शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

मरण पत्करू, पण घरे सोडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:13 IST

चार दशकांपूर्वी मागच्या पिढीत कुडा-मातीची घरे होती. आता परिश्रमपूर्वक त्याजागी पक्के घर साकारली.

ठळक मुद्देशासनाकडे दाद मागू : संजय गांधीनगरवासीयांच्या भावना, केंद्रीय मंत्र्यांंकडे धाव घेणारनितीन गडकरी यांना संजय गांधीनगरवासी आज भेटणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दशकांपूर्वी मागच्या पिढीत कुडा-मातीची घरे होती. आता परिश्रमपूर्वक त्याजागी पक्के घर साकारली. त्यासाठी आमच्या आई-वडिलांनी अपार कष्ट घेतले. त्यांच्या आठवणींचा ठेवा या परिसरात आहेत. आम्ही येथे खेळलो, वावरलो, लहानाचे मोठे झालो. त्यामुळे मरण पत्करू, पण हा परिसर, घरे सोडणार नाही, अशा भावना संजय गांधीनगर क्रमांक २ येथील नागरिकांच्या आहेत.संजय गांधीनगरवासीयांना घरे हटविण्यासाठी सात दिवसांचा अवधी वनविभागाने दिला. बडनेरा मार्गावरील जुन्या बायपासलगत राखीव वनजमिनीवर सन १९८२ पासूनचे अतिक्रमण संजय गांधीनगर क्रमांक-२ म्हणून नावारूपास आले. गरीब, सामान्य, कामगार, मोलमुजरी करून उपजीविका करणारी ही लोकवस्ती आहे. रमाई आवास योजनेतून कुडामातीच्या झोपड्यांनी आता पक्क््या घराचे स्वरूप घेतले. आता शासनादेशानुसार वनजमिनींवर अतिक्रमण मोकळे करण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. वडाळी वनक्षेत्र अधिकारी कार्यालयाने गुरुवार, ९ नोव्हेंबरला वनजमिनीची नोंद असलेल्या संजय गांधीनगर क्र. २ येथील २७९ रहिवाशांना नोटीस बजावून सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. वनविभागाची नोटीस हाती पडताच स्थानिक रहिवासी हादरून गेले. आयुष्य जेमतेम स्थिरावले असताना पुन्हा फरपट येणार का, अशी विचारणा ते एकमेकांना करताना आढळले. मुला-बाळांचे शिक्षण, भविष्याचे काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे संजय गांधीनगरवासी कैफीयत मांडणार आहेत.संजय गांधीनगरात या आहेत सुविधाराखीव वनजमीन अशी नोंद असलेल्या संजय गांधीनगरात महापालिका, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी यंत्रणेने विविध सोईसुविधा प्रदान केल्या आहेत. पाच समाजमंदिर‘, एक हनुमान व महादेव मंदिर, चार बालवाड्या, चार अंगणवाड्या, दोन वाचनालये, एक व्यायामशाळा आणि एक उद्यान साकारले आहे.काय म्हणतात नागरिकसंजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.- उत्तमराव धंदरसंजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.- उत्तमराव धंदर१९८२ पूर्वीपासून येथेच वास्तव्यास आहे. पोटाला चिमटा देत पै-पै जमा केला. कसे तरी घर बांधून मुला-बाळांचा सांभाळ केला. नातवंडे झालीत. आता प्रशासन म्हणते, घर तोडा. त्यापेक्षा मरण आलेले बरे.- कमलाबाई डहाकेप्रशासनाने संजय गांधी नगरवासीयांना पायाभूत आणि मूलभूत सुविधा प्रदान केल्या आहेत. मोलमजुरी करून घर साकारले. मुला-बाळांना शिकवून त्यांनी उंच भरारी घ्यावी, हे स्वप्न रंगवित असताना आता घर राहणार नाही अशी स्थिती उद्भवली आहे.- शीला भडके