शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

सीएमचे दूत समन्वयातून साधणार गावांचा विकास

By admin | Updated: July 6, 2017 00:13 IST

राज्य शासनाने राज्यभरातील १ हजार गावांची आदर्श ग्रामसाठी निवड केली आहे.

२३ गावांची निवड : जिल्हा परिषदेत खाते प्रमुखांशी संवादलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने राज्यभरातील १ हजार गावांची आदर्श ग्रामसाठी निवड केली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतीमधील २३ गावांचा आदर्श ग्राम म्हणून विकास केला जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्ह्यासाठी निवड केलेल्या १४ दूतामार्फत निवड झालेल्या गावांचा सर्वसमावेश विकास सीएम फेलो मार्फत केला जाणार आहे. उच्च शिक्षित असलेल्या १४ जणांची चमू संबंधित गावात विकास कामे, शासकीय योजनाचा लाभ, समस्या आदीेंचे बारकाईने मुल्याकंन मुक्कामी राहून ग्रामस्थांसोबत संवाद साधून समस्या जाणून घेत आहेत. या दरम्यान गावांची गरज, उपाययोजना आदींबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासन पातळीवर स्वत: पाठपुरावा करीत आहेत. याअनुषंगाने बुधवारी ५ जुलै रोजी या चमूने जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या खातेप्रमुखांशी संवाद साधून शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. सीएम फेलोचे दूत जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायती मधील २३ गावांचा समन्वयातून विकास साध्य करणे, शासकीय योजना घटकांपर्यंत पोहचत आहेत की नाही, शासकीय योजनेचे लाभार्थी योजनेच्या माध्यमातून रोजगार करीत आहेत किंवा नाही, गावात मुलभूत समस्या काय आहेत काय, त्या कशा प्रकारे सोडविता येतील यासाठी ग्रामस्तरापासून ते शासन पातळीपर्यत समन्वयातून विकास करण्याचे दृष्टिने नियोजन करीत आहे. जिल्ह्यातील निवड झालेली गावे येत्या २०१८ पर्यत आदर्श ग्राम म्हणून नावारूपास येण्यासाठी ही खास मोहीम राबविली जात आहे. यामध्ये तिवसा तालुक्यातील चार आणि धारणी तालुक्यातील नऊ अशा एकूण १३ ग्रामपंचायती मधील २३ गावांची निवड शासनाने आदर्श ग्रामसाठी जिल्ह्यातून निवडली आहेत. यामध्ये तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द, शेंदोळा बु, जावरा आणि शिरजगांव मोझरी या चार ग्रामपंचायतीचा समावेश आहे. धारणी मधील सलई, टेंभली, खाऱ्या टेब्रु, टिंगऱ्या, झापल, मालूर, चौराकुंड या ग्रामपंचायतीचा समावेश असून या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गावांचा समावेश आहे.