शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात डिजिटल इंडियाचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:37 IST

चार दिवसांपासून ब्रॉडबँड सेवा बंद असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडिया, को-आॅपरेटिव बँक आणि सेंट्रल बँक आणि पोस्ट आॅफिसमध्ये लिंक उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडलेले आहेत.

ठळक मुद्देलिंक सेवा नसल्यामुळे बँका बंद : पैसे नसल्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : चार दिवसांपासून ब्रॉडबँड सेवा बंद असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडिया, को-आॅपरेटिव बँक आणि सेंट्रल बँक आणि पोस्ट आॅफिसमध्ये लिंक उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडलेले आहेत.मान्सून जवळ आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे आटपून बियाणे, खते खरेदीसाठी आपल्या खात्यात असलेले पैसे काढण्यास गेले असता व्यवहार बंद असल्याचे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. व्यवहार बंद असल्याचे फलक वाचून ५० ते ६० कि.मी.अंतरावरून आलेले शेतकरी, आदिवासी त्रस्त झाले आहेत.अशा पद्धतीच्या कारभारामुळे मेळघाटात सर्वत्र बंदची परिस्थिती निर्माण झाली आहे. पैसे नसल्यामुळे आर्थिक व्यवहार कसा करावा या विवंचनेत शेतकरी आणि व्यापारी वर्ग आहे. शासकीय कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे दाखले प्राप्त मिळविण्यासाठी आॅनलाइन सेवा बंद असल्यामुळे शेतकºयांना सातबारा, आठ अ आणि इतर आवश्यक दाखले व कागदपत्रे काढण्यासाठी १०० ते २०० रुपये दररोज खर्ची घालावे लागत आहे.संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने डिजिटल इंडियाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केल्याचे प्रकार मेळघाटात पाहावयास मिळत आहे.ग्रामीण भागात इंटरनेट सेवा उपलब्ध नसताना आॅनलाइन व्यवहार कसा करावा, या विवंचनेत कर्मचारी, अधिकारी अडकले आहेत. पूर्वी कामासाठी अर्धा तासाचा वेळ लागत होता. आता त्या कामासाठी दोन ते तीन दिवस धारणी मुख्यालया चकरा मारून गरीब जनतेची आर्थिक लूट होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आदिवासी जनतेकडून करण्यात येत आहे.आपले पैसे बँकेत असताना बँकेतून पैसे मिळत नाही. धारणी शहरात स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक या तिन्ही बँकांचे एटीएम सेवा उपलब्ध आहे. परंतु तिन्ही बँकेत एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे वास्तव आहे.जिल्हाधिकारी लक्ष देतील देतील काय?लोकांना आपल्या खात्यातील पैसे गरजेनुसार काढता यावे व बँक कर्मचाºयांचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने शासनाने आॅनलाईन सुविधा केली खरी, पण याचा फायदा नागरिकांना होत नसल्यामुळे ही एटीएम सुविधा कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित करीत याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील काय, असा, प्रश्न उपस्थित होत आहे.