रात्री ११ या वेळेदरम्यान रेस्टॉरेंट, हॉटेलला परवानगी मिळेस्तोवर चाव्या जिल्हा प्रशासनकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवेदन सादर करताना नितीन मोहाेड, नितीन देशमुख, रवींद्रसिंग सलुजा, गजानन राजगुरे, सारंग राऊत, समीर देशमुख, नितीन कदम, गुड्डू धर्माळे, संजय छाबडा, मदन जयस्वाल, नंदू जयस्वाल, सत्यपालसिंग अरोरा, अब्दुल हबीब हुसैन, नमन सलुजा उपस्थित होते.दरम्यान, अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनने ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाला राणा दाम्पत्याचा पाठिंबा आहे. 

रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसाय असलेल्या वेळेतच बंद करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे व्यवसाय कसा करावा, हे समजणे  कठीण झाले आहे. कामगार, वेटर, मजुरांचा दैनंदिन खर्च लागू आहे. परिणामी व्यवसाय न करता प्रतिष्ठानांच्या चाव्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आज जमा करण्यात येतील.- नितीन मोहोड रेस्टॉरेंट व्यावसायिक

 

टॅग्स :hotelहॉटेलcollectorजिल्हाधिकारी