शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

भटक्या जमातींच्या वस्ती, तांड्यांचा होणार विकास; दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर प्राथमिक सोईसुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 16:49 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी आजही भटक्या जमातीच्या अनेक जाती- जमाती भटकंती करून स्थलांतरीत स्वरुपाचे जीवन जगतात. त्यांच्या वस्ती, तांड्यांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने वसंतराव नाईक तांडा, वस्ती, सुधार योजनेची मुहूर्तमेढ रोवली असून, दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती : पोटाची खळगी भरण्यासाठी आजही भटक्या जमातीच्या अनेक जाती- जमाती भटकंती करून स्थलांतरीत स्वरुपाचे जीवन जगतात. त्यांच्या वस्ती, तांड्यांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने वसंतराव नाईक तांडा, वस्ती, सुधार योजनेची मुहूर्तमेढ रोवली असून, दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.          लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी आदी भटक्या जमाती समूहाच्या तांडा, वस्त्यांमध्ये आजही  गरीबी हे कायम दु:खणे आहे. येथे प्राथमिक सोईसुविधांचे तीनतेरा वाजलेले आहे. शिक्षण, आरोग्य, राहणीमान अशा सर्वच आघाड्यांवर भटक्या जमाती मागे असल्याचे एका सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. त्यामुळे अनुसूचित जातीच्या वसाहतीत ‘दलित वस्ती सुधारणा योजना’ लागू झाल्यानंतर नवबौद्ध, अनुसूचित जाती संवर्गातील वस्त्यांचा झपाट्याने विकास झाल्याने या योजनची फलश्रृती पुढे आली आहे. भटक्या जमातीच्या तांडे, वस्त्यांचा विकास झाल्यास त्यांची कायमची भटकंती थांबेल, यासाठी विमुक्ती जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजना लागू होणार आहे. तांडा, वस्तीच्या विकासासाठी जिल्हास्तरीय समिती गठित केली जाईल. तांडा, वस्ती सुधार योजनेतंर्गत पायाभूत सुविधांबाबतचे कामे ही ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या मदतीने करावी लागणार आहे. भटक्या जमातीच्या वस्ती, तांड्यांमध्ये आजपर्यत कोणतेही विकासकामांचा लाभ मिळाला नाही, अशांना प्राधान्यक्रम देणे अनिवार्य असेल.

असे मिळेल अनुदानभटक्या जमातीचे तांडा, वस्त्यांचा विकासासाठी शासनाने अनुदानाची रक्कम निश्चित केली आहे. लोकसंख्येच्या निकषावर अनुदान मिळणार आहे. यात ५० ते १०० लोकसंख्येसाठी चार लाख, १०१ ते १५० लोकसंख्या सहा लाख तर १५१ पेक्षा अधिक लोकसंख्येसाठी १० लाख रुपयांचे अनुदान मिळेल.

ही करावे लागतील कामेविद्युतीकरण, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालये, समाजमंदिर, वाचनालये, मुख्य रस्त्यांची जोडणी. विकास कामे झाल्यानंतर तांडा, वस्ती सुधार योजनेतंर्गत फलक लावणे अनिवार्य राहील.

टॅग्स :Amravatiअमरावती