शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

मेळघाटात डिजिटल इंडियाचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:37 IST

चार दिवसांपासून ब्रॉडबँड सेवा बंद असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडिया, को-आॅपरेटिव बँक आणि सेंट्रल बँक आणि पोस्ट आॅफिसमध्ये लिंक उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडलेले आहेत.

ठळक मुद्देलिंक सेवा नसल्यामुळे बँका बंद : पैसे नसल्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : चार दिवसांपासून ब्रॉडबँड सेवा बंद असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडिया, को-आॅपरेटिव बँक आणि सेंट्रल बँक आणि पोस्ट आॅफिसमध्ये लिंक उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडलेले आहेत.मान्सून जवळ आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे आटपून बियाणे, खते खरेदीसाठी आपल्या खात्यात असलेले पैसे काढण्यास गेले असता व्यवहार बंद असल्याचे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. व्यवहार बंद असल्याचे फलक वाचून ५० ते ६० कि.मी.अंतरावरून आलेले शेतकरी, आदिवासी त्रस्त झाले आहेत.अशा पद्धतीच्या कारभारामुळे मेळघाटात सर्वत्र बंदची परिस्थिती निर्माण झाली आहे. पैसे नसल्यामुळे आर्थिक व्यवहार कसा करावा या विवंचनेत शेतकरी आणि व्यापारी वर्ग आहे. शासकीय कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे दाखले प्राप्त मिळविण्यासाठी आॅनलाइन सेवा बंद असल्यामुळे शेतकºयांना सातबारा, आठ अ आणि इतर आवश्यक दाखले व कागदपत्रे काढण्यासाठी १०० ते २०० रुपये दररोज खर्ची घालावे लागत आहे.संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने डिजिटल इंडियाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केल्याचे प्रकार मेळघाटात पाहावयास मिळत आहे.ग्रामीण भागात इंटरनेट सेवा उपलब्ध नसताना आॅनलाइन व्यवहार कसा करावा, या विवंचनेत कर्मचारी, अधिकारी अडकले आहेत. पूर्वी कामासाठी अर्धा तासाचा वेळ लागत होता. आता त्या कामासाठी दोन ते तीन दिवस धारणी मुख्यालया चकरा मारून गरीब जनतेची आर्थिक लूट होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आदिवासी जनतेकडून करण्यात येत आहे.आपले पैसे बँकेत असताना बँकेतून पैसे मिळत नाही. धारणी शहरात स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक या तिन्ही बँकांचे एटीएम सेवा उपलब्ध आहे. परंतु तिन्ही बँकेत एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे वास्तव आहे.जिल्हाधिकारी लक्ष देतील देतील काय?लोकांना आपल्या खात्यातील पैसे गरजेनुसार काढता यावे व बँक कर्मचाºयांचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने शासनाने आॅनलाईन सुविधा केली खरी, पण याचा फायदा नागरिकांना होत नसल्यामुळे ही एटीएम सुविधा कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित करीत याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील काय, असा, प्रश्न उपस्थित होत आहे.