शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतूनच गावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:34 IST

राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले.

ठळक मुद्देपोपटराव पवार : दत्तक गाव योजना कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले. सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात ‘ग्रामगीताप्रणित आदर्श गावांची यशोगाथा’ या विषयावर पोपटराव पवार यांची मुलाखत सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी घेतली. यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित होत्या. ‘चला हवा येऊ द्या’च्या या जोडीने मुलाखत खुमासदार केली.व्यासपीठावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे, आदर्श ग्राम देवगाव येथील गजानन येवले, राजस्थान रॉयल्स क्रिकेट संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर, कॉर्पोरेट प्रशिक्षक सुमंत टेकाडे, अविनाश काकडे, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, कार्यकारी सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुडे, दिलीप कोहळे, घनश्याम पिकले, भानुदास कराळे, विलास साबळे, सूर्यप्रकाश जयस्वाल उपस्थित होते.विकासाची मानसिकता नसणे हीच खरी समस्या आहे. दत्तकग्राम योजना कुचकामी असून, गावकऱ्यांचे सहकार्याऐवजी अनुदान कुठे मिळेल, याकडेच लक्ष लागते. त्यामुळे सरकारने सगळं केलं पाहिजे, ही भावनादेखील वाढीस लागते. ज्या जिल्ह्यात दारूबंदी केली आहे, त्याच जिल्ह्यात सर्वात जास्त दारू विकली जाते. त्यामुळे दारूबंदी करावयाची असल्यास महिलांच्या सक्रिय समावेशाची आवश्यकता आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केले असून, ग्रामगीतेच्या आचरणातून या देशातील समस्या सुटू शकतात, असे पवार म्हणाले.आज ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभराष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवात २८ आॅक्टोबरला सकाळी ९ ते ५ या वेळेत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संमेलन व ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन प्रदीप विटाळकर व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर करतील. पहाटे सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर दिलीप कोहळे चिंतन व्यक्त करतील. एकनाथ राऊत यांचे ग्रामगीता प्रवचन करतील. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी चिंतन प्रस्तुत करतील. रात्री ८.३० पासून अनुक्रमे ज्ञानेश्वर महाराज वाघ व उद्धवराव गाडेकर यांचे कीर्तन होणार आहे.ओमेश्वरी बंडचा सत्कारकार्यक्रमात विद्यापीठात इंग्रजी विषयात सुवर्णपदकाची मानकरी ओमेश्वरी बंड हिचा प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला. अमरावती येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालय व महात्मा फुले महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांची सुरेल भजने गाऊन वाहवा मिळविली. संचालन मानवछात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी केले.