शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

भाऊ आपल्या वाहनाला स्टिकर लावले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:14 IST

संदीप मानकर/अमरावती : केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार इंधनानुसार वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार ...

संदीप मानकर/अमरावती : केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार इंधनानुसार वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार आहे. त्यासाठी प्रारुभ स्वरूप अधिसूचना जारी झाली असली तरी अंमलबजावणीची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नसली तरी भविष्यात पेट्रोलसाठी निळे, तर डिझेल वाहनांसाठी नारंगी स्टिकर लावले जाणार असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक वाहनाला विशिष्ट प्रकारचे स्टिकर लागणार आहे. वाहन निर्माता कंपनी किंवा डिलर सदर वाहनाची विक्री करतानाच सदर स्टिकर संबंधित वाहनांना लावून देणार आहे. स्टिकर लावल्याशिवाय आरटीओत नवीन वाहनांची नोंदणीच होणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी यांनी स्पष्ट केले. पेट्रोल व सीएनजी वाहनाकरिता फिकट निळा, तर ईलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनाकरिता हिरवा व झिझेल वाहनाकरिता नारंगी रंगाचे स्टिकर असणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण वाहने-

पेट्रोलवर चालणारी वाहने- ५,६३४०७

झिझेलवर चालणारी वाहने- ६५,४२७

इलेक्ट्रीक वाहने- ५८४

सीएनजी वाहने- ००

एलपीजी/ पेट्रोल- ६९५५

बॉक्स:

कोणत्या वाहनांसाठी कुठल्या रंगाचे स्टिकर

पेट्रोल व सीएनजी वाहनाकरीता फिकट निळा, ईलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनाकरिता हिरवा तर डिझेल वाहनांकरिता नारंगी रंगाचे स्टिकर राहणार असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

स्टिकर कुठे मिळणार?

वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनी किंवा विक्री करणारे डिलरलाच वाहन विक्री करताना सदर अधिसूचनेनुसार स्टिकर लावून द्यावे लागेल. त्याशिवाय आरटीओत नवीन वाहनांची नोंदणी होणार नाही. मात्र प्रारुभ अधिसूचना जारी झाली असली तरी अद्याप त्यासंदर्भात अंमलबजावणीचे आदेश नाहीत सदर आदेश देशात एकाच वेळीस लागू होतील, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बॉक्स

स्टिकर नाही लावले तर ?

स्टिकर लावल्याशिवाय वाहन विक्री करता येणार नाही. आरटीओत त्याचे रजिस्ट्रेशन होणार नाही. स्टिकर नसल्यास मोटर वाहन कायद्याच्या कलम ३९ नुसार कारवाई केली जाईल असे आरटीओने स्पष्ट केले.

कोट

प्रारुभ स्वरूपाची अधिसूचना काढण्यात आली आहे. अंतिम अधिसूचना अद्याप निघाली नाही. याची अंमलबजावणीची झाली नसून, अधिसूचना निघाल्यानंतर स्टिकर लावण्यासंदर्भात संपूर्ण देशात एकाच वेळी नियम लागू होतील.

- राज बागरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती