शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे बिघडतेय हवामानाचे संतुलन

By admin | Updated: March 23, 2017 00:09 IST

शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे.

वृक्षांची कत्तल घातक : मान्सूनवर अवलंबून प्रदेशांना धोका वैभव बाबरेकर ल्ल अमरावतीशहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे. वांझोटा विकास करण्यासाठी जी प्रचंड वृक्षतोड शासकीय यंत्रणा करते, त्याची १० टक्के सुद्धा भरपाई होेताना दिसत नाही. मागील वर्षी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली दोन कोटी वृक्षलागवड योजना काही समाजकंटकांच्या मेहेरबानीमुळे फसलेली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात मृताला अग्नी देण्यासाठी सुद्धा लाकूड मिळेल की नाही, याबद्दल शंका आहे. वृक्षतोडीमुळे हवामानासाठी घिातक आणि भयकंर बदल होत आहेत, त्यामुळे भारतासारख्या मान्सूनच्या कृपेवर अवलंबून असलेल्या देशाचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी सुरक्षित रहावी, असे वाटत असेल तर सर्व नागरिकांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. यादिवसाचे औचित्य साधून हे संपूर्ण वर्ष ‘ढग’, त्याचे प्रकार आणि हवामानावर होणारा परिणाम यावर विशेष जोर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ढगांचा एक जागतिक ‘अ‍ॅटलास’ बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हवामानाचे महत्त्व हवामानाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे दैनंदिन हवामान आणि दुसरा प्रकार म्हणजे दीर्घकालिन किंवा सरासरी हवामान. हवामानाचे घटक हे सभोवतालच्या भौगोलिक आणि नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. हवामानाच्या कोणत्याही घटकात मानवी हस्तक्षेपामुळे बदल झाल्यास त्या ठिकाणच्या हवामानातही बदल व्हायला सुरूवात होते. विदर्भाच्या हवामानात काही बदल झाल्यास त्याचे परिणाम हजारो किलोमीटर अंतरावरील अमेरिकेलासुद्धा भोगावे लागू शकतात. म्हणूनच युरोप अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्रे विकसनशिल देशांमधील हवामान किंवा पर्यावरण शाबूत रहावे, यासाठी कोट्यवधींचे अनुदान आणि कर्ज देत असतात. भारत किंवा आफ्रिकेमधील अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये विदेशी पैशांवरच कार्यरत असतात. हवामान बदल आणि त्याचे परिणामएखाद्या ठिकाणचे सरासरी हवामानात काही बदल घडून येतात त्यावेळी तेथील हवामान बदल आहे, असे समजले जाते. जागतिक हवामान बदल संघटनेच्या अभ्यासानुसार जागतिक सरासरी तापमानामध्ये १ डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात हवामानात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात झाली असून हिवाळा लांबणे, एलनिनो, अवेळी आणि मोठ्या प्रमाणात होणारी गारपीट, हिमालयीन भागात कमी झालेले बर्फवृष्टीचे प्रमाण हे त्याचेच उदाहरण आहेअमरावती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. परंतु दोषींवर कारवाई केली जात नाही. शिवाय झाडे वाचविण्यासाठी शासकीय यंत्रणाही विशेष प्रयत्न करताना दिसून येत नाही. अशीच स्थिती राहिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास अटळ आहे. -अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती