शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या वळण रस्ता निर्मिती दर करारात तफावत

By admin | Updated: February 1, 2015 22:47 IST

अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे सांैदर्यीकरण, विस्तारीकरण प्रस्तावित आहे. तत्पूर्वी विमानतळाच्या वळण रस्त्याचे काम हाती घेतले जाणार

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे सांैदर्यीकरण, विस्तारीकरण प्रस्तावित आहे. तत्पूर्वी विमानतळाच्या वळण रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असून त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र एकाच रस्त्याच्या निर्मितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १३.५० कोटी तर विमानतळ प्राधिकरणाच्या आयसीटीआय या एजन्सीने १० कोटींचे दर ठरविल्याने शासन या प्रकरणी गांभीर्याने विचार करीत आहे. रस्ता निर्मितीची निविदा फेब्रुवारी निकाली काढण्याचे संकेत आहे.बेलोरा विमानतळाचे सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने आयसीटीआय ही एजन्सी विकास कामांसाठी नेमली आहे. बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणात आडकाठी ठरणाऱ्या बेलोरा ते जळू या दरम्यान पावणे चार कि.मी. लांबीच्या वळण रस्त्यााठी लागणारे दर काढण्याची जबाबदारी या एजन्सीला सोपविली. त्यानुसार आयसीटीआय वळण रस्त्यासाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित राहील, असा अहवाल एजन्सीने राज्य शासनाच्या विमानतळ प्राधिकरणाचे सचिव टी.एस.मीना यांना दिला. दुसरीकडे याच रस्त्याच्या निर्मितीसाठी १३.५० कोटी रुपयांचे दरकरार काढून दिले आहे. रस्ता एकच तरीही खर्चाची रक्कम वेगवेगळी यामुळे विमानतळ प्राधिकरण मंत्रालय चक्रावून गेले. नेमकी यात काय गफलत? हे जाणून घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाचे सचिव मीना यांनी मंत्रालयात २३ जानेवारी रोजी बैठक घेऊन वळण रस्ता निर्मितीची वस्तुस्थिती जाणून घेतली असल्याची माहिती आहे. मात्र वळण रस्ता निर्मितीत अडथळा येऊ नये, यासाठी फेबु्रवारीत निविदा लावण्याची तयारी प्रशासनाची आहे. हा वळण रस्ता निर्माण करताना रुंदी वाढवून पायी जाणाऱ्यांना स्वतंत्र मार्ग तयार केला जाणार आहे. हा वळण रस्ता अकोला राष्ट्रीय महामार्गावरुन बेलोरा गावाच्या काही अंतरापासून तर जळू या गावानजिक काठला जाणार आहे. वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास त्यानंतर यवतमाळ, हैद्राबाद, पापळ मार्गे अमरावतीत येणाऱ्या वाहनांना या वळण रस्त्यावरुन अकोला राष्ट्रीय महामार्गावर येवून अमरावती गाठावी लागणार आहे. राज्य शासन विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्नशील असून बेलोरा विमानतळाच्या विकासाचे भाग्य कधी उजाळणार असा सवाल निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)