शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

डिजिटल वर्ग खोल्यांमध्ये जिल्हा परिषदेला ठेंगा

By admin | Updated: November 24, 2015 00:30 IST

पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. मात्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत अद्याप अंमलबजावणी केल्याचे दिसत नाही.

शाळांना प्रतीक्षा : शैक्षणिक गुणवत्ता ढासळण्याची चिन्हेअमरावती : पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. मात्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत अद्याप अंमलबजावणी केल्याचे दिसत नाही. सीबीएसई शाळांसाठी कवाडे उघडण्याचा राज्य शासनाचा अद्याप निर्णय झाला नसून जिल्हा परिषद शाळा उपेक्षित आहेत. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाठविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांपासून तर शिक्षणाधिकारी स्तरावर कामाची विभागणी करण्यात आली आहे. सध्याचे युग डिजिटल असल्याने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गंगादीप ज्ञान असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेतील शाळांतील अशाचप्रकारे डिजिटल क्षेत्र अपेक्षित होते. त्या तुलनेत अनेक वर्षांपासून आयटीआय योजनेतील संगणकही 'अपडेट' झालेले नाहीत. जिल्हा परिषदांतील शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर जोरदार प्रयत्न व्हायला हवा होता. मात्र तसे मागील दहा वर्षांत झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे डिजिटल वर्गखोली नाही, तर संगणक चालेल इतपतही वीज शाळांना मिळत नाही. तेव्हा गुणवत्ता वाढेल कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या तुलनेत शहरातील जवळपास सर्वच सीबीएसई, आयटीआय शाळांमध्ये डिजिटल वर्गखोली आणि डिजिटल बोर्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना अद्यायवत ज्ञान मिळते. शिक्षकांच्या अडीअडणी सोडविण्यासाठी शिक्षक संघटनांचे मोठे जाळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे अध्यापन कमी असे चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मातेरे होत आहे. परिणामी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.