शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

मरण पत्करू, पण घरे सोडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:13 IST

चार दशकांपूर्वी मागच्या पिढीत कुडा-मातीची घरे होती. आता परिश्रमपूर्वक त्याजागी पक्के घर साकारली.

ठळक मुद्देशासनाकडे दाद मागू : संजय गांधीनगरवासीयांच्या भावना, केंद्रीय मंत्र्यांंकडे धाव घेणारनितीन गडकरी यांना संजय गांधीनगरवासी आज भेटणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दशकांपूर्वी मागच्या पिढीत कुडा-मातीची घरे होती. आता परिश्रमपूर्वक त्याजागी पक्के घर साकारली. त्यासाठी आमच्या आई-वडिलांनी अपार कष्ट घेतले. त्यांच्या आठवणींचा ठेवा या परिसरात आहेत. आम्ही येथे खेळलो, वावरलो, लहानाचे मोठे झालो. त्यामुळे मरण पत्करू, पण हा परिसर, घरे सोडणार नाही, अशा भावना संजय गांधीनगर क्रमांक २ येथील नागरिकांच्या आहेत.संजय गांधीनगरवासीयांना घरे हटविण्यासाठी सात दिवसांचा अवधी वनविभागाने दिला. बडनेरा मार्गावरील जुन्या बायपासलगत राखीव वनजमिनीवर सन १९८२ पासूनचे अतिक्रमण संजय गांधीनगर क्रमांक-२ म्हणून नावारूपास आले. गरीब, सामान्य, कामगार, मोलमुजरी करून उपजीविका करणारी ही लोकवस्ती आहे. रमाई आवास योजनेतून कुडामातीच्या झोपड्यांनी आता पक्क््या घराचे स्वरूप घेतले. आता शासनादेशानुसार वनजमिनींवर अतिक्रमण मोकळे करण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. वडाळी वनक्षेत्र अधिकारी कार्यालयाने गुरुवार, ९ नोव्हेंबरला वनजमिनीची नोंद असलेल्या संजय गांधीनगर क्र. २ येथील २७९ रहिवाशांना नोटीस बजावून सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. वनविभागाची नोटीस हाती पडताच स्थानिक रहिवासी हादरून गेले. आयुष्य जेमतेम स्थिरावले असताना पुन्हा फरपट येणार का, अशी विचारणा ते एकमेकांना करताना आढळले. मुला-बाळांचे शिक्षण, भविष्याचे काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे संजय गांधीनगरवासी कैफीयत मांडणार आहेत.संजय गांधीनगरात या आहेत सुविधाराखीव वनजमीन अशी नोंद असलेल्या संजय गांधीनगरात महापालिका, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी यंत्रणेने विविध सोईसुविधा प्रदान केल्या आहेत. पाच समाजमंदिर‘, एक हनुमान व महादेव मंदिर, चार बालवाड्या, चार अंगणवाड्या, दोन वाचनालये, एक व्यायामशाळा आणि एक उद्यान साकारले आहे.काय म्हणतात नागरिकसंजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.- उत्तमराव धंदरसंजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.- उत्तमराव धंदर१९८२ पूर्वीपासून येथेच वास्तव्यास आहे. पोटाला चिमटा देत पै-पै जमा केला. कसे तरी घर बांधून मुला-बाळांचा सांभाळ केला. नातवंडे झालीत. आता प्रशासन म्हणते, घर तोडा. त्यापेक्षा मरण आलेले बरे.- कमलाबाई डहाकेप्रशासनाने संजय गांधी नगरवासीयांना पायाभूत आणि मूलभूत सुविधा प्रदान केल्या आहेत. मोलमजुरी करून घर साकारले. मुला-बाळांना शिकवून त्यांनी उंच भरारी घ्यावी, हे स्वप्न रंगवित असताना आता घर राहणार नाही अशी स्थिती उद्भवली आहे.- शीला भडके