शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

आचारसंहितेमुळे ८४० ग्रामपंचायतींत विकासकामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आदर्श आचारसंहितेमुळे विकासकामांना ब्रेक लागला आहे. जवळपास ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आदर्श आचारसंहितेमुळे विकासकामांना ब्रेक लागला आहे. जवळपास एक महिना ही कामे खोळंबून पडणार आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे सर्वच कामांची प्रक्रिया ठप्प झाली होती. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आटोपताच ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे रस्ते डांबरीकरण, रस्ते दुरुस्ती, समाज मंदिर, संरक्षक भिंत, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र, शाळा इमारत बांधकाम, गटार दुरुस्ती, रस्ता मुरमीकरण, दुरुस्ती, पूल, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे जलसंधारणासाठी अनेक कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे.

बॉक्स

दर्जेदार कामांबाबत शंकाच

आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील विकासकामांत सातत्याने अडथळे येत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर अनेक विकासकामे तसेच चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या आमदार आणि खासदार निधीतून मंजूर कामे खोळंबली आहेत. शासनाकडून निधी आला असला तरी हा निधी मार्चपूर्वी संपविण्याचे आदेश आहेत. त्यामुळे कामे दर्जेदार होणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता किमान निकाल लागेपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे कामे पूर्ण करण्यासाठी दोनच महिने मिळणार आहेत.