शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

मरण पत्करू, पण घरे सोडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:13 IST

चार दशकांपूर्वी मागच्या पिढीत कुडा-मातीची घरे होती. आता परिश्रमपूर्वक त्याजागी पक्के घर साकारली.

ठळक मुद्देशासनाकडे दाद मागू : संजय गांधीनगरवासीयांच्या भावना, केंद्रीय मंत्र्यांंकडे धाव घेणारनितीन गडकरी यांना संजय गांधीनगरवासी आज भेटणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दशकांपूर्वी मागच्या पिढीत कुडा-मातीची घरे होती. आता परिश्रमपूर्वक त्याजागी पक्के घर साकारली. त्यासाठी आमच्या आई-वडिलांनी अपार कष्ट घेतले. त्यांच्या आठवणींचा ठेवा या परिसरात आहेत. आम्ही येथे खेळलो, वावरलो, लहानाचे मोठे झालो. त्यामुळे मरण पत्करू, पण हा परिसर, घरे सोडणार नाही, अशा भावना संजय गांधीनगर क्रमांक २ येथील नागरिकांच्या आहेत.संजय गांधीनगरवासीयांना घरे हटविण्यासाठी सात दिवसांचा अवधी वनविभागाने दिला. बडनेरा मार्गावरील जुन्या बायपासलगत राखीव वनजमिनीवर सन १९८२ पासूनचे अतिक्रमण संजय गांधीनगर क्रमांक-२ म्हणून नावारूपास आले. गरीब, सामान्य, कामगार, मोलमुजरी करून उपजीविका करणारी ही लोकवस्ती आहे. रमाई आवास योजनेतून कुडामातीच्या झोपड्यांनी आता पक्क््या घराचे स्वरूप घेतले. आता शासनादेशानुसार वनजमिनींवर अतिक्रमण मोकळे करण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. वडाळी वनक्षेत्र अधिकारी कार्यालयाने गुरुवार, ९ नोव्हेंबरला वनजमिनीची नोंद असलेल्या संजय गांधीनगर क्र. २ येथील २७९ रहिवाशांना नोटीस बजावून सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. वनविभागाची नोटीस हाती पडताच स्थानिक रहिवासी हादरून गेले. आयुष्य जेमतेम स्थिरावले असताना पुन्हा फरपट येणार का, अशी विचारणा ते एकमेकांना करताना आढळले. मुला-बाळांचे शिक्षण, भविष्याचे काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे संजय गांधीनगरवासी कैफीयत मांडणार आहेत.संजय गांधीनगरात या आहेत सुविधाराखीव वनजमीन अशी नोंद असलेल्या संजय गांधीनगरात महापालिका, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी यंत्रणेने विविध सोईसुविधा प्रदान केल्या आहेत. पाच समाजमंदिर‘, एक हनुमान व महादेव मंदिर, चार बालवाड्या, चार अंगणवाड्या, दोन वाचनालये, एक व्यायामशाळा आणि एक उद्यान साकारले आहे.काय म्हणतात नागरिकसंजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.- उत्तमराव धंदरसंजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.- उत्तमराव धंदर१९८२ पूर्वीपासून येथेच वास्तव्यास आहे. पोटाला चिमटा देत पै-पै जमा केला. कसे तरी घर बांधून मुला-बाळांचा सांभाळ केला. नातवंडे झालीत. आता प्रशासन म्हणते, घर तोडा. त्यापेक्षा मरण आलेले बरे.- कमलाबाई डहाकेप्रशासनाने संजय गांधी नगरवासीयांना पायाभूत आणि मूलभूत सुविधा प्रदान केल्या आहेत. मोलमजुरी करून घर साकारले. मुला-बाळांना शिकवून त्यांनी उंच भरारी घ्यावी, हे स्वप्न रंगवित असताना आता घर राहणार नाही अशी स्थिती उद्भवली आहे.- शीला भडके