शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे बिघडतेय हवामानाचे संतुलन

By admin | Updated: March 23, 2017 00:09 IST

शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे.

वृक्षांची कत्तल घातक : मान्सूनवर अवलंबून प्रदेशांना धोका वैभव बाबरेकर ल्ल अमरावतीशहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे. वांझोटा विकास करण्यासाठी जी प्रचंड वृक्षतोड शासकीय यंत्रणा करते, त्याची १० टक्के सुद्धा भरपाई होेताना दिसत नाही. मागील वर्षी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली दोन कोटी वृक्षलागवड योजना काही समाजकंटकांच्या मेहेरबानीमुळे फसलेली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात मृताला अग्नी देण्यासाठी सुद्धा लाकूड मिळेल की नाही, याबद्दल शंका आहे. वृक्षतोडीमुळे हवामानासाठी घिातक आणि भयकंर बदल होत आहेत, त्यामुळे भारतासारख्या मान्सूनच्या कृपेवर अवलंबून असलेल्या देशाचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी सुरक्षित रहावी, असे वाटत असेल तर सर्व नागरिकांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. यादिवसाचे औचित्य साधून हे संपूर्ण वर्ष ‘ढग’, त्याचे प्रकार आणि हवामानावर होणारा परिणाम यावर विशेष जोर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ढगांचा एक जागतिक ‘अ‍ॅटलास’ बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हवामानाचे महत्त्व हवामानाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे दैनंदिन हवामान आणि दुसरा प्रकार म्हणजे दीर्घकालिन किंवा सरासरी हवामान. हवामानाचे घटक हे सभोवतालच्या भौगोलिक आणि नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. हवामानाच्या कोणत्याही घटकात मानवी हस्तक्षेपामुळे बदल झाल्यास त्या ठिकाणच्या हवामानातही बदल व्हायला सुरूवात होते. विदर्भाच्या हवामानात काही बदल झाल्यास त्याचे परिणाम हजारो किलोमीटर अंतरावरील अमेरिकेलासुद्धा भोगावे लागू शकतात. म्हणूनच युरोप अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्रे विकसनशिल देशांमधील हवामान किंवा पर्यावरण शाबूत रहावे, यासाठी कोट्यवधींचे अनुदान आणि कर्ज देत असतात. भारत किंवा आफ्रिकेमधील अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये विदेशी पैशांवरच कार्यरत असतात. हवामान बदल आणि त्याचे परिणामएखाद्या ठिकाणचे सरासरी हवामानात काही बदल घडून येतात त्यावेळी तेथील हवामान बदल आहे, असे समजले जाते. जागतिक हवामान बदल संघटनेच्या अभ्यासानुसार जागतिक सरासरी तापमानामध्ये १ डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात हवामानात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात झाली असून हिवाळा लांबणे, एलनिनो, अवेळी आणि मोठ्या प्रमाणात होणारी गारपीट, हिमालयीन भागात कमी झालेले बर्फवृष्टीचे प्रमाण हे त्याचेच उदाहरण आहेअमरावती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. परंतु दोषींवर कारवाई केली जात नाही. शिवाय झाडे वाचविण्यासाठी शासकीय यंत्रणाही विशेष प्रयत्न करताना दिसून येत नाही. अशीच स्थिती राहिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास अटळ आहे. -अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती