शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे बिघडतेय हवामानाचे संतुलन

By admin | Updated: March 23, 2017 00:09 IST

शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे.

वृक्षांची कत्तल घातक : मान्सूनवर अवलंबून प्रदेशांना धोका वैभव बाबरेकर ल्ल अमरावतीशहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे. वांझोटा विकास करण्यासाठी जी प्रचंड वृक्षतोड शासकीय यंत्रणा करते, त्याची १० टक्के सुद्धा भरपाई होेताना दिसत नाही. मागील वर्षी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली दोन कोटी वृक्षलागवड योजना काही समाजकंटकांच्या मेहेरबानीमुळे फसलेली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात मृताला अग्नी देण्यासाठी सुद्धा लाकूड मिळेल की नाही, याबद्दल शंका आहे. वृक्षतोडीमुळे हवामानासाठी घिातक आणि भयकंर बदल होत आहेत, त्यामुळे भारतासारख्या मान्सूनच्या कृपेवर अवलंबून असलेल्या देशाचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी सुरक्षित रहावी, असे वाटत असेल तर सर्व नागरिकांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. यादिवसाचे औचित्य साधून हे संपूर्ण वर्ष ‘ढग’, त्याचे प्रकार आणि हवामानावर होणारा परिणाम यावर विशेष जोर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ढगांचा एक जागतिक ‘अ‍ॅटलास’ बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हवामानाचे महत्त्व हवामानाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे दैनंदिन हवामान आणि दुसरा प्रकार म्हणजे दीर्घकालिन किंवा सरासरी हवामान. हवामानाचे घटक हे सभोवतालच्या भौगोलिक आणि नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. हवामानाच्या कोणत्याही घटकात मानवी हस्तक्षेपामुळे बदल झाल्यास त्या ठिकाणच्या हवामानातही बदल व्हायला सुरूवात होते. विदर्भाच्या हवामानात काही बदल झाल्यास त्याचे परिणाम हजारो किलोमीटर अंतरावरील अमेरिकेलासुद्धा भोगावे लागू शकतात. म्हणूनच युरोप अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्रे विकसनशिल देशांमधील हवामान किंवा पर्यावरण शाबूत रहावे, यासाठी कोट्यवधींचे अनुदान आणि कर्ज देत असतात. भारत किंवा आफ्रिकेमधील अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये विदेशी पैशांवरच कार्यरत असतात. हवामान बदल आणि त्याचे परिणामएखाद्या ठिकाणचे सरासरी हवामानात काही बदल घडून येतात त्यावेळी तेथील हवामान बदल आहे, असे समजले जाते. जागतिक हवामान बदल संघटनेच्या अभ्यासानुसार जागतिक सरासरी तापमानामध्ये १ डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात हवामानात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात झाली असून हिवाळा लांबणे, एलनिनो, अवेळी आणि मोठ्या प्रमाणात होणारी गारपीट, हिमालयीन भागात कमी झालेले बर्फवृष्टीचे प्रमाण हे त्याचेच उदाहरण आहेअमरावती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. परंतु दोषींवर कारवाई केली जात नाही. शिवाय झाडे वाचविण्यासाठी शासकीय यंत्रणाही विशेष प्रयत्न करताना दिसून येत नाही. अशीच स्थिती राहिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास अटळ आहे. -अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती