शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

लघुसिंचन प्रकल्पावर वैरण विकास शक्य!

By admin | Updated: February 1, 2015 22:48 IST

पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो.

गजानन मोहोड - अमरावतीपावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो. परंतु यंदा सोयाबीनच नसल्यामुळे उन्हाळ्यात वैरण टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैरण विकास कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लघु व मध्यम सिंचन प्रकल्पावर ‘कमांड ऐरियात’ वैरण विकासाच्या योजना राबविल्यास चारा टंचाईवर मात करता येऊ शकते, असे जलसंपदाचे निवृत्त मुख्य अभियंता नारायण परिहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दशकापूर्वी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने अमरावती विभागात अशा योजना राबविल्या होत्या, असे परिहार यांनी सांगितले.पशुधन संगोपनात, पशूधनाची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन दुग्ध उत्पादन व आरोग्य संवर्धन तसेच पशुधनापासून अपेक्षित लाभ मिळणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी वैरणाची आवश्यकता आहे. यंदा मात्र जिल्ह्यात सर्वाधिक असणारे सोयाबीनचे कुटाराची टंचाई आहे त्यामुळे सुधारित, संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या एकदल, द्विदल तसेच गवतवर्गीय प्रजातीची लागवड करून वैरण उत्पादन वाढविणे व कमी खर्चात पशुधनासाठी प्रथिनेयुक्त सकस आहार उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लहानमोठे सिंचन प्रकल्प आहेत. खंडीत पावसाने सोयाबीनची वैरण नसली तरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांना वैरण विकासाचा कार्यक्रम अनुदानावर दिल्यास १० लाखावर पशुधनाला हिरवा, सकस व पौष्टीक चारा उपलब्ध होईल.