शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतूनच गावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:34 IST

राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले.

ठळक मुद्देपोपटराव पवार : दत्तक गाव योजना कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले. सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात ‘ग्रामगीताप्रणित आदर्श गावांची यशोगाथा’ या विषयावर पोपटराव पवार यांची मुलाखत सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी घेतली. यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित होत्या. ‘चला हवा येऊ द्या’च्या या जोडीने मुलाखत खुमासदार केली.व्यासपीठावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे, आदर्श ग्राम देवगाव येथील गजानन येवले, राजस्थान रॉयल्स क्रिकेट संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर, कॉर्पोरेट प्रशिक्षक सुमंत टेकाडे, अविनाश काकडे, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, कार्यकारी सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुडे, दिलीप कोहळे, घनश्याम पिकले, भानुदास कराळे, विलास साबळे, सूर्यप्रकाश जयस्वाल उपस्थित होते.विकासाची मानसिकता नसणे हीच खरी समस्या आहे. दत्तकग्राम योजना कुचकामी असून, गावकऱ्यांचे सहकार्याऐवजी अनुदान कुठे मिळेल, याकडेच लक्ष लागते. त्यामुळे सरकारने सगळं केलं पाहिजे, ही भावनादेखील वाढीस लागते. ज्या जिल्ह्यात दारूबंदी केली आहे, त्याच जिल्ह्यात सर्वात जास्त दारू विकली जाते. त्यामुळे दारूबंदी करावयाची असल्यास महिलांच्या सक्रिय समावेशाची आवश्यकता आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केले असून, ग्रामगीतेच्या आचरणातून या देशातील समस्या सुटू शकतात, असे पवार म्हणाले.आज ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभराष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवात २८ आॅक्टोबरला सकाळी ९ ते ५ या वेळेत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संमेलन व ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन प्रदीप विटाळकर व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर करतील. पहाटे सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर दिलीप कोहळे चिंतन व्यक्त करतील. एकनाथ राऊत यांचे ग्रामगीता प्रवचन करतील. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी चिंतन प्रस्तुत करतील. रात्री ८.३० पासून अनुक्रमे ज्ञानेश्वर महाराज वाघ व उद्धवराव गाडेकर यांचे कीर्तन होणार आहे.ओमेश्वरी बंडचा सत्कारकार्यक्रमात विद्यापीठात इंग्रजी विषयात सुवर्णपदकाची मानकरी ओमेश्वरी बंड हिचा प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला. अमरावती येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालय व महात्मा फुले महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांची सुरेल भजने गाऊन वाहवा मिळविली. संचालन मानवछात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी केले.