शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
3
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
4
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
5
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
6
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
7
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
8
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
9
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
10
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
11
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
12
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
13
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
14
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
15
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
16
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
17
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
18
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
20
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?

अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई परिसरात कांदा पिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:17 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

ठळक मुद्देअवकाळी पाऊस-वादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कापूस, तूर, सोयाबीन पिकांनी पुरते गारद केले असताना, तीन दिवसांच्या अवकाळी पावसानेदेखील कांदाउत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.तीन दिवसांपासून सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे पिकाचे संरक्षणही करता आले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अद्यापही शेकडो शेतकऱ्यांचा कांदा उघड्यावर पडून आहे. पावसामुळे तो सडण्यास सुरुवात झाली असून, लाखो रुपयांच्या नुकसानाचा सामना करावा लागणार असल्याची चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.नांदगावपेठमध्येही नुकसानदोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे नांदगावपेठ येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. संत्रा, कांदा आणि लिंबूच्या पिकांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. रामकृष्ण पोकळे, सुरेश भगत, विलास इंगोले, श्रीकृष्ण मुळे, प्रल्हाद पोकळे या शेतकऱ्यांना वादळाचा फटका बसला. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन धीर द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.कवडीमोलभावात विकला जातोय कांदाशेतकऱ्यांचा कांदा निघण्यापूर्वी बाजारात येण्यापूर्वी त्याचे भाव तेजीत असतात. मात्र, बाजारपेठेत नवीन कांदा विकायला येताच दर पडतात. त्यात आता लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहेत. त्यामुळे कांदा चार ते पाच रुपये किलो दराने विकला जात आहे. शहरातील बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी आपला माल विकू शकला नाही. अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर नांगर फिरविला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर फार मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे.विक्रीवर परिणामकांद्याची लिलाव प्रक्रिया बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतुकीची साधने व मालाची वाहतूक कमी झालेली असल्याने विक्रीवर परिणाम दिसून येत आहे.कांद्याला लागली सडकांदा काढण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही शेतामध्ये उघड्यावरच पडून आहे. गेल्या तीन दिवसांपासून आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा सडायला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती