शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतूनच गावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:34 IST

राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले.

ठळक मुद्देपोपटराव पवार : दत्तक गाव योजना कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले. सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात ‘ग्रामगीताप्रणित आदर्श गावांची यशोगाथा’ या विषयावर पोपटराव पवार यांची मुलाखत सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी घेतली. यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित होत्या. ‘चला हवा येऊ द्या’च्या या जोडीने मुलाखत खुमासदार केली.व्यासपीठावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे, आदर्श ग्राम देवगाव येथील गजानन येवले, राजस्थान रॉयल्स क्रिकेट संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर, कॉर्पोरेट प्रशिक्षक सुमंत टेकाडे, अविनाश काकडे, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, कार्यकारी सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुडे, दिलीप कोहळे, घनश्याम पिकले, भानुदास कराळे, विलास साबळे, सूर्यप्रकाश जयस्वाल उपस्थित होते.विकासाची मानसिकता नसणे हीच खरी समस्या आहे. दत्तकग्राम योजना कुचकामी असून, गावकऱ्यांचे सहकार्याऐवजी अनुदान कुठे मिळेल, याकडेच लक्ष लागते. त्यामुळे सरकारने सगळं केलं पाहिजे, ही भावनादेखील वाढीस लागते. ज्या जिल्ह्यात दारूबंदी केली आहे, त्याच जिल्ह्यात सर्वात जास्त दारू विकली जाते. त्यामुळे दारूबंदी करावयाची असल्यास महिलांच्या सक्रिय समावेशाची आवश्यकता आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केले असून, ग्रामगीतेच्या आचरणातून या देशातील समस्या सुटू शकतात, असे पवार म्हणाले.आज ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभराष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवात २८ आॅक्टोबरला सकाळी ९ ते ५ या वेळेत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संमेलन व ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन प्रदीप विटाळकर व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर करतील. पहाटे सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर दिलीप कोहळे चिंतन व्यक्त करतील. एकनाथ राऊत यांचे ग्रामगीता प्रवचन करतील. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी चिंतन प्रस्तुत करतील. रात्री ८.३० पासून अनुक्रमे ज्ञानेश्वर महाराज वाघ व उद्धवराव गाडेकर यांचे कीर्तन होणार आहे.ओमेश्वरी बंडचा सत्कारकार्यक्रमात विद्यापीठात इंग्रजी विषयात सुवर्णपदकाची मानकरी ओमेश्वरी बंड हिचा प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला. अमरावती येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालय व महात्मा फुले महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांची सुरेल भजने गाऊन वाहवा मिळविली. संचालन मानवछात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी केले.