शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी; ३६९ घरांना क्षती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

अमरावती : पाच दिवसातील जोरदार पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. शेतीलाही मोठा फटका बसला. सोयाबीन, कापूस, तूर, ...

अमरावती : पाच दिवसातील जोरदार पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. शेतीलाही मोठा फटका बसला. सोयाबीन, कापूस, तूर, केळी, संत्रा आदी प्रमुख पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी करून पीक नुकसानाचा पंचनामा सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

१४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे नुकसान झाले आहे. चांदूरबाजार वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाली. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील २० हजार हेक्टर शेती खरडून गेली, ३६९ घरांची पडझड झाली आहे. यापैकी नऊ घरे पूर्णत: पडली असून ३६० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अतिवृष्टीने शेतात जाण्यासाठी मार्गही गवसत नाही, असे विदारक चित्र आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांनी पिकांची भरपाई मिळण्यासाठी ७२ तासांच्या आत पंचनामे सादर करण्याचे फर्मान जारी केल्याने विमा काढूनही शेतकरी विम्यापासून वंचित राहतील, असे दिसून येत आहे.

-------------------

सहा तालुक्यांना जबर फटका

शेतीचे सर्वाधिक नुकसान दर्यापूर तालुक्यात झाले. या तालुक्यातील ५५५ हेक्टरमधील पीक बाधित झाले. त्याखालोखाल १२० हेक्टर शेती पिके धामणगाव रेल्वे तालुक्यात खराब झाली असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९२, वरूड ७८, मोर्शी २० आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १५ हेक्टरमधील शेती पिके खराब झालीत. अशाप्रकारे जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील २० हजार हेक्टरमधील पिके खराब झालीत.

------------------

१२१ गावांमध्ये पावसाचा कहर

पाच दिवसाच्या संततधार पावसाने जिल्ह्यातील १२१ गावांमध्ये कहर केला. धामणगाव रेल्वे, भातकुली आणि तिवसा तालुक्यातील अनुक्रमे २७, २३ आणि २२ गावांमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यामुळे ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी अमरावती व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येकी तीन, वरूड, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येकी एक अशाप्रकारे नऊ घरे पूर्णत: कोलमडली. ३६० घरांना अंशत: फटका बसला आहे.

-----------------------

अंशत: फटका बसलेले हे आहेत तालुके

अंशत: फटका बसलेल्यांमध्ये सर्वाधिक ८७ घरे तिवसा तालुक्यातील आहेत. भातकुली तालुक्यात ७६, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५१, अमरावती तालुक्यात ४९, तर दर्यापूर तालुक्यातील ३३ गावांचा समावेश आहे. दोन-तीन दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यात एक व्यक्ती वाहून गेला. मृत व्यक्ती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे.