शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल व्हिलेज हरिसाल पाच वर्षातच ‘आऊट ऑफ रेंज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

कॅशलेस व्यवहाराचा फज्जा : विविध सेवा पुरविण्याचा दावा फोल गजानन चोपडे अमरावती : देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेजसाठी मेळघाटातील ...

कॅशलेस व्यवहाराचा फज्जा : विविध सेवा पुरविण्याचा दावा फोल

गजानन चोपडे

अमरावती : देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेजसाठी मेळघाटातील हरिसाल या गावाची निवड २०१५ साली झाली होती. २०१६ मध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ‘डिजिटल व्हिलेज’ अस्तित्वात आले. त्याच्या प्रचारासाठी शासनाकडून जाहिरातींवर वारेमाप खर्चदेखील करण्यात आला. मात्र, अवघ्या पाच वर्षांतच डिजिटल व्हिलेजचे स्वप्न इंटरनेट सेवेच्या कोलदांड्यामुळे भंगले आहे. ‘लोकमत’ने हरिसालला दिलेल्या भेटीदरम्यान अनेक व्यापाऱ्यांनी ही योजना सपशेल फसवी ठरल्याचा पाढा वाचला.

मेळघाटातून कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कृती आराखडा तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने एकेकाळी कुपोषणाने ग्रस्त असलेल्या हरिसालला डिजिटल व्हिलेज करण्याचे ठरले. येथे अत्याधुनिक सोयी पुरविण्यासाठी आवश्यक इंटरनेटचे जाळे विणले जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली. राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात झालेल्या करारानुसार धारणी तालुक्यातील हरिसाल या गावाला इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जगाशी जोडण्यात आले. अखेर २०१६ ला हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून नावरूपास आले. दुकानांमध्ये सर्व व्यवहार कॅशलेस होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. शाळा डिजिटल झाली. टेलिमेडिसीन केंद्रामुळे १२० किमी अंतर कापून अमरावतीला येऊन उपचार घेण्याची गरज राहिली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात आय केअर सेंटर सुरू करण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गिते यांनी वारंवार या गावाला भेट देऊन कामांची पाहणी केली. मात्र, अवघ्या पाच वर्षांतच ‘महाजाला’चा फुगा फुटला आणि जगाशी असलेला संपर्क तुटला, असे एका हॉटेल व्यवसायिकाने सांगितले. ११ कंपन्यांना सोबत घेऊन गावकऱ्यांना विविध सेवा पुरविण्याचा मायक्रोसॉफ्टचा दावा फोल ठरल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे.

अशा उमटल्या प्रतिक्रिया

एका महाविद्यालयीन युवकाने सांगितले, आधी संपूर्ण गावाला मोफत वायफाय देणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र ही सुविधा बंद करण्यात आली असून इंटरनेटसाठी रिचार्ज करावे लागते. डिजिटल शाळा केव्हाच बंद पडली तर टेलिमेडीसीन केंद्रालाही कुलूप लागले. ‘टू जी’चेच नेटवर्क मिळत असल्याने कुणीही कॅशलेस व्यवहार करीत नाही. एकंदरीत पाच वर्षांपूर्वी अचानक प्रकाश झोतात आलेले हरिसाल आता ‘आऊट ऑफ रेंज’ झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हे तर ‘एक्स डिजिटल व्हिलेज’

२०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने डिजिटल योजना राबवण्यात आली. या योजनेचा खर्च खासगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून करण्यात आला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. पण, फक्त मोफत वाय-फाय दिले म्हणजे गाव डिजिटल होत नाही. गावात वीज आणि पाण्याची समस्याही आहे. याशिवाय डिजिटल व्यवहारांसाठी गावात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवणेही गरजेचे होते. मात्र, ‘इंटरनेट डिस्कनेक्टिव्ही’मुळे सारे केर मुसळात गेल्याचा संताप व्यक्त करीत हरिसालचे ग्रामस्थ आता हे गाव ‘एक्स डिजिटल व्हिलेज’ झाल्याची खंत बोलून दाखवतात.