शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

वरुड येथे अतिसाराची लागण

By admin | Updated: July 15, 2015 00:19 IST

तालुक्यात पाऊस बेपत्ता झाल्याने आणि अचानक वातावरणात बदल झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दवाखान्यात गर्दी : आरोग्य खात्याने दिला दक्षतेचा सल्लावरूड : तालुक्यात पाऊस बेपत्ता झाल्याने आणि अचानक वातावरणात बदल झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अतिसार, सर्दी खोकलासह आदी आजाराने नागरिक त्रस्त झाले असून खासगी व सरकारी दवाखान्यात रुग्णांची गर्दी आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याकरिता तातडीने संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी केले आहे. तालुक्यात २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला. जुलै महिन्यात सर्दी खोकला, अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने दखावान्यात गर्दीच दिसून येते. यामध्ये वृध्द, तरुण, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील लोणी, पुसला, राजूराबाजार, आमनेर, शेंंदूरजनाघाट या आरोग्य केंद्रात सुध्दा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात ३०० ते ४०० रुग्ण आरोग्य तपासणीकरीता येत आहे. वातावरणीय बदलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन खोकला, ताप, तसेच डायरियाच्या आजाराने कहर केल्याचे चित्र तालूक्यात आहे. यामुळे आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये अ‍ॅनाफिलीस डासांच्या मादीपासून पसरणारा हा आजार असून या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातून होते. हा डास घरगुती पाणी वापराची भांडी, टाकी, राजण, मोठ, हौद,तसेच परिसरातील डबके, निरुपयोगी वस्तू नेहमी साफसफाई करुन ठेवाव्या. टायर, प्लास्टिकच्या वस्तूची विल्हेवाट लावावी. डबके, गटारे वाहती करावी, शौचालयाच्या व्हेन्टीलेटर पाईपच्या तोंडाला पिशवी बांधावी. वॉटर कुलर, फुलदाण्या, फवारे, कारंजे यातील दोन-तीन दिवसाआड पाणी बदलावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील भांडीकुंडी कोरडी करुन ठेवावी. खिडक्या, दरवाज्यांना जाळी बसविण्यात यावी. या सर्व बाबींची अंमलबजावणी केल्यास डेंग्यू, हिवताप, जेई, चिकूणगुणिया, मलेरीया, डायरिया या आजारापासून सुटका होऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)नागरिकांनी स्वच्छता ठेवणे गरजेचेग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. जलजन्य आणि वायूजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वैयक्तिक स्वच्छता महत्वाची आहे. शेणखताचे उकीरडे, नालीतील साचलेले पाणी, घनकचरा, घाणीच ेसाम्राज्य स्वच्छ करावे. हिवताप, सर्दी खोकला, डायरिया या आजारावर मात करावयाची असल्यास पाणी उकळून प्यावे तसेच साथीचे आजार आल्यास तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी केले आहे.तालुक्यात दरवर्षी साथरोगाचा फैलाव होतो.ूयावर प्रतिबंधात्मक उपायोजना करणे गरजेचे असते. जलजन्य , वायू जन्य आजारापासून सावध राहण्याकरीता दक्षता घेणे गरजेचे आहे. सर्दी, खोकला, ताप आल्यास तसेच डायरीया, अतिसार झाल्यास त्वरीत नजिकच्या आरेगा्य केंंद्राशी संपर्कसाधून उपचार करावे. - प्रमोद पोतदार, वैद्यकिय अधिकारी, वरुड