शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

लघुसिंचन प्रकल्पावर वैरण विकास शक्य!

By admin | Updated: February 1, 2015 22:48 IST

पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो.

गजानन मोहोड - अमरावतीपावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो. परंतु यंदा सोयाबीनच नसल्यामुळे उन्हाळ्यात वैरण टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैरण विकास कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लघु व मध्यम सिंचन प्रकल्पावर ‘कमांड ऐरियात’ वैरण विकासाच्या योजना राबविल्यास चारा टंचाईवर मात करता येऊ शकते, असे जलसंपदाचे निवृत्त मुख्य अभियंता नारायण परिहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दशकापूर्वी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने अमरावती विभागात अशा योजना राबविल्या होत्या, असे परिहार यांनी सांगितले.पशुधन संगोपनात, पशूधनाची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन दुग्ध उत्पादन व आरोग्य संवर्धन तसेच पशुधनापासून अपेक्षित लाभ मिळणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी वैरणाची आवश्यकता आहे. यंदा मात्र जिल्ह्यात सर्वाधिक असणारे सोयाबीनचे कुटाराची टंचाई आहे त्यामुळे सुधारित, संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या एकदल, द्विदल तसेच गवतवर्गीय प्रजातीची लागवड करून वैरण उत्पादन वाढविणे व कमी खर्चात पशुधनासाठी प्रथिनेयुक्त सकस आहार उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लहानमोठे सिंचन प्रकल्प आहेत. खंडीत पावसाने सोयाबीनची वैरण नसली तरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांना वैरण विकासाचा कार्यक्रम अनुदानावर दिल्यास १० लाखावर पशुधनाला हिरवा, सकस व पौष्टीक चारा उपलब्ध होईल.