शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
4
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
5
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
6
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
7
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
8
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
9
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
10
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
11
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
12
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
13
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
14
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
15
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
16
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
17
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
18
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
19
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने साधला शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: June 3, 2016 00:17 IST

न्यायालयाच्या आदेशानंतर घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ...

परिस्थितीचा आढावा : केंद्र शासनाकडे सादर करणार अहवालअमरावती : न्यायालयाच्या आदेशानंतर घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाचे पाच सदस्ययीय अधिकाऱ्यांचे केंद्रीय पथक निती आयोगाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी रामानंद यांच्या नेतृत्त्वात गुरूवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. या पथकाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा (हिरापूर) व बोपी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. वरिष्ठ संशोधन अधिकारी कृषी निती आयोग नवी दिल्लीचे रामानंद, अव्वर सचिव ग्रामीण विकास राम वर्मा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे संचालक जे.के.राठोड, उपसंचालक जलसंधारण विभाग मिलिंद पानपाटील, सहायक प्रबंधक भारतीय खाद्य निगम एम.एम.बोऱ्हाडे, मदत, पुनर्वसनचे उपसंचालक आत्राम यांचा समावेश होता. केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपायुक्त रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी विधाते, तहसीलदार वाहुरवाघ आदींची देखील उपस्थिती होती.बेलोरा (हिरापूर) गावातील सरपंच सुधीर चौधरी यांनी पथकातील रामानंद यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. मागील वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापुस आणि तूर या पिकांकरिता केलेला खर्चही वसूल झाला नाही. पिकांना अपुऱ्या पावसामुळे मोठा फटका बसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर मांडली. मागील चार वर्षापासून सोयाबीन उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. अपुऱ्या पावसामुळे विहीर, बोरवेलच्या पाण्याचा जलस्तर मोठ्या प्रमाणात खाली गेला आहे. बेलोरा गावातील पाच पैकी तीन विहिरी कोरडया पडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना एक किलोमिटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचे गाऱ्हाणे गावकऱ्यांनी पथकासमोर मांडले. ग्रामस्थांनी मांडल्या व्यथाअमरावती : गावात दोन विहिरींना पाणी आहे. मात्र ते खारे असल्यामुळे पिण्यास अयोग्य असल्याचे ग्रामस्थ अक्षय पाटील यांनी सांगितले. पीककर्जाबाबतीतही शेतकऱ्यांनी पथकासमोर व्यथा मांडली. कें द्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी गुरांच्या चाऱ्याबाबत माहिती जाणून घेतली दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने यंदा खरीप हंगामासाठी मोफत बियाणे पुरवावेत, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी पथकाकडे रेटून धरली. यावर्षीची दुष्काळाची मोठी झळ लक्षात घेता शासनाने शेतकरी व नागरिकांना दिलासा देणे महत्त्वाचे असल्याचे शेतकऱ्यांनी रामानंद यांच्या नेतृत्त्वातील पथकाला पटवून दिले. यावेळी गावपातळीवर पाणीटंचाई, शेततळे, जलयुक्त शिवार अभियानातून युद्धपातळीवर कामे सुरू करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी उपस्थित नागरिकांना दिले. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याच ठिकाणी कारवाई बाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक शु.रा.सरदार व अन्य अधिकारी उपस्थित होते.यानंतर ‘शेतीची उत्पादकता’ याविषयी गावकऱ्यांकडून अधिकाऱ्यांनी घेतलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणे नोंदविली. यानंतर पथकाने बोपी गावाला भेट दिली. तेथील पंकज सोळंके, भानुदास टाले या शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळाबाबतची माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)