शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लघुसिंचन प्रकल्पावर वैरण विकास शक्य!

By admin | Updated: February 1, 2015 22:48 IST

पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो.

गजानन मोहोड - अमरावतीपावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो. परंतु यंदा सोयाबीनच नसल्यामुळे उन्हाळ्यात वैरण टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैरण विकास कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लघु व मध्यम सिंचन प्रकल्पावर ‘कमांड ऐरियात’ वैरण विकासाच्या योजना राबविल्यास चारा टंचाईवर मात करता येऊ शकते, असे जलसंपदाचे निवृत्त मुख्य अभियंता नारायण परिहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दशकापूर्वी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने अमरावती विभागात अशा योजना राबविल्या होत्या, असे परिहार यांनी सांगितले.पशुधन संगोपनात, पशूधनाची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन दुग्ध उत्पादन व आरोग्य संवर्धन तसेच पशुधनापासून अपेक्षित लाभ मिळणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी वैरणाची आवश्यकता आहे. यंदा मात्र जिल्ह्यात सर्वाधिक असणारे सोयाबीनचे कुटाराची टंचाई आहे त्यामुळे सुधारित, संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या एकदल, द्विदल तसेच गवतवर्गीय प्रजातीची लागवड करून वैरण उत्पादन वाढविणे व कमी खर्चात पशुधनासाठी प्रथिनेयुक्त सकस आहार उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लहानमोठे सिंचन प्रकल्प आहेत. खंडीत पावसाने सोयाबीनची वैरण नसली तरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांना वैरण विकासाचा कार्यक्रम अनुदानावर दिल्यास १० लाखावर पशुधनाला हिरवा, सकस व पौष्टीक चारा उपलब्ध होईल.