शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

परीक्षेच्या गुणांकनावरुन आता थेट नियुक्ती

By admin | Updated: November 2, 2014 22:22 IST

नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो.

निवड समितीला आदेश : शासकीय नोकरीसाठी मुलाखत प्रक्रिया बादअमरावती : नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो. आता उमेदवारांना धीर मिळाला आहे. नियुक्ती प्रक्रियेत ही मौखिक परीक्षाच बाद केली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेच्या गुणांकरावरुन त्याची सरळ नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत आदेश जिल्हा निवड समितीला प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत लाखो हातांना रोजगार नाही. एक रीक्त पदाची जाहिरात असली तरी हजारो अर्ज येतात, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेत प्रथम लेखी परीक्षा व नंतर मौखिक परीक्षा असते. या दोन्ही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि मौखिक परीक्षेत उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वावर मिळालेल्या गुणांच्या बेरजेवर शासकीय नोकरी मिळायची परीक्षेत जरी अधिक गुण मिळाले असले तरी मुलाखतीत मात्र उमेदवाराचा अवसानघात झाल्यास त्याची निवड होत नव्हती या मौखिक परिक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार घडल्याचे कित्येक उदाहरणे आहेत. परंतु आता लेखी परीक्षेच्या गुणांकारावर आधारित नोकरी मिळत असल्याने अनेक गैरप्रकारांना आपसूक आळा बसणार आहे. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, आणि आवश्यकतेनुसार व्यावसायिक आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक होते. आता २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. आता मौखिक परीक्षा न घेता गुणांवरच उमेदवारांची निवड करण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश काढले आहेत. या आदेशान्वये आता जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती प्रक्रिया होेणार आहे.हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने परीक्षार्थींची गुणवत्तेवर निवड होणार आहे व गुणवंतांना न्याय मिळणार आहे. हुषार विद्यार्थ्यांना ही संधी चालून आली आहे.