शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

डिजिटल व्हिलेज हरिसाल पाच वर्षातच ‘आऊट ऑफ रेंज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

कॅशलेस व्यवहाराचा फज्जा : विविध सेवा पुरविण्याचा दावा फोल गजानन चोपडे अमरावती : देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेजसाठी मेळघाटातील ...

कॅशलेस व्यवहाराचा फज्जा : विविध सेवा पुरविण्याचा दावा फोल

गजानन चोपडे

अमरावती : देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेजसाठी मेळघाटातील हरिसाल या गावाची निवड २०१५ साली झाली होती. २०१६ मध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ‘डिजिटल व्हिलेज’ अस्तित्वात आले. त्याच्या प्रचारासाठी शासनाकडून जाहिरातींवर वारेमाप खर्चदेखील करण्यात आला. मात्र, अवघ्या पाच वर्षांतच डिजिटल व्हिलेजचे स्वप्न इंटरनेट सेवेच्या कोलदांड्यामुळे भंगले आहे. ‘लोकमत’ने हरिसालला दिलेल्या भेटीदरम्यान अनेक व्यापाऱ्यांनी ही योजना सपशेल फसवी ठरल्याचा पाढा वाचला.

मेळघाटातून कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कृती आराखडा तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने एकेकाळी कुपोषणाने ग्रस्त असलेल्या हरिसालला डिजिटल व्हिलेज करण्याचे ठरले. येथे अत्याधुनिक सोयी पुरविण्यासाठी आवश्यक इंटरनेटचे जाळे विणले जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली. राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात झालेल्या करारानुसार धारणी तालुक्यातील हरिसाल या गावाला इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जगाशी जोडण्यात आले. अखेर २०१६ ला हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून नावरूपास आले. दुकानांमध्ये सर्व व्यवहार कॅशलेस होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. शाळा डिजिटल झाली. टेलिमेडिसीन केंद्रामुळे १२० किमी अंतर कापून अमरावतीला येऊन उपचार घेण्याची गरज राहिली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात आय केअर सेंटर सुरू करण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गिते यांनी वारंवार या गावाला भेट देऊन कामांची पाहणी केली. मात्र, अवघ्या पाच वर्षांतच ‘महाजाला’चा फुगा फुटला आणि जगाशी असलेला संपर्क तुटला, असे एका हॉटेल व्यवसायिकाने सांगितले. ११ कंपन्यांना सोबत घेऊन गावकऱ्यांना विविध सेवा पुरविण्याचा मायक्रोसॉफ्टचा दावा फोल ठरल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे.

अशा उमटल्या प्रतिक्रिया

एका महाविद्यालयीन युवकाने सांगितले, आधी संपूर्ण गावाला मोफत वायफाय देणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र ही सुविधा बंद करण्यात आली असून इंटरनेटसाठी रिचार्ज करावे लागते. डिजिटल शाळा केव्हाच बंद पडली तर टेलिमेडीसीन केंद्रालाही कुलूप लागले. ‘टू जी’चेच नेटवर्क मिळत असल्याने कुणीही कॅशलेस व्यवहार करीत नाही. एकंदरीत पाच वर्षांपूर्वी अचानक प्रकाश झोतात आलेले हरिसाल आता ‘आऊट ऑफ रेंज’ झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हे तर ‘एक्स डिजिटल व्हिलेज’

२०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने डिजिटल योजना राबवण्यात आली. या योजनेचा खर्च खासगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून करण्यात आला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. पण, फक्त मोफत वाय-फाय दिले म्हणजे गाव डिजिटल होत नाही. गावात वीज आणि पाण्याची समस्याही आहे. याशिवाय डिजिटल व्यवहारांसाठी गावात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवणेही गरजेचे होते. मात्र, ‘इंटरनेट डिस्कनेक्टिव्ही’मुळे सारे केर मुसळात गेल्याचा संताप व्यक्त करीत हरिसालचे ग्रामस्थ आता हे गाव ‘एक्स डिजिटल व्हिलेज’ झाल्याची खंत बोलून दाखवतात.