शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

परीक्षेच्या गुणांकनावरुन आता थेट नियुक्ती

By admin | Updated: November 2, 2014 22:22 IST

नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो.

निवड समितीला आदेश : शासकीय नोकरीसाठी मुलाखत प्रक्रिया बादअमरावती : नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो. आता उमेदवारांना धीर मिळाला आहे. नियुक्ती प्रक्रियेत ही मौखिक परीक्षाच बाद केली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेच्या गुणांकरावरुन त्याची सरळ नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत आदेश जिल्हा निवड समितीला प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत लाखो हातांना रोजगार नाही. एक रीक्त पदाची जाहिरात असली तरी हजारो अर्ज येतात, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेत प्रथम लेखी परीक्षा व नंतर मौखिक परीक्षा असते. या दोन्ही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि मौखिक परीक्षेत उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वावर मिळालेल्या गुणांच्या बेरजेवर शासकीय नोकरी मिळायची परीक्षेत जरी अधिक गुण मिळाले असले तरी मुलाखतीत मात्र उमेदवाराचा अवसानघात झाल्यास त्याची निवड होत नव्हती या मौखिक परिक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार घडल्याचे कित्येक उदाहरणे आहेत. परंतु आता लेखी परीक्षेच्या गुणांकारावर आधारित नोकरी मिळत असल्याने अनेक गैरप्रकारांना आपसूक आळा बसणार आहे. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, आणि आवश्यकतेनुसार व्यावसायिक आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक होते. आता २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. आता मौखिक परीक्षा न घेता गुणांवरच उमेदवारांची निवड करण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश काढले आहेत. या आदेशान्वये आता जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती प्रक्रिया होेणार आहे.हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने परीक्षार्थींची गुणवत्तेवर निवड होणार आहे व गुणवंतांना न्याय मिळणार आहे. हुषार विद्यार्थ्यांना ही संधी चालून आली आहे.