शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने साधला शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: June 3, 2016 00:17 IST

न्यायालयाच्या आदेशानंतर घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ...

परिस्थितीचा आढावा : केंद्र शासनाकडे सादर करणार अहवालअमरावती : न्यायालयाच्या आदेशानंतर घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाचे पाच सदस्ययीय अधिकाऱ्यांचे केंद्रीय पथक निती आयोगाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी रामानंद यांच्या नेतृत्त्वात गुरूवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. या पथकाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा (हिरापूर) व बोपी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. वरिष्ठ संशोधन अधिकारी कृषी निती आयोग नवी दिल्लीचे रामानंद, अव्वर सचिव ग्रामीण विकास राम वर्मा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे संचालक जे.के.राठोड, उपसंचालक जलसंधारण विभाग मिलिंद पानपाटील, सहायक प्रबंधक भारतीय खाद्य निगम एम.एम.बोऱ्हाडे, मदत, पुनर्वसनचे उपसंचालक आत्राम यांचा समावेश होता. केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपायुक्त रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी विधाते, तहसीलदार वाहुरवाघ आदींची देखील उपस्थिती होती.बेलोरा (हिरापूर) गावातील सरपंच सुधीर चौधरी यांनी पथकातील रामानंद यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. मागील वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापुस आणि तूर या पिकांकरिता केलेला खर्चही वसूल झाला नाही. पिकांना अपुऱ्या पावसामुळे मोठा फटका बसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर मांडली. मागील चार वर्षापासून सोयाबीन उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. अपुऱ्या पावसामुळे विहीर, बोरवेलच्या पाण्याचा जलस्तर मोठ्या प्रमाणात खाली गेला आहे. बेलोरा गावातील पाच पैकी तीन विहिरी कोरडया पडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना एक किलोमिटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचे गाऱ्हाणे गावकऱ्यांनी पथकासमोर मांडले. ग्रामस्थांनी मांडल्या व्यथाअमरावती : गावात दोन विहिरींना पाणी आहे. मात्र ते खारे असल्यामुळे पिण्यास अयोग्य असल्याचे ग्रामस्थ अक्षय पाटील यांनी सांगितले. पीककर्जाबाबतीतही शेतकऱ्यांनी पथकासमोर व्यथा मांडली. कें द्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी गुरांच्या चाऱ्याबाबत माहिती जाणून घेतली दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने यंदा खरीप हंगामासाठी मोफत बियाणे पुरवावेत, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी पथकाकडे रेटून धरली. यावर्षीची दुष्काळाची मोठी झळ लक्षात घेता शासनाने शेतकरी व नागरिकांना दिलासा देणे महत्त्वाचे असल्याचे शेतकऱ्यांनी रामानंद यांच्या नेतृत्त्वातील पथकाला पटवून दिले. यावेळी गावपातळीवर पाणीटंचाई, शेततळे, जलयुक्त शिवार अभियानातून युद्धपातळीवर कामे सुरू करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी उपस्थित नागरिकांना दिले. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याच ठिकाणी कारवाई बाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक शु.रा.सरदार व अन्य अधिकारी उपस्थित होते.यानंतर ‘शेतीची उत्पादकता’ याविषयी गावकऱ्यांकडून अधिकाऱ्यांनी घेतलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणे नोंदविली. यानंतर पथकाने बोपी गावाला भेट दिली. तेथील पंकज सोळंके, भानुदास टाले या शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळाबाबतची माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)