शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

वरुड येथे अतिसाराची लागण

By admin | Updated: July 15, 2015 00:19 IST

तालुक्यात पाऊस बेपत्ता झाल्याने आणि अचानक वातावरणात बदल झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दवाखान्यात गर्दी : आरोग्य खात्याने दिला दक्षतेचा सल्लावरूड : तालुक्यात पाऊस बेपत्ता झाल्याने आणि अचानक वातावरणात बदल झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अतिसार, सर्दी खोकलासह आदी आजाराने नागरिक त्रस्त झाले असून खासगी व सरकारी दवाखान्यात रुग्णांची गर्दी आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याकरिता तातडीने संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी केले आहे. तालुक्यात २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला. जुलै महिन्यात सर्दी खोकला, अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने दखावान्यात गर्दीच दिसून येते. यामध्ये वृध्द, तरुण, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील लोणी, पुसला, राजूराबाजार, आमनेर, शेंंदूरजनाघाट या आरोग्य केंद्रात सुध्दा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात ३०० ते ४०० रुग्ण आरोग्य तपासणीकरीता येत आहे. वातावरणीय बदलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन खोकला, ताप, तसेच डायरियाच्या आजाराने कहर केल्याचे चित्र तालूक्यात आहे. यामुळे आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये अ‍ॅनाफिलीस डासांच्या मादीपासून पसरणारा हा आजार असून या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातून होते. हा डास घरगुती पाणी वापराची भांडी, टाकी, राजण, मोठ, हौद,तसेच परिसरातील डबके, निरुपयोगी वस्तू नेहमी साफसफाई करुन ठेवाव्या. टायर, प्लास्टिकच्या वस्तूची विल्हेवाट लावावी. डबके, गटारे वाहती करावी, शौचालयाच्या व्हेन्टीलेटर पाईपच्या तोंडाला पिशवी बांधावी. वॉटर कुलर, फुलदाण्या, फवारे, कारंजे यातील दोन-तीन दिवसाआड पाणी बदलावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील भांडीकुंडी कोरडी करुन ठेवावी. खिडक्या, दरवाज्यांना जाळी बसविण्यात यावी. या सर्व बाबींची अंमलबजावणी केल्यास डेंग्यू, हिवताप, जेई, चिकूणगुणिया, मलेरीया, डायरिया या आजारापासून सुटका होऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)नागरिकांनी स्वच्छता ठेवणे गरजेचेग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. जलजन्य आणि वायूजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वैयक्तिक स्वच्छता महत्वाची आहे. शेणखताचे उकीरडे, नालीतील साचलेले पाणी, घनकचरा, घाणीच ेसाम्राज्य स्वच्छ करावे. हिवताप, सर्दी खोकला, डायरिया या आजारावर मात करावयाची असल्यास पाणी उकळून प्यावे तसेच साथीचे आजार आल्यास तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी केले आहे.तालुक्यात दरवर्षी साथरोगाचा फैलाव होतो.ूयावर प्रतिबंधात्मक उपायोजना करणे गरजेचे असते. जलजन्य , वायू जन्य आजारापासून सावध राहण्याकरीता दक्षता घेणे गरजेचे आहे. सर्दी, खोकला, ताप आल्यास तसेच डायरीया, अतिसार झाल्यास त्वरीत नजिकच्या आरेगा्य केंंद्राशी संपर्कसाधून उपचार करावे. - प्रमोद पोतदार, वैद्यकिय अधिकारी, वरुड